शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

माणुसकी जपूया, मुक्या जीवांची काळजी घेऊया!

By किरण अग्रवाल | Updated: May 12, 2024 11:45 IST

Let's preserve humanity : तापमानाचा पारा टिपेस पोहोचला आहे. निसर्गाला मंजूळ स्वर देणाऱ्या पशुपक्ष्यांना या स्थितीत जपणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांना बसणारा चटका, त्यांची तहान जाणून घेत व माणुसकी जपत त्यांच्यासाठी शक्य असेल तसे दाणा-पाण्याची व्यवस्था करूया..!

- किरण अग्रवाल

  

उन्हाचा चटका मनुष्यप्राण्यालाच घायाळ करणारा व त्याच्या घशाला कोरड पाडणारा असल्याने मुक्या जीवांचे काय, असा प्रश्न संवेदनशील मनांना अस्वस्थ करणाराच ठरत आहे. याबाबतही निव्वळ प्रशासनाकडे बोट दाखविण्यापेक्षा माणुसकी धर्माला जागत प्रत्येकाने आपापल्या परीने व्यवस्था करण्याची अपेक्षा गैर ठरू नये.

अकोल्यातील उन्हाळा तसाही इतरांना घाम फोडणाराच ठरत असतो. यंदा तर सूर्य जरा जास्तच आग ओकत असल्याचे चित्र आहे, त्यामुळे पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. अकोलाच नव्हे, तर बुलढाणा व वाशिम याही जिल्ह्यांमधील लहानमोठ्या प्रकल्पातील जलसाठा गतवर्षाच्या तुलनेने खूपच खालावला आहे. उन्हाचा कडाका मोठा असल्याने बाष्पीभवनही वेगाने घडून येत आहे, त्यामुळे आहे तो जलसाठाही लवकरच अपुरा पडण्याची चिन्हे आहेत.

मुद्दा असा की, हा उन्हाचा चटका केवळ मनुष्यांनाच बसत नसून पशुपक्ष्यांचेही अंग भाजून काढणारा ठरत आहे. पाणीटंचाईची समस्या मनुष्यासाठी आहे, तशी पशुपक्ष्यांसाठीही आहे. मनुष्य तरी आरडाओरड करू शकतो, मुक्या प्राण्यांनी बिचाऱ्यांनी काय करावे? तेव्हा याही दृष्टीने नियोजन व उपाययोजना होणे गरजेचे आहे.

मनुष्याला लागते, तसे पाळीव प्राण्यांनाही ऊन लागण्याच्या घटना वाढू लागल्या असून, पशुचिकित्सालयांमध्ये गर्दी वाढली आहे. पशुखाद्यांचे भावही कमालीचे वाढले आहेत. एकतर शेती कसण्यासाठी राहिली नाही आणि दुसरीकडे पशुधन सांभाळणे अवघड ठरत आहे, त्यामुळे गुरांच्या बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या जनावरांची संख्याही वाढून गेली आहे. कदाचित इतरांना या गोष्टीची तीव्रता तितकीशी जाणवणारही नसेल, मात्र संबंधित घटकाची म्हणजे बळीराजाची या संदर्भातील उलाघाल असह्य ठरणारीच आहे. कोणत्याही शेतकरी कुटुंबासाठी त्याच्याकडील बैल असो, की दुभते जनावर; हे कुटुंबातल्या सदस्या सारखेच असते. पण उन्हाच्या कडाक्यात त्यांना कसे तगवायचे? त्यांच्यासाठी चारा-पाणी कुठून जुळवायचे? अशा विवंचनेत अनेक कुटुंबे आहेत.

अर्थात हेदेखील झाले पाळीव प्राण्यांचे. भटक्या पशुप्राण्यांची अवस्था तर खूपच दयनीय होते आहे. त्यांनाही पिण्याच्या पाण्याचीच मारामार, तर खाण्याचे काय असा प्रश्न आहे. त्यामुळे भूतदया दाखवीत या मुक्या जीवांची काळजी घेण्यासाठी प्रत्येकानेच स्वयंस्फूर्तीने पुढे येणे गरजेचे आहे. हे कामही शासनाने किंवा यंत्रणांनीच करावे अशी अपेक्षा न ठेवता, यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. जंगल क्षेत्रात वनविभागातर्फे कृत्रिम पाणवठे तयार केले जात आहेतच, शहरात नागरिकांनी पुढाकार घ्यायला हवा. संत एकनाथांनी व्याकुळ गाढवाला पाणी पाजल्याचा आदर्श आपल्यासमोर आहेच. संतांची हीच शिकवण आचरणात आणण्याची गरज आहे.

आपल्याकडे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांकडून तसेच संध्याकाळी काही जणांकडून रस्त्यातील भटक्या कुत्र्यांना बिस्किटे वा टोस्ट खाऊ घातले जातात ही खूप समाधानाची बाब आहे. उन्हाचा वाढता कडाका लक्षात घेता त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्थाही करायला हवी. काही ठिकाणी ती केलीही जात आहे, त्याचे प्रमाण वाढायला हवे. ‘लोकमत’मधून केल्या जात असलेल्या जनजागृती व पाठपुराव्यामुळे अनेक कुटुंबात लहान मुलांना यासंबंधीची जबाबदारी देण्यात आली असून, ते पक्ष्यांसाठी घराच्या बाल्कनीत, अंगणात वा छतावर पाण्याचे भांडे ठेवत आहेत, त्यांच्यासाठी दाण्याची सोय करत आहेत. या कृतीतून होणारे भूतदयचे व माणुसकीचे संस्कार महत्त्वाचे ठरतील.

सारांशात, उन्हाचा चटका केवळ मनुष्यालाच बसत नसून तो मुक्या जीवांनाही बसत आहे, तेव्हा भटक्या मुक्या जीवांचे उन्हापासून रक्षण करतानाच त्यांच्यासाठी दाणापाण्याची काळजी घेऊया... तीच खरी भूतदया व तोच खरा माणुसकी धर्म!