शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

उष्ण लाटांनी महाराष्ट्र होरपळला

By admin | Updated: April 16, 2017 03:00 IST

मार्च ते मे हे महिने सर्वसाधारणपणे उन्हाळ्याचे. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत महाराष्ट्रात खूपच उष्ण असतात. महाराष्ट्रातील सगळ्याच भागांत कोकण,

- शुभांगी भुते मार्च ते मे हे महिने सर्वसाधारणपणे उन्हाळ्याचे. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत महाराष्ट्रात खूपच उष्ण असतात. महाराष्ट्रातील सगळ्याच भागांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दिवसा सरासरी तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच असतो. मुळात उष्णता वाढण्यामागचे कारण असे की, गुजरात राज्यावर एक प्रतिचक्रिवादळ तयार होत असते आणि यातून महाराष्ट्रात येणारे वारे सहसा शुष्क आणि उष्ण असतात. त्यामुळे आर्द्रतेतसुद्धा कमालीचे चढउतार पाहाण्यास मिळतात.सद्यस्थितीमध्ये म्हणजे या वर्षी आपण जे तापमान पाहतो, हा त्याचाच भाग आहे. सध्या प्रतिचक्रिवादळ गुजरात राज्यावर असल्यामुळे, आपल्या महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिउष्ण लहरी येतात. दिवसाचे कमाल तापमान सरासरी तापमानात तफावत वाढते आणि सध्याचे तापमान संपूर्ण ४० अंशाच्या जवळपास पोहोचले आहे. विदर्भात तर ४३-४४ अंशापर्यंत कमाल तापमान पोहोचले आहे. काही संशोधनात हे सत्य समोर आले आहे की, अतितीव्र ‘अल निनो’ चा प्रभाव म्हणून येणारे वर्ष हे अतिउष्ण पाहिले गेले आहे. या वर्षी आपल्याला त्याचाच प्रत्यय येत आहे. मराठवाडा आणि विदर्भ हे तर उष्ण वातावरणाचे मुख्य प्रदेश आहेत.जसजसा उन्हाळा सरकत जाईल, तसतसे तापमान अधिकाधिक वाढल्याचे पाहाण्यास मिळेल. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वअनुमानानुसार सरासरी तापमान १ अंशाने जास्त राहाण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तसेच उष्ण लहरींची पण तीव्रता जास्त राहाण्याची शक्यता आहे आणि सध्या आपण त्याचाच अनुभव घेत आहोत. भिरा, चंद्रपूर, सांगली, सातारा, महाबळेश्वर आणि डहाणूसह इतरत्र पारा ४० अंशावर आहे आणि उन्हाळ्याचा कहर पाहता, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ऊन्हाचे प्रमाण आणखी वाढल्याचे पाहाण्यास मिळणार आहे.दरम्यान, सर्वसाधारणपणे मार्च महिन्याच्या शेवटी तापमान वाढल्याचे आपणास निदर्शनास आले आहे. मध्यंतरी गुजरातमध्ये निर्माण झालेले चक्रिवादळ उष्ण लाटा निर्माण करत आहे आणि याच उष्ण लाटा महाराष्ट्राला होरपळून टाकत आहेत. उष्णतेच्या लाटेचे प्रमाण विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अधिक आहे. परिणामी, येथील कमाल तापमान ४० अंशावर पोहोचले आहे.हवामान विभागाने यापूर्वीच दिलेल्या पूर्वानुमानानुसार, मागील तीनएक दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट आहे आणि पुढील ४८ तासांसाठी येथे उष्णतेची लाट राहील, असा अंदाज यापूर्वीच वर्तवण्यात आला आहे. एकंदर गुजरातवरील प्रतिचक्रिवादळ उष्णतेच्या लाटांना कारणीभूत असून, महाराष्ट्रात येणारे शुष्क आणि उष्ण वारे, शिवाय आर्द्रतेतील कमालीचे चढउतार तापमानवाढीस कारणीभूत असल्याने, चैत्रातल्या उष्ण लाटांनी महाराष्ट्र होरपळून निघाला आहे.

(लेखिका मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राच्या संचालिका आहेत.)