शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

श्रद्धेला मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 03:31 IST

केवळ कोकणात नव्हे, तर निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या दिवे आगार सुवर्ण गणेशाच्या चोरीच्या घटनेने फार मोठी खळबळ उडाली होती. तिथे सुरक्षेसाठी असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांचे खून करून

केवळ कोकणात नव्हे, तर निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या दिवे आगार सुवर्ण गणेशाच्या चोरीच्या घटनेने फार मोठी खळबळ उडाली होती. तिथे सुरक्षेसाठी असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांचे खून करून, भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इथल्या सुवर्ण गणेशाची चोरी झाली होती. यापूर्वी दानपेटी चोरीच्या घटनाही अनेकदा घडलेल्या आहेत. मात्र, थेट देवच पळवून नेल्याची घटना घडल्याने भाविकांच्या श्रद्धेलाच धक्का बसला होता. श्रद्धा आणि देवत्व या गोष्टी थेट कायद्यात बसत नसल्याने, कोर्ट-कचेरीत याचा निकाल कसा लागणार, याची चिंताही होती. मात्र, न्यायालयाने आरोपींना कायमची अद्दल घडवली. रायगड जिल्ह्यातील दिवे आगारमधील सुवर्ण गणेशाच्या मंदिरावर पाच वर्षांपूर्वी दरोडा टाकून, दोघा निष्पाप सुरक्षा रक्षकांचा अत्यंत निर्घृणपणे लोखंडी पहारींनी खून करून, सुवर्ण गणेशाची १ किलो ३२५ ग्रॅम सोन्याची प्राचीन मूर्ती व २२५ ग्रॅम वजनाचे अन्य सोन्याचे दागिने, असा ११ लाख २० हजार रु पये किमतीचा ऐवज लुटून नेणाºया १० दरोडेखोरांपैकी पाच जणांना आजन्म जन्मठेप आणि उर्वरित पाचपैकी तीन महिलांसह दोघांना सक्तमजुरीचा झालेली शिक्षा, ही त्या सुवर्ण गणेशानेच दिली असल्याची भावना दिवे आगारसह राज्यातील सर्व गणेशभक्तांची आहे. देव आणि भक्ती या संकल्पनेला जरी कायद्यात स्थान नसले, तरी सोन्याच्या गणपतीची चोरी करून, तो वितळवून त्यांची विक्री करणे, हा गुन्ह्याचा प्रकार केवळ नास्तिकता दर्शविणारा नाही, तर देव ही संकल्पना मानणाºया लाखो-करोडो लोकांच्या मनावर भावनिक वार करणारा असाच आहे. ‘रेअरेस्ट आॅफ द रेअरेस्ट’ अशा प्रकारच्या गुन्ह्यातच फाशीची शिक्षा देता येते आणि हा गुन्हा तसाच असल्याने फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकील अ‍ॅड. प्रसाद पाटील यांनी न्यायालयाकडे केली होती. पोलीस तपास यंत्रणेने धार्मिक भावना कुठेही दुखावणार नाही, याची सतत काळजीही घेतली. प्रारंभी हे दरोडेखोर देव आणि भक्ती यावर मोठी श्रद्धा असणाºया महाराष्ट्रातील नसावेत, अशी भावना पोलीस तपास यंत्रणेची होती. परिणामी, दिवे आगारपासून तपासास प्रारंभ केल्यावर सापडलेल्या एका तपासाच्या दुव्यानुसार पोलीस तपास पथके शेजारील राज्यातदेखील पोहोचली होती, पण अखेर दरोडेखोर आपल्याच राज्यातील असल्याचे निष्पन्न झाल्यावर, पोलीस तपास यंत्रणादेखील थक्क झाली.श्रद्धेला तडा देणाºया या घटनेबरोबरच, खुनासारख्या कृत्याला अखेर योग्य ती शिक्षा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. शेवटी श्रद्धा एखाद्या मूर्तीमध्ये नसते, तर ती आपल्या मनातही असते. दिवे आगारच्या घटनेनंतर जो निकाल लागला, त्यामुळे श्रद्धेला बळकटी प्राप्त झाली. ही जनमानसात उमटलेली भावना आजच्या समाजमनाचे प्रतिबिंब व्यक्त करते.

टॅग्स :Courtन्यायालय