शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
5
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
6
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
7
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
8
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
9
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
10
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
11
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
12
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
13
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
14
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
15
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
16
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
17
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
18
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
19
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
20
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

काटजूंचे दात घशात

By admin | Updated: March 10, 2016 03:13 IST

प्रेस कौन्सीलचे अध्यक्ष असताना आपल्या पदाला ‘टूथलेस टायगर’ म्हणजे दात नसलेला वा खरे तर दात पाडलेला वाघ अशी उपमा ज्यांनी दिली होती ती सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू

प्रेस कौन्सीलचे अध्यक्ष असताना आपल्या पदाला ‘टूथलेस टायगर’ म्हणजे दात नसलेला वा खरे तर दात पाडलेला वाघ अशी उपमा ज्यांनी दिली होती ती सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांचे स्वत:चे दात आता त्याच सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या स्वत:च्याच घशात घातले आहेत. अलीकडच्या काळात त्यांनी स्वत:च्या लेखणी आणि वाणीला एक तर आवर घातला असावा अथवा त्यांच्या उद्गारांमधील माध्यमांचे स्वारस्य संपुष्टात आले असावे. परंतु मध्यंतरी तसे नव्हते. त्यांच्याकडून नित्यनवे आणि प्रक्षोभक असे काही तरी बाहेर पडत असे. त्याच काळात त्यांनी महात्मा गांधींना ब्रिटिशांचे तर सुभाषचन्द्र बोस यांना जपानचे एजंट म्हणून संबोधले होते. त्यावर अपेक्षेप्रमाणे संसदेत वादळी चर्चा झाली आणि न्या.काटजू यांच्या निषेधाचा ठराव संसदेत मंजूर झाला. संसदेने असा ठराव करणे म्हणजे आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणे होय आणि त्यामुळे हा ठराव विखंडित केला जावा अशी याचिका घेऊन काटजू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यावर ‘न्यायसखा’ (अ‍ॅमिकस क्यूरी) म्हणून विख्यात विधिज्ञ फली नरीमन यांची नियुक्ती केली. नरीमन यांनी त्यावर युक्तिवाद करताना काटजू यांची मागणी साफ शब्दात फेटाळून लावली. राज्यघटनेने संसदेला म्हणजे संसद सदस्यांना एक विशेष प्रकारचे संरक्षण बहाल केले आहे. त्यामुळे संसदेमध्ये उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाला घटनेचे संरक्षक कवच असून त्याची चिकित्सा करण्याचा अधिकार न्यायसंस्थेतील कोणत्याही पातळीवरील न्यायालयास नाही. न्यायमूर्ती असताना अनेकवार ज्यांनी त्यांच्या पुढ्यात युक्तिवाद केला त्या नरीमन यांंच्यावरच सर्वोच्च न्यायालयाने काटजू यांच्या याचिकेची गुणवत्ता तपासण्याची कामगिरी सुपूर्द करावी ही यातील अधिक लक्षणीय बाब. राज्यघटनेतील तरतूद तर स्पष्ट आहेच पण खुद्द सर्वोच्च न्यायालयातील सहा न्यायाधीशांच्या एका घटना पीठाने मागेच या विषयावर पुरेशी स्पष्टता अधोरेखित करुन ठेवली असल्याचेही नरीमन यांनी म्हटले आहे. सध्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरुन जो वाद सुरु आहे त्या वादाच्याही पार्श्वभूमीवर कोणत्या अभिव्यक्तीला घटनेचे संरक्षण आहे आणि कोणत्याला नाही हेदेखील नरीमन यांनी स्पष्ट करुन सांगितले आहे.