शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

उष्ण लाटांनी महाराष्ट्र होरपळला

By admin | Updated: April 16, 2017 03:00 IST

मार्च ते मे हे महिने सर्वसाधारणपणे उन्हाळ्याचे. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत महाराष्ट्रात खूपच उष्ण असतात. महाराष्ट्रातील सगळ्याच भागांत कोकण,

- शुभांगी भुते मार्च ते मे हे महिने सर्वसाधारणपणे उन्हाळ्याचे. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत महाराष्ट्रात खूपच उष्ण असतात. महाराष्ट्रातील सगळ्याच भागांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दिवसा सरासरी तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच असतो. मुळात उष्णता वाढण्यामागचे कारण असे की, गुजरात राज्यावर एक प्रतिचक्रिवादळ तयार होत असते आणि यातून महाराष्ट्रात येणारे वारे सहसा शुष्क आणि उष्ण असतात. त्यामुळे आर्द्रतेतसुद्धा कमालीचे चढउतार पाहाण्यास मिळतात.सद्यस्थितीमध्ये म्हणजे या वर्षी आपण जे तापमान पाहतो, हा त्याचाच भाग आहे. सध्या प्रतिचक्रिवादळ गुजरात राज्यावर असल्यामुळे, आपल्या महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिउष्ण लहरी येतात. दिवसाचे कमाल तापमान सरासरी तापमानात तफावत वाढते आणि सध्याचे तापमान संपूर्ण ४० अंशाच्या जवळपास पोहोचले आहे. विदर्भात तर ४३-४४ अंशापर्यंत कमाल तापमान पोहोचले आहे. काही संशोधनात हे सत्य समोर आले आहे की, अतितीव्र ‘अल निनो’ चा प्रभाव म्हणून येणारे वर्ष हे अतिउष्ण पाहिले गेले आहे. या वर्षी आपल्याला त्याचाच प्रत्यय येत आहे. मराठवाडा आणि विदर्भ हे तर उष्ण वातावरणाचे मुख्य प्रदेश आहेत.जसजसा उन्हाळा सरकत जाईल, तसतसे तापमान अधिकाधिक वाढल्याचे पाहाण्यास मिळेल. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वअनुमानानुसार सरासरी तापमान १ अंशाने जास्त राहाण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तसेच उष्ण लहरींची पण तीव्रता जास्त राहाण्याची शक्यता आहे आणि सध्या आपण त्याचाच अनुभव घेत आहोत. भिरा, चंद्रपूर, सांगली, सातारा, महाबळेश्वर आणि डहाणूसह इतरत्र पारा ४० अंशावर आहे आणि उन्हाळ्याचा कहर पाहता, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ऊन्हाचे प्रमाण आणखी वाढल्याचे पाहाण्यास मिळणार आहे.दरम्यान, सर्वसाधारणपणे मार्च महिन्याच्या शेवटी तापमान वाढल्याचे आपणास निदर्शनास आले आहे. मध्यंतरी गुजरातमध्ये निर्माण झालेले चक्रिवादळ उष्ण लाटा निर्माण करत आहे आणि याच उष्ण लाटा महाराष्ट्राला होरपळून टाकत आहेत. उष्णतेच्या लाटेचे प्रमाण विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अधिक आहे. परिणामी, येथील कमाल तापमान ४० अंशावर पोहोचले आहे.हवामान विभागाने यापूर्वीच दिलेल्या पूर्वानुमानानुसार, मागील तीनएक दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट आहे आणि पुढील ४८ तासांसाठी येथे उष्णतेची लाट राहील, असा अंदाज यापूर्वीच वर्तवण्यात आला आहे. एकंदर गुजरातवरील प्रतिचक्रिवादळ उष्णतेच्या लाटांना कारणीभूत असून, महाराष्ट्रात येणारे शुष्क आणि उष्ण वारे, शिवाय आर्द्रतेतील कमालीचे चढउतार तापमानवाढीस कारणीभूत असल्याने, चैत्रातल्या उष्ण लाटांनी महाराष्ट्र होरपळून निघाला आहे.

(लेखिका मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राच्या संचालिका आहेत.)