शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

बदलला तो माणूस, जंगल नव्हे!

By admin | Updated: February 26, 2017 23:32 IST

विंदा करंदीकर यांना मी आजपासून बरोबर १० वर्षांआधी भेटलो होतो.

विंदा करंदीकर यांना मी आजपासून बरोबर १० वर्षांआधी भेटलो होतो. त्यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या आठवणींनी मन गहिवरून येईल. झाडे, पाने, फुले, वन्यजीव, पशुपक्षी यांच्या प्रेमात पडलो, आयुष्यभर त्यांना जीव लावला; हा पुरस्कार त्या समर्पणाचा सन्मान आहे, असं मी मानतो.आता मी ८५ वर्षांचा झालो आहे; पण नवकोशनिर्मितीचा ध्यास काही सोडवत नाही. पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं, घरट्यापलीकडे, पाखरमाया, चैत्रपालवी, केशराचा पाऊस, रानवाटा.. यांसारख्या विविध २१ पुस्तकांतून मी जंगलापलीकडचं अदृश्य जंगल वाचकांपुढे आणलं... ‘चकवाचांदणं : एक वनोपनिषद’ या आत्मकथनातून हा सगळा अरण्यप्रवास मांडला. आता पक्षिकोश पूर्ण झाला आहे. प्राणिकोश येत्या १५-२० दिवसांत छपाईला जाईल. त्यानंतर लगेच मत्स्यकोश आणि वृक्षकोशाची तयारी करायची आहे. डॉ. सलीम अलींचा हा वारसा मी पुढे चालवतोय. पण, मारुती चितमपल्लींच्या नंतर त्यांचं हे काम पुढे नेणारं दुसरं कुठलं नाव मला या क्षेत्रात दिसत नाही, याची खंत आहे.डॉ. सलीम अली शंभर वर्षे जगले. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा अभ्यास सुरू होता. आता तशी तपश्चर्या करायला कुणाकडेच वेळ नाही. किंबहुना तपश्चर्येचा अर्थच आजच्या पिढीला नीटसा कळत नाही. याचं एक उदाहरण सांगतो.एक तरुण मुलगा माझ्याकडे आला. त्याचा जंगलाचा अभ्यास होता. पक्षिनिरीक्षणाचा छंद होता. यात आणखी माहिती त्याला हवी होती. मी त्याला म्हटलं, तुला किती वेळात हे सर्व हवं आहे?तर तो म्हणाला, दोन महिन्यांत! आता सांगा. मी जे ३५ वर्षे अखंड अरण्यसाधनेतून मिळवलं, ते या तरुण मित्राला दोन महिन्यात अन् तेही बंद खोलीत कसं देणार? समर्पित वृत्तीने अभ्यास करण्याची कुणाचीच इच्छा नाही. अनेकजण तर यातही करिअरचा शोध घेत असतात. त्यांना पैसे कमवायचे असतात. जिथे लोक पैशांच्या अपेक्षेने येत असतील तिथे अरण्यतपस्वी कसे घडणार? ज्ञान आणि माहिती यातला फरक नवीन पिढीला कळत नाही, येथेच सगळा घोळ आहे. पण, मी निराश नाही. पक्षिमित्र संमेलनांनी आजही आस बांधून ठेवली आहे. मोजकेच; पण समर्पित वृत्तीचे लोक जंगलाबद्दल जाणून घ्यायला उत्सुक आहेत तोपर्यंत या निबिड अरण्यातील अनेक रंजक गोष्टी जगापर्यंत पोहोचत राहणार आहेत, हे नक्की! आज जग आधुनिक झालं आहे. इंटरनेटने जगाला अधिक जवळ आणलं आहे. पण, तिकडे जंगलात काहीच बदललं नाही. रानातून चालताना भुरळ घालणारी रुई, धोतरा, निवडुंग, बोरी, बाभळी, निंबाची काटेरी झुडपं होती तशीच आजही आहेत. वीण झाल्यानंतर सोडून दिलेली सुगरण पक्ष्याची घरटी, तळ्याकाठी सापडणारी पारी, पोपटी व उदी रंगाची पाखरांची पिसं, प्राण्यांची बोली, पक्ष्यांचे संकेत सगळं जागच्या जागेवर आहे. ...काहीच बदललेलं नाही!जो काही बदल झालाय तो इकडे माणसांच्या विश्वात झाला आहे. त्याचा थोडाफार परिणाम जंगलावर होत असतो. परंतु माझ्यासाठी आयुष्याचं विद्यापीठ असलेलं जंगल मात्र शाश्वत आहे. या क्षेत्रात आणखी बरंच काही करण्यासारखं आहे. जंगल जितकं अथांग आहे तितकी त्यात विषयमूल्यं दडली आहेत. पण, त्यांना शोधून काढणं सोपं काम नाही. त्यासाठी अंगी संन्यस्त वृत्ती लागते. ही वृत्ती नवीन पिढीच्याही अंगी रुजावी, या अपेक्षेसह मी हा पुरस्कार स्वीकारायला मुंबईला जाणार आहे.- मारुती चितमपल्ली(शब्दांकन : शफी पठाण)