शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

महाराष्ट्राचे निर्णायकी वळण!

By admin | Updated: December 31, 2014 02:15 IST

महाराष्ट्राची जडणघडण ही सामाजिक न्याय, बेरजेचे राजकारण आणि आर्थिक स्थैर्य आदी पायांवर झाली आहे.

महाराष्ट्राची जडणघडण ही सामाजिक न्याय, बेरजेचे राजकारण आणि आर्थिक स्थैर्य आदी पायांवर झाली आहे. त्यावर आधारितच राजकीय वाटचाल झाल्याने सर्व समाज घटकांना सामावून घेणारा तसेच सर्वांना समान विकसित होण्याची संधी देणारा पक्ष म्हणून कॉँग्रेस पक्ष सत्तेवर राहिला होता. त्यात अनेक बदल झाले. त्यानुसार प्राधान्यक्रमाचे विषय घेऊन महाराष्ट्राची वाटचाल करण्यासाठी जे निर्णय घेणे आवश्यक होते, ते न केल्याने कॉँग्रेसकडून सत्ता सुटली.हा बदल कोणता होता? वाढते नागरीकरण, शिक्षणाची गरज, रोजगाराची संधी आणि ग्रामीण विकासाची कुंठित अवस्था आदी कारणाने महाराष्ट्राचे राजकारण बदलले आहे. याचे आव्हान स्वीकारण्याचे धैर्य दाखविले नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाने निर्णायकी वळण घेतले आहे. त्यामुळे बदललेल्या महाराष्ट्राच्या राजकारणातून वेगळाच महाराष्ट्र उभा राहण्याची शक्यता आहे.कृषी-औद्योगिक धोरणाच्या मर्यादा स्पष्ट झाल्याने विकासाची वाढ रोखली गेली आहे. त्यातून असंतोष वाढत राहिला होता. त्याचे प्रतिबिंब राजकारणात उमटले आहे. शिवाय गेल्या काही वर्षांतील आघाडी सरकारमधील पक्षांचा राजकीय संघर्षही कारणीभूत ठरला. सलग तीनवेळा आघाडीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले. त्यापैकी पहिल्या दोन कालखंडांत कॉँग्रेस-राष्ट्रवादीमधील समन्वय अधिक चांगला होता. स्पर्धा होती, पण मैत्रीवर परिणाम होऊ दिला जात नव्हता. त्यामुळे आघाडीचे सरकार टिकले होते. तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर मात्र या मैत्रीचे रूपांतर संघर्षात झाले. त्यातून जनतेच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार समाजातील प्रत्येक घटकातून होऊ लागली. त्यामुळे सत्तांतर झाले. एका बाजूला महाराष्ट्र बदलला असताना आपले राजकीय धोरण बदलण्याची गरज न ओळखल्याने भाजपा सत्तेवर आला. या परिस्थितीत महाराष्ट्राचे राजकारण कोणाच्या हाती द्यावे, याचा निर्णयही जनतेने अगतिकतेतून घेतला म्हणायला हवे. देशातील बदललेल्या राजकारणाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर फारसा परिणाम पूर्वी होत नव्हता. मात्र, २०१४ हे वर्ष त्याला अपवाद ठरले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एखाद्या यू टर्नसारखा निर्णय प्रथमच घेण्यात आला आहे. विरोधी पक्षांना लोकसभेत अशा प्रकारे अभूतपूर्व विजय पहिल्यांदाच मिळाला. तसाच तो विधानसभा निवडणुकीतही मिळाला. या सर्व परिस्थितीचा लाभ भारतीय जनता पार्टीने योग्य पद्धतीने घेतला. एवढेच नव्हेतर शिवसेना या २५ वर्षांच्या मित्रपक्षाशी असलेली युतीही तोडली. त्यांचा अंदाज बरोबर होता, पण यश थोडे कमी मिळाले, अन्यथा भाजपा स्वबळावर सत्तेवर आला असता. या सत्तांतरातून महाराष्ट्राची वाटचाल कशी होईल, यावर उलटसुलट चर्चा होऊ शकते, पण पारंपरिक पद्धतीनेच राज्यकारभार केला, तर २०१४चा निर्णय पुढे जाणारा नव्हता, हे सिद्ध होईल. पण हे राजकीय वळण अत्यंत निर्णायकी आहे. महाराष्ट्राची ही राजकीय धारणाच नव्हती. ती बदललेल्या महाराष्ट्रातून निर्माण झाली आहे, असे म्हणावे लागले. त्यादृष्टीने २०१४ हे वर्ष महाराष्ट्राच्या वाटचालीत नोंद घेतले जाणारे आहे. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाचे सर्वांत मोठे व वेगळे वळण म्हणून २०१४ या वर्षाची नोंद होईल. याचे कारण महाराष्ट्राचे सामाजिक अंग व राजकारण देशातील अनेक प्रांतांपेक्षा वेगळे आहे. शिवाय महाराष्ट्राची वाटचालही वेगळी आहे. त्यामुळे आजचे महाराष्ट्र राज्याचे राजकीय वास्तव हे काही प्रमाणात विसंगतही वाटते, पण त्याचे कारण मुख्यत: महाराष्ट्रच बदलला आहे. त्याचे भान सातत्याने सत्तेवर राहिलेल्या कॉँग्रेस पक्षाकडून सुटले आणि महाराष्ट्रात भाजपासारख्या पक्षाची सत्ता कधी येईल, असे वाटत नव्हते. ते घडले आहे.- वसंत भोसले