शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भाऊंच्या दुधात लातूरचे पाणी

By admin | Updated: July 4, 2016 05:38 IST

काही योजना पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून राबवायच्या असतात. वृक्षलागवडीच्या कामात हे दिसून आले. ज्यांनी ज्यांनी वृक्षारोपण केले त्या सगळ्यांचे खूप अभिनंदन!!

काही योजना पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून राबवायच्या असतात. वृक्षलागवडीच्या कामात हे दिसून आले. ज्यांनी ज्यांनी वृक्षारोपण केले त्या सगळ्यांचे खूप अभिनंदन!!राज्यात दोन कोटी झाडे लावण्याचा उत्तम उपक्रम शनिवार-रविवार उत्साहात पार पडला. एखादी सरकारी योजना मनापासून राबवली तर त्याला किती चांगले स्वरुप येऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना शंभर पैकी शंभर मार्क दिले पाहिजेत. एकाच दिवसात दोन कोटी झाडे लावण्याचा उपक्रम पहिल्यांदाच घडत आहे. याआधी वनमंत्री पतंगराव कदम यांनी १०० कोटी झाडे लावण्याची घोषणा केली. मात्र त्याचे पुढे काय झाले कोणालाही ठाऊक नाही. मात्र एक झाड लावण्यासाठी खड्डा खोदण्याचे किती, मातीचे किती, रोपट्याचे किती गुणीले १०० कोटी म्हणजे किती असे हिशोब करण्यात अधिकारी व्यस्त राहिले. परिणामी चांगल्या कल्पनेचे मातेरे झाले. याउलट काम मुनगंटीवार यांनी केले. ते वित्त मंत्रीही आहेत. दोन कोटी झाडांसाठी दहा पाच कोटी खर्च करणे आणि त्यातून झाडे लावणे त्यांना अशक्य नव्हते. पण तसे न करता हा विषय जनतेच्या घरात नेऊन ठेवण्याचे मोठे काम त्यांनी केले. त्या आधी गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये त्यांनी आधुनिक नर्सरीसाठी अठरा कोटींची तरतूद केली. ५० कोटी झाडांचे मिशन ठरवून बजेटमध्ये निधी ठेवला. त्यानंतर ते जनतेत गेले. २१ समाजाचे धर्मगुरु, विविध बँकांचे अधिकारी, उद्योग जगातले धुरीण, आर्ट आॅफ लिव्हींग ते रामदेवबाबा, पंतप्रधान ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे; त्यांनी भेटीगाठीचा सपाटा लावला. मंत्रिमंडळ कामाला लावले. पालक सचिव ते शाळेची मुलं, प्रत्येकाला झाडं का लावली गेली पाहिजेत हे पटवून देण्यासाठी हा माणूस मंत्रिपदाची झूल बाजूला सारुन राज्यभर दिवसरात्र फिरला. जो ज्या जाती धर्माचा आहे आणि त्या धर्मात ज्या झाडाचे महत्व आहे ते झाड लावा असे सांगण्यासही त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. मनापासून केलेल्या कामानेच लोकांना ही योजना आपली वाटू लागली. टक्केवारीत रमणाऱ्या मंत्री अधिकाऱ्यांना तुम्ही किती झाडे लावली तेवढेच सांगा असे विचारणारे सुधीरभाऊ वेडे वाटले असतीलही पण अशा वेडेपणातच क्रांतीची बिजे रोवली जातात हा इतिहास आहे. महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र ३.७ लाख चौरस मीटर आहे. पैकी केवळ ६० हजार चौरस मीटरवर झाडे आहेत. शासकीय नियमानुसार ३३ टक्के वनक्षेत्र निर्माण होण्यासाठी ४०० कोटी झाडे लावण्याची गरज आहे. हे काम सरकार नावाच्या यंत्रणेकडून करायचे ठरवले तर पुढच्या कैक पिढ्या जाव्या लागतील. मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे व फक्त ४.६५ टक्के जंगल शिल्लक आहे पण ज्या लातूरला रेल्वेने पाणी देण्याची वेळ आली तेथे तर फक्त ०.०७ टक्के एवढीच वृक्षसंपदा उरलेली आहे. जमिनीत पोषक द्रव्येच उरलेली नाहीत. एक हजार वर्षापूर्वीच्या पाण्याचा उपसा तरी किती करणार? ओसाड माळरानांमध्ये साधी चिमणी फिरकत नाही तेथे माणसं कशी राहाणार? पण याचा विचार लातूरच्या अधिकाऱ्यांना राहिला नाही. महानगरपालिकेने झाडांसाठी खड्डे केले पण त्यात रोपं नुसतीच ठेवून दिली. दुपारी ती रोपं झोपून गेली. लातूरच्या रविंद्र जगतापने हा प्रकार उघड केला. पाण्यासाठी दारोदार भटकण्याची वेळ आलेल्या या शहरात झाडं लावण्यातही असा करंटेपणा उघड व्हावा यासारखे दुर्देव नाही. बंद मंदिराचा गाभारा दुधाने भरण्याचा पण करणाऱ्या राज्यात दुसरा दूध टाकेल, मी पाणी टाकले तर काय बिघडले असा विचार करत सगळ्यांनी पाणी टाकल्याची कथा लहानपणी वाचली होती. पण आजही त्या वृत्तीचे अधिकारी जर राज्यात चांगल्या दुधात मिठाचा खडा टाकत असतील आणि त्याचे पातक येणाऱ्या अनेक पिढ्यांना भोगावे लागणार असेल तर असे वागणाऱ्या अधिकाऱ्यांना जनतेनेच भर चौकात फटके दिले पाहिजेत. सगळे काही सरकारनेच केले पाहिजे या वृत्तीतून कधीतरी बाहेर पडले पाहिजे. आज जर आम्ही या अशा योजनांमध्ये सक्रीय सहभागी झालो नाही, तर येणाऱ्या पिढ्या कधीही माफ करणार नाहीत. युती सरकारने योजना आणली असली तरी यात राजकारण न आणता शरद पवार आणि धनंजय मुंडे यांनी वृक्षारोपणात सहभाग घेतला, त्यांचेही अभिनंदन! चला आता झाडं जोपासूया...- अतुल कुलकर्णी