शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

कुपोषित इच्छाशक्ती

By admin | Updated: September 28, 2016 05:08 IST

राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांच्या असंवेदनशील वक्तव्यामुळे कुपोषित बालकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असला तरी ही समस्या काही आजची नाही.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांच्या असंवेदनशील वक्तव्यामुळे कुपोषित बालकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असला तरी ही समस्या काही आजची नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न भेडसावतो आहे. महाराष्ट्रातील जवळपास १५ जिल्ह्यांना कुपोषणाने विळखा घातला आहे. नव्याने स्थापित पालघर असो वा विदर्भातील मेळघाट, या रोगाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्याला रोकण्यासाठी शासनाने काहीच केले नाही असे नव्हे. अनेक योजना राबविल्या. कोट्यवधींचा निधी दिला. पण तरीही कुपोषणातून राज्याची मुक्तता मात्र होऊ शकली नाही. उलट त्यात वाढच होत असल्याचे चित्र आहे. २०१५-१६ या वर्षात सुमारे १७ हजार बालमृत्यू झाले असून मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. सोबतच केंद्र व राज्य सरकारने किती निधीची तरतूद केली, तो कुठे आणि कसा खर्च झाला याची सविस्तर माहितीही सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही पालघर जिल्ह्यातील बालमृत्यूसंदर्भात राज्य सरकारला नोटीस बजावून महिनाभरात अहवाल मागितला आहे. त्यामुळे आता नेमेची येतो मग पावसाळा या उक्तीनुसार काही दिवस कुपोषणावर विचारमंथन होईल. शासनाकडूनही आकडेवारीचे दावे सादर केले जातील आणि कालांतराने पुन्हा हा प्रश्न थंड बस्त्यात जाईल. सरकारला खरोखरच कुपोषणावर मात करायची असल्यास या प्रश्नाच्या मुळाशी जावे लागणार आहे. पण दुर्दैवाने अधिकाऱ्यांची अनास्था आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यात आड येतो आहे. मेळघाटात कुपोषण कमी झाल्याचा दावा केला जात असला तरी गेल्या दहा वर्षात तेथे सव्वाचार हजारावर बालमृत्यू झाले आहेत. आदिवासी कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जात असतानाही असे का घडावे? कारण अगदी स्पष्ट आहे. या योजनांसाठी दिला जाणारा निधी आदिवासींपर्यत पोहोचतच नाही. बहुतांश आदिवासी बांधव अजूनही दारिद्र्यातच जगत आहेत आणि त्यामुळे वाढते अनारोग्य हा कळीचा मुद्दा आहे. शिवाय त्यांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था कुणापासून लपलेली नाही. अनेक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर्स नाहीत. औषधांचा नेहमीच तुटवडा असतो. येथील बाळंतपणाचे प्रमाण अजूनही दहा ते वीस टक्क्यांवर गेलेले नाही, हे वास्तव आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मागील दोन वर्षात वारंवार महिला व बालकल्याण, आदिवासी आणि आरोग्य विभागाच्या बैठका घेऊन यावर नियंत्रणासाठी महत्वाच्या सूचना केल्या होत्या. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रभावीपणे राबविण्यासोबतच ग्राम बालविकास केंद्र स्थापनेचे निर्देश त्यांनी दिले होते. त्याचेही पालन अधिकाऱ्यांकडून झाले नाही. त्यामुळे शासन आणि प्रशासनातील इच्छाशक्तीचे हे कुपोषण दूर झाले तर कुपोषणावर मात करणे अशक्य नाही.