शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

काटजूंचे दात घशात

By admin | Updated: March 10, 2016 03:13 IST

प्रेस कौन्सीलचे अध्यक्ष असताना आपल्या पदाला ‘टूथलेस टायगर’ म्हणजे दात नसलेला वा खरे तर दात पाडलेला वाघ अशी उपमा ज्यांनी दिली होती ती सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू

प्रेस कौन्सीलचे अध्यक्ष असताना आपल्या पदाला ‘टूथलेस टायगर’ म्हणजे दात नसलेला वा खरे तर दात पाडलेला वाघ अशी उपमा ज्यांनी दिली होती ती सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांचे स्वत:चे दात आता त्याच सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या स्वत:च्याच घशात घातले आहेत. अलीकडच्या काळात त्यांनी स्वत:च्या लेखणी आणि वाणीला एक तर आवर घातला असावा अथवा त्यांच्या उद्गारांमधील माध्यमांचे स्वारस्य संपुष्टात आले असावे. परंतु मध्यंतरी तसे नव्हते. त्यांच्याकडून नित्यनवे आणि प्रक्षोभक असे काही तरी बाहेर पडत असे. त्याच काळात त्यांनी महात्मा गांधींना ब्रिटिशांचे तर सुभाषचन्द्र बोस यांना जपानचे एजंट म्हणून संबोधले होते. त्यावर अपेक्षेप्रमाणे संसदेत वादळी चर्चा झाली आणि न्या.काटजू यांच्या निषेधाचा ठराव संसदेत मंजूर झाला. संसदेने असा ठराव करणे म्हणजे आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणे होय आणि त्यामुळे हा ठराव विखंडित केला जावा अशी याचिका घेऊन काटजू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यावर ‘न्यायसखा’ (अ‍ॅमिकस क्यूरी) म्हणून विख्यात विधिज्ञ फली नरीमन यांची नियुक्ती केली. नरीमन यांनी त्यावर युक्तिवाद करताना काटजू यांची मागणी साफ शब्दात फेटाळून लावली. राज्यघटनेने संसदेला म्हणजे संसद सदस्यांना एक विशेष प्रकारचे संरक्षण बहाल केले आहे. त्यामुळे संसदेमध्ये उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाला घटनेचे संरक्षक कवच असून त्याची चिकित्सा करण्याचा अधिकार न्यायसंस्थेतील कोणत्याही पातळीवरील न्यायालयास नाही. न्यायमूर्ती असताना अनेकवार ज्यांनी त्यांच्या पुढ्यात युक्तिवाद केला त्या नरीमन यांंच्यावरच सर्वोच्च न्यायालयाने काटजू यांच्या याचिकेची गुणवत्ता तपासण्याची कामगिरी सुपूर्द करावी ही यातील अधिक लक्षणीय बाब. राज्यघटनेतील तरतूद तर स्पष्ट आहेच पण खुद्द सर्वोच्च न्यायालयातील सहा न्यायाधीशांच्या एका घटना पीठाने मागेच या विषयावर पुरेशी स्पष्टता अधोरेखित करुन ठेवली असल्याचेही नरीमन यांनी म्हटले आहे. सध्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरुन जो वाद सुरु आहे त्या वादाच्याही पार्श्वभूमीवर कोणत्या अभिव्यक्तीला घटनेचे संरक्षण आहे आणि कोणत्याला नाही हेदेखील नरीमन यांनी स्पष्ट करुन सांगितले आहे.