शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

माणुसकी जपूया, मुक्या जीवांची काळजी घेऊया!

By किरण अग्रवाल | Updated: May 12, 2024 11:45 IST

Let's preserve humanity : तापमानाचा पारा टिपेस पोहोचला आहे. निसर्गाला मंजूळ स्वर देणाऱ्या पशुपक्ष्यांना या स्थितीत जपणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांना बसणारा चटका, त्यांची तहान जाणून घेत व माणुसकी जपत त्यांच्यासाठी शक्य असेल तसे दाणा-पाण्याची व्यवस्था करूया..!

- किरण अग्रवाल

  

उन्हाचा चटका मनुष्यप्राण्यालाच घायाळ करणारा व त्याच्या घशाला कोरड पाडणारा असल्याने मुक्या जीवांचे काय, असा प्रश्न संवेदनशील मनांना अस्वस्थ करणाराच ठरत आहे. याबाबतही निव्वळ प्रशासनाकडे बोट दाखविण्यापेक्षा माणुसकी धर्माला जागत प्रत्येकाने आपापल्या परीने व्यवस्था करण्याची अपेक्षा गैर ठरू नये.

अकोल्यातील उन्हाळा तसाही इतरांना घाम फोडणाराच ठरत असतो. यंदा तर सूर्य जरा जास्तच आग ओकत असल्याचे चित्र आहे, त्यामुळे पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. अकोलाच नव्हे, तर बुलढाणा व वाशिम याही जिल्ह्यांमधील लहानमोठ्या प्रकल्पातील जलसाठा गतवर्षाच्या तुलनेने खूपच खालावला आहे. उन्हाचा कडाका मोठा असल्याने बाष्पीभवनही वेगाने घडून येत आहे, त्यामुळे आहे तो जलसाठाही लवकरच अपुरा पडण्याची चिन्हे आहेत.

मुद्दा असा की, हा उन्हाचा चटका केवळ मनुष्यांनाच बसत नसून पशुपक्ष्यांचेही अंग भाजून काढणारा ठरत आहे. पाणीटंचाईची समस्या मनुष्यासाठी आहे, तशी पशुपक्ष्यांसाठीही आहे. मनुष्य तरी आरडाओरड करू शकतो, मुक्या प्राण्यांनी बिचाऱ्यांनी काय करावे? तेव्हा याही दृष्टीने नियोजन व उपाययोजना होणे गरजेचे आहे.

मनुष्याला लागते, तसे पाळीव प्राण्यांनाही ऊन लागण्याच्या घटना वाढू लागल्या असून, पशुचिकित्सालयांमध्ये गर्दी वाढली आहे. पशुखाद्यांचे भावही कमालीचे वाढले आहेत. एकतर शेती कसण्यासाठी राहिली नाही आणि दुसरीकडे पशुधन सांभाळणे अवघड ठरत आहे, त्यामुळे गुरांच्या बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या जनावरांची संख्याही वाढून गेली आहे. कदाचित इतरांना या गोष्टीची तीव्रता तितकीशी जाणवणारही नसेल, मात्र संबंधित घटकाची म्हणजे बळीराजाची या संदर्भातील उलाघाल असह्य ठरणारीच आहे. कोणत्याही शेतकरी कुटुंबासाठी त्याच्याकडील बैल असो, की दुभते जनावर; हे कुटुंबातल्या सदस्या सारखेच असते. पण उन्हाच्या कडाक्यात त्यांना कसे तगवायचे? त्यांच्यासाठी चारा-पाणी कुठून जुळवायचे? अशा विवंचनेत अनेक कुटुंबे आहेत.

अर्थात हेदेखील झाले पाळीव प्राण्यांचे. भटक्या पशुप्राण्यांची अवस्था तर खूपच दयनीय होते आहे. त्यांनाही पिण्याच्या पाण्याचीच मारामार, तर खाण्याचे काय असा प्रश्न आहे. त्यामुळे भूतदया दाखवीत या मुक्या जीवांची काळजी घेण्यासाठी प्रत्येकानेच स्वयंस्फूर्तीने पुढे येणे गरजेचे आहे. हे कामही शासनाने किंवा यंत्रणांनीच करावे अशी अपेक्षा न ठेवता, यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. जंगल क्षेत्रात वनविभागातर्फे कृत्रिम पाणवठे तयार केले जात आहेतच, शहरात नागरिकांनी पुढाकार घ्यायला हवा. संत एकनाथांनी व्याकुळ गाढवाला पाणी पाजल्याचा आदर्श आपल्यासमोर आहेच. संतांची हीच शिकवण आचरणात आणण्याची गरज आहे.

आपल्याकडे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांकडून तसेच संध्याकाळी काही जणांकडून रस्त्यातील भटक्या कुत्र्यांना बिस्किटे वा टोस्ट खाऊ घातले जातात ही खूप समाधानाची बाब आहे. उन्हाचा वाढता कडाका लक्षात घेता त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्थाही करायला हवी. काही ठिकाणी ती केलीही जात आहे, त्याचे प्रमाण वाढायला हवे. ‘लोकमत’मधून केल्या जात असलेल्या जनजागृती व पाठपुराव्यामुळे अनेक कुटुंबात लहान मुलांना यासंबंधीची जबाबदारी देण्यात आली असून, ते पक्ष्यांसाठी घराच्या बाल्कनीत, अंगणात वा छतावर पाण्याचे भांडे ठेवत आहेत, त्यांच्यासाठी दाण्याची सोय करत आहेत. या कृतीतून होणारे भूतदयचे व माणुसकीचे संस्कार महत्त्वाचे ठरतील.

सारांशात, उन्हाचा चटका केवळ मनुष्यालाच बसत नसून तो मुक्या जीवांनाही बसत आहे, तेव्हा भटक्या मुक्या जीवांचे उन्हापासून रक्षण करतानाच त्यांच्यासाठी दाणापाण्याची काळजी घेऊया... तीच खरी भूतदया व तोच खरा माणुसकी धर्म!