शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
5
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
6
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
7
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
8
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
9
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
11
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
12
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
13
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
14
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
19
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
20
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...

भाऊंच्या दुधात लातूरचे पाणी

By admin | Updated: July 4, 2016 05:38 IST

काही योजना पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून राबवायच्या असतात. वृक्षलागवडीच्या कामात हे दिसून आले. ज्यांनी ज्यांनी वृक्षारोपण केले त्या सगळ्यांचे खूप अभिनंदन!!

काही योजना पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून राबवायच्या असतात. वृक्षलागवडीच्या कामात हे दिसून आले. ज्यांनी ज्यांनी वृक्षारोपण केले त्या सगळ्यांचे खूप अभिनंदन!!राज्यात दोन कोटी झाडे लावण्याचा उत्तम उपक्रम शनिवार-रविवार उत्साहात पार पडला. एखादी सरकारी योजना मनापासून राबवली तर त्याला किती चांगले स्वरुप येऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना शंभर पैकी शंभर मार्क दिले पाहिजेत. एकाच दिवसात दोन कोटी झाडे लावण्याचा उपक्रम पहिल्यांदाच घडत आहे. याआधी वनमंत्री पतंगराव कदम यांनी १०० कोटी झाडे लावण्याची घोषणा केली. मात्र त्याचे पुढे काय झाले कोणालाही ठाऊक नाही. मात्र एक झाड लावण्यासाठी खड्डा खोदण्याचे किती, मातीचे किती, रोपट्याचे किती गुणीले १०० कोटी म्हणजे किती असे हिशोब करण्यात अधिकारी व्यस्त राहिले. परिणामी चांगल्या कल्पनेचे मातेरे झाले. याउलट काम मुनगंटीवार यांनी केले. ते वित्त मंत्रीही आहेत. दोन कोटी झाडांसाठी दहा पाच कोटी खर्च करणे आणि त्यातून झाडे लावणे त्यांना अशक्य नव्हते. पण तसे न करता हा विषय जनतेच्या घरात नेऊन ठेवण्याचे मोठे काम त्यांनी केले. त्या आधी गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये त्यांनी आधुनिक नर्सरीसाठी अठरा कोटींची तरतूद केली. ५० कोटी झाडांचे मिशन ठरवून बजेटमध्ये निधी ठेवला. त्यानंतर ते जनतेत गेले. २१ समाजाचे धर्मगुरु, विविध बँकांचे अधिकारी, उद्योग जगातले धुरीण, आर्ट आॅफ लिव्हींग ते रामदेवबाबा, पंतप्रधान ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे; त्यांनी भेटीगाठीचा सपाटा लावला. मंत्रिमंडळ कामाला लावले. पालक सचिव ते शाळेची मुलं, प्रत्येकाला झाडं का लावली गेली पाहिजेत हे पटवून देण्यासाठी हा माणूस मंत्रिपदाची झूल बाजूला सारुन राज्यभर दिवसरात्र फिरला. जो ज्या जाती धर्माचा आहे आणि त्या धर्मात ज्या झाडाचे महत्व आहे ते झाड लावा असे सांगण्यासही त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. मनापासून केलेल्या कामानेच लोकांना ही योजना आपली वाटू लागली. टक्केवारीत रमणाऱ्या मंत्री अधिकाऱ्यांना तुम्ही किती झाडे लावली तेवढेच सांगा असे विचारणारे सुधीरभाऊ वेडे वाटले असतीलही पण अशा वेडेपणातच क्रांतीची बिजे रोवली जातात हा इतिहास आहे. महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र ३.७ लाख चौरस मीटर आहे. पैकी केवळ ६० हजार चौरस मीटरवर झाडे आहेत. शासकीय नियमानुसार ३३ टक्के वनक्षेत्र निर्माण होण्यासाठी ४०० कोटी झाडे लावण्याची गरज आहे. हे काम सरकार नावाच्या यंत्रणेकडून करायचे ठरवले तर पुढच्या कैक पिढ्या जाव्या लागतील. मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे व फक्त ४.६५ टक्के जंगल शिल्लक आहे पण ज्या लातूरला रेल्वेने पाणी देण्याची वेळ आली तेथे तर फक्त ०.०७ टक्के एवढीच वृक्षसंपदा उरलेली आहे. जमिनीत पोषक द्रव्येच उरलेली नाहीत. एक हजार वर्षापूर्वीच्या पाण्याचा उपसा तरी किती करणार? ओसाड माळरानांमध्ये साधी चिमणी फिरकत नाही तेथे माणसं कशी राहाणार? पण याचा विचार लातूरच्या अधिकाऱ्यांना राहिला नाही. महानगरपालिकेने झाडांसाठी खड्डे केले पण त्यात रोपं नुसतीच ठेवून दिली. दुपारी ती रोपं झोपून गेली. लातूरच्या रविंद्र जगतापने हा प्रकार उघड केला. पाण्यासाठी दारोदार भटकण्याची वेळ आलेल्या या शहरात झाडं लावण्यातही असा करंटेपणा उघड व्हावा यासारखे दुर्देव नाही. बंद मंदिराचा गाभारा दुधाने भरण्याचा पण करणाऱ्या राज्यात दुसरा दूध टाकेल, मी पाणी टाकले तर काय बिघडले असा विचार करत सगळ्यांनी पाणी टाकल्याची कथा लहानपणी वाचली होती. पण आजही त्या वृत्तीचे अधिकारी जर राज्यात चांगल्या दुधात मिठाचा खडा टाकत असतील आणि त्याचे पातक येणाऱ्या अनेक पिढ्यांना भोगावे लागणार असेल तर असे वागणाऱ्या अधिकाऱ्यांना जनतेनेच भर चौकात फटके दिले पाहिजेत. सगळे काही सरकारनेच केले पाहिजे या वृत्तीतून कधीतरी बाहेर पडले पाहिजे. आज जर आम्ही या अशा योजनांमध्ये सक्रीय सहभागी झालो नाही, तर येणाऱ्या पिढ्या कधीही माफ करणार नाहीत. युती सरकारने योजना आणली असली तरी यात राजकारण न आणता शरद पवार आणि धनंजय मुंडे यांनी वृक्षारोपणात सहभाग घेतला, त्यांचेही अभिनंदन! चला आता झाडं जोपासूया...- अतुल कुलकर्णी