शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

बदलला तो माणूस, जंगल नव्हे!

By admin | Updated: February 26, 2017 23:32 IST

विंदा करंदीकर यांना मी आजपासून बरोबर १० वर्षांआधी भेटलो होतो.

विंदा करंदीकर यांना मी आजपासून बरोबर १० वर्षांआधी भेटलो होतो. त्यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या आठवणींनी मन गहिवरून येईल. झाडे, पाने, फुले, वन्यजीव, पशुपक्षी यांच्या प्रेमात पडलो, आयुष्यभर त्यांना जीव लावला; हा पुरस्कार त्या समर्पणाचा सन्मान आहे, असं मी मानतो.आता मी ८५ वर्षांचा झालो आहे; पण नवकोशनिर्मितीचा ध्यास काही सोडवत नाही. पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं, घरट्यापलीकडे, पाखरमाया, चैत्रपालवी, केशराचा पाऊस, रानवाटा.. यांसारख्या विविध २१ पुस्तकांतून मी जंगलापलीकडचं अदृश्य जंगल वाचकांपुढे आणलं... ‘चकवाचांदणं : एक वनोपनिषद’ या आत्मकथनातून हा सगळा अरण्यप्रवास मांडला. आता पक्षिकोश पूर्ण झाला आहे. प्राणिकोश येत्या १५-२० दिवसांत छपाईला जाईल. त्यानंतर लगेच मत्स्यकोश आणि वृक्षकोशाची तयारी करायची आहे. डॉ. सलीम अलींचा हा वारसा मी पुढे चालवतोय. पण, मारुती चितमपल्लींच्या नंतर त्यांचं हे काम पुढे नेणारं दुसरं कुठलं नाव मला या क्षेत्रात दिसत नाही, याची खंत आहे.डॉ. सलीम अली शंभर वर्षे जगले. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा अभ्यास सुरू होता. आता तशी तपश्चर्या करायला कुणाकडेच वेळ नाही. किंबहुना तपश्चर्येचा अर्थच आजच्या पिढीला नीटसा कळत नाही. याचं एक उदाहरण सांगतो.एक तरुण मुलगा माझ्याकडे आला. त्याचा जंगलाचा अभ्यास होता. पक्षिनिरीक्षणाचा छंद होता. यात आणखी माहिती त्याला हवी होती. मी त्याला म्हटलं, तुला किती वेळात हे सर्व हवं आहे?तर तो म्हणाला, दोन महिन्यांत! आता सांगा. मी जे ३५ वर्षे अखंड अरण्यसाधनेतून मिळवलं, ते या तरुण मित्राला दोन महिन्यात अन् तेही बंद खोलीत कसं देणार? समर्पित वृत्तीने अभ्यास करण्याची कुणाचीच इच्छा नाही. अनेकजण तर यातही करिअरचा शोध घेत असतात. त्यांना पैसे कमवायचे असतात. जिथे लोक पैशांच्या अपेक्षेने येत असतील तिथे अरण्यतपस्वी कसे घडणार? ज्ञान आणि माहिती यातला फरक नवीन पिढीला कळत नाही, येथेच सगळा घोळ आहे. पण, मी निराश नाही. पक्षिमित्र संमेलनांनी आजही आस बांधून ठेवली आहे. मोजकेच; पण समर्पित वृत्तीचे लोक जंगलाबद्दल जाणून घ्यायला उत्सुक आहेत तोपर्यंत या निबिड अरण्यातील अनेक रंजक गोष्टी जगापर्यंत पोहोचत राहणार आहेत, हे नक्की! आज जग आधुनिक झालं आहे. इंटरनेटने जगाला अधिक जवळ आणलं आहे. पण, तिकडे जंगलात काहीच बदललं नाही. रानातून चालताना भुरळ घालणारी रुई, धोतरा, निवडुंग, बोरी, बाभळी, निंबाची काटेरी झुडपं होती तशीच आजही आहेत. वीण झाल्यानंतर सोडून दिलेली सुगरण पक्ष्याची घरटी, तळ्याकाठी सापडणारी पारी, पोपटी व उदी रंगाची पाखरांची पिसं, प्राण्यांची बोली, पक्ष्यांचे संकेत सगळं जागच्या जागेवर आहे. ...काहीच बदललेलं नाही!जो काही बदल झालाय तो इकडे माणसांच्या विश्वात झाला आहे. त्याचा थोडाफार परिणाम जंगलावर होत असतो. परंतु माझ्यासाठी आयुष्याचं विद्यापीठ असलेलं जंगल मात्र शाश्वत आहे. या क्षेत्रात आणखी बरंच काही करण्यासारखं आहे. जंगल जितकं अथांग आहे तितकी त्यात विषयमूल्यं दडली आहेत. पण, त्यांना शोधून काढणं सोपं काम नाही. त्यासाठी अंगी संन्यस्त वृत्ती लागते. ही वृत्ती नवीन पिढीच्याही अंगी रुजावी, या अपेक्षेसह मी हा पुरस्कार स्वीकारायला मुंबईला जाणार आहे.- मारुती चितमपल्ली(शब्दांकन : शफी पठाण)