शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गांवरील दारूबंदी सरकारी धोरणानुसारच

By admin | Updated: April 18, 2017 01:18 IST

सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकार विरुद्ध के. बाळू व इतर, या केसमध्ये राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतरापर्यंत दारूबंदी आणली.

- अ‍ॅड. अभय नेवगी, (उच्च व सर्वोच्च न्यायालयातील वकील)सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकार विरुद्ध के. बाळू व इतर, या केसमध्ये राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतरापर्यंत दारूबंदी आणली. या आदेशामुळे सर्वोच्च न्यायालय शासनाच्या धोरण ठरविण्याच्या अधिकारावर अतिक्रमण करीत असल्याची टीका होऊ लागली. वास्तविकरीत्या, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र वा राज्यशासनाच्या अधिकारांवर कसलेही अतिक्रमण केलेले नाही.सर्वोच्च न्यायालयाने २०१३ साली तामिळनाडू राज्यशासनाने दाखल केलेली याचिका सुनावणीसाठी घेतली. त्याचबरोबर हरियाणा राज्यशासनाचीदेखील याचिकाही होती. या दोन्ही याचिका संबंधित उच्च न्यायालयांनी दिलेल्या दारूबंदीच्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने दि. १५ डिसेंबर २०१६ ला या दोन्हींही याचिका फेटाळून लावल्या. सर्वप्रथम ५०० मीटर अंतरापर्यंत दारूबंदीचा आदेश दिला. हा आदेश देत असताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्रशासनाने नॅशनल रोड सेफ्टी कौन्सिल या मोटार व्हेईकल अ‍ॅक्ट १९८८ कलम २१५ अन्वये १५ जानेवारी २००४ला घेतलेल्या निर्णयाचा पाया म्हणून विचार केला. या निर्णयाने केंद्रशासनाने सर्व राज्य शासनांना राष्ट्रीय महामार्गावरील दारूची दुकाने हटवावीत, असा आदेश दि. २६ आॅक्टोबर २००७ला काढला. हा आदेश अंमलात आणावा म्हणून केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विभागाने दि. २६ आॅक्टोबर २००७ पासून सर्व राज्यशासनांकडे दारूची दुकाने हटवावीत व नवीन परवाने देऊ नयेत म्हणून सूचना केली. दि. १ डिसेंबर २०१५ला या मंत्रालयाने राज्यशासन व केंद्रशासनाच्या मुख्य सचिवांना २००९ या वर्षातील अपघातांची आकडेवारी नमूद करून सांगितले की, देशामध्ये प्रत्येक चार मिनिटाला एक अपघात होतो. दारू पिऊन होणाऱ्या अपघातांचे प्रमाण जास्त असून, या वर्षात २७ हजार १५२ अपघात हे दारूच्या अंमलाखाली असल्यामुळे झालेले आहेत. या आदेशामध्ये मोटार व्हेईकल अ‍ॅक्ट, १९८८ मधील विविध तरतुदी नमूद केल्या होत्या. त्यामध्ये असेही नमूद केले होते की, मोटार व्हेईकल अ‍ॅक्ट, १९८८ कलम १८५ प्रमाणे संसदेची भूमिका ही मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांना कोणतीही दया दाखवू नये, अशी होती. याच अनुषंगाने परत एकदा दि. २८ मार्च २०१३ला याच खात्याने सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना परत एकदा हीच विनंती करून कळविले की, २०११ साली एक लाख ४२ हजार व्यक्तीचार लाख ९० हजार अपघातांमध्ये मृत्यू पावलेल्या असून, त्यापैकी २४ हजार ६६५ इतके अपघात हे दारू पिऊन वाहन चालविल्याने झाले असून, यामध्ये १० हजार ५५३ व्यक्तींचा मृत्यू झालेला असून, २१ हजार १४८ व्यक्ती जखमी झालेल्या आहेत. हाच आदेश केंद्रशासनाने परत एकदा दि. २१ मे २०१४ला काढला. त्यात नमूद केले की, २०१२ साली चार लाख ९० हजार अपघात झाले असून, त्यात एक लाख ३८ हजार व्यक्तींचा मृत्यू झालेला असून, यापैकी ५८३५ इतके मृत्यू मद्यपान करून वाहन चालविल्यामुळे झालेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल देताना, मद्यपान करून वाहन चालविण्याबाबत केंद्रशासनाने दिलेला हा सर्व तपशील लक्षात घेऊन या धोरणाची अमलबजावणी आवश्यक असल्याचे नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाने केंद्रशासनाच्या धोरणामधील स्पष्ट शब्दांत उल्लेख केलेला आदेशही नमूद केला. केंद्रशासनाने हे अंतर १०० ते १२० किलोमीटर असावे, असे नमूद केलेले होते. सर्वोच्च न्यायालयाने दारू विक्रीचा धंदा हा मूलभूत हक्क नसल्याचे यापूर्वीच्या स्वत:च्याच निकालाच्या आधारावर नमूद केले. असा सर्व तपशील नमूद करून केंद्रशासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी व मद्यप्राशन करून होणाऱ्या अपघातांना आळा बसविण्यासाठी हा निकाल दि. १५ डिसेंबर २०१६ला दिला. याची अंमलबजावणी दि. १ एप्रिल २०१७ पासून करण्याचा आदेश दिला. या आदेशानंतर पुनर्विचार करावा किंवा दुरुस्ती करावी किंवा वेळ वाढवून द्यावा, अशा ६८ याचिका दाखल झाल्या. यामध्ये आठ राज्यशासनांचा समावेश होता. मध्य प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयाला आपण या आदेशाची अंमलबजावणी करीत आहोत, असे सांगितले. दिल्ली पर्यटन विभागानेदेखील अंमलबजावणी करीत असल्याचे सांगितले; पण कालावधी वाढवून मागितला. अशीच भूमिका आंध्र प्रदेश व तेलंगण यांनीही घेतली. तामिळनाडू सरकारने परत एकदा हा निर्णय शासनाच्या अधिकारावर अतिक्रमण असल्याचे सांगून अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनीही भूमिका मांडली; परंतु केंद्रशासनाने मात्र स्वच्छ शब्दांत या निकालाचा पाठपुरावा केला. या सर्व याचिकांचा विचार करून सर्वाेच्च न्यायालयाने या सर्व याचिका दि. ३१ मार्च २०१७ ला फेटाळून लावल्या. या याचिका फेटाळून लावताना सर्वाेच्च न्यायालयाने मेघालय व सिक्किम या दोन सरकारांना डोंगराळ भाग असल्याने ५०० मीटरची अंमलबजावणीबाबत सवलत दिली. बाकीच्या सर्व शासनांच्या मुदतवाढीच्या याचिका फेटाळल्या. या दोन्हीही निकालांचा अभ्यास केला, तर सर्वाेच्च न्यायालयाने संसदेच्या धोरणांची अंमलबजावणी केली असून, कोणत्याही शासनाच्या अधिकारावर कसलेही अतिक्रमण केलेले नाही.