शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकी जपूया, मुक्या जीवांची काळजी घेऊया!

By किरण अग्रवाल | Updated: May 12, 2024 11:45 IST

Let's preserve humanity : तापमानाचा पारा टिपेस पोहोचला आहे. निसर्गाला मंजूळ स्वर देणाऱ्या पशुपक्ष्यांना या स्थितीत जपणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांना बसणारा चटका, त्यांची तहान जाणून घेत व माणुसकी जपत त्यांच्यासाठी शक्य असेल तसे दाणा-पाण्याची व्यवस्था करूया..!

- किरण अग्रवाल

  

उन्हाचा चटका मनुष्यप्राण्यालाच घायाळ करणारा व त्याच्या घशाला कोरड पाडणारा असल्याने मुक्या जीवांचे काय, असा प्रश्न संवेदनशील मनांना अस्वस्थ करणाराच ठरत आहे. याबाबतही निव्वळ प्रशासनाकडे बोट दाखविण्यापेक्षा माणुसकी धर्माला जागत प्रत्येकाने आपापल्या परीने व्यवस्था करण्याची अपेक्षा गैर ठरू नये.

अकोल्यातील उन्हाळा तसाही इतरांना घाम फोडणाराच ठरत असतो. यंदा तर सूर्य जरा जास्तच आग ओकत असल्याचे चित्र आहे, त्यामुळे पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. अकोलाच नव्हे, तर बुलढाणा व वाशिम याही जिल्ह्यांमधील लहानमोठ्या प्रकल्पातील जलसाठा गतवर्षाच्या तुलनेने खूपच खालावला आहे. उन्हाचा कडाका मोठा असल्याने बाष्पीभवनही वेगाने घडून येत आहे, त्यामुळे आहे तो जलसाठाही लवकरच अपुरा पडण्याची चिन्हे आहेत.

मुद्दा असा की, हा उन्हाचा चटका केवळ मनुष्यांनाच बसत नसून पशुपक्ष्यांचेही अंग भाजून काढणारा ठरत आहे. पाणीटंचाईची समस्या मनुष्यासाठी आहे, तशी पशुपक्ष्यांसाठीही आहे. मनुष्य तरी आरडाओरड करू शकतो, मुक्या प्राण्यांनी बिचाऱ्यांनी काय करावे? तेव्हा याही दृष्टीने नियोजन व उपाययोजना होणे गरजेचे आहे.

मनुष्याला लागते, तसे पाळीव प्राण्यांनाही ऊन लागण्याच्या घटना वाढू लागल्या असून, पशुचिकित्सालयांमध्ये गर्दी वाढली आहे. पशुखाद्यांचे भावही कमालीचे वाढले आहेत. एकतर शेती कसण्यासाठी राहिली नाही आणि दुसरीकडे पशुधन सांभाळणे अवघड ठरत आहे, त्यामुळे गुरांच्या बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या जनावरांची संख्याही वाढून गेली आहे. कदाचित इतरांना या गोष्टीची तीव्रता तितकीशी जाणवणारही नसेल, मात्र संबंधित घटकाची म्हणजे बळीराजाची या संदर्भातील उलाघाल असह्य ठरणारीच आहे. कोणत्याही शेतकरी कुटुंबासाठी त्याच्याकडील बैल असो, की दुभते जनावर; हे कुटुंबातल्या सदस्या सारखेच असते. पण उन्हाच्या कडाक्यात त्यांना कसे तगवायचे? त्यांच्यासाठी चारा-पाणी कुठून जुळवायचे? अशा विवंचनेत अनेक कुटुंबे आहेत.

अर्थात हेदेखील झाले पाळीव प्राण्यांचे. भटक्या पशुप्राण्यांची अवस्था तर खूपच दयनीय होते आहे. त्यांनाही पिण्याच्या पाण्याचीच मारामार, तर खाण्याचे काय असा प्रश्न आहे. त्यामुळे भूतदया दाखवीत या मुक्या जीवांची काळजी घेण्यासाठी प्रत्येकानेच स्वयंस्फूर्तीने पुढे येणे गरजेचे आहे. हे कामही शासनाने किंवा यंत्रणांनीच करावे अशी अपेक्षा न ठेवता, यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. जंगल क्षेत्रात वनविभागातर्फे कृत्रिम पाणवठे तयार केले जात आहेतच, शहरात नागरिकांनी पुढाकार घ्यायला हवा. संत एकनाथांनी व्याकुळ गाढवाला पाणी पाजल्याचा आदर्श आपल्यासमोर आहेच. संतांची हीच शिकवण आचरणात आणण्याची गरज आहे.

आपल्याकडे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांकडून तसेच संध्याकाळी काही जणांकडून रस्त्यातील भटक्या कुत्र्यांना बिस्किटे वा टोस्ट खाऊ घातले जातात ही खूप समाधानाची बाब आहे. उन्हाचा वाढता कडाका लक्षात घेता त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्थाही करायला हवी. काही ठिकाणी ती केलीही जात आहे, त्याचे प्रमाण वाढायला हवे. ‘लोकमत’मधून केल्या जात असलेल्या जनजागृती व पाठपुराव्यामुळे अनेक कुटुंबात लहान मुलांना यासंबंधीची जबाबदारी देण्यात आली असून, ते पक्ष्यांसाठी घराच्या बाल्कनीत, अंगणात वा छतावर पाण्याचे भांडे ठेवत आहेत, त्यांच्यासाठी दाण्याची सोय करत आहेत. या कृतीतून होणारे भूतदयचे व माणुसकीचे संस्कार महत्त्वाचे ठरतील.

सारांशात, उन्हाचा चटका केवळ मनुष्यालाच बसत नसून तो मुक्या जीवांनाही बसत आहे, तेव्हा भटक्या मुक्या जीवांचे उन्हापासून रक्षण करतानाच त्यांच्यासाठी दाणापाण्याची काळजी घेऊया... तीच खरी भूतदया व तोच खरा माणुसकी धर्म!