शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धेला मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 03:31 IST

केवळ कोकणात नव्हे, तर निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या दिवे आगार सुवर्ण गणेशाच्या चोरीच्या घटनेने फार मोठी खळबळ उडाली होती. तिथे सुरक्षेसाठी असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांचे खून करून

केवळ कोकणात नव्हे, तर निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या दिवे आगार सुवर्ण गणेशाच्या चोरीच्या घटनेने फार मोठी खळबळ उडाली होती. तिथे सुरक्षेसाठी असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांचे खून करून, भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इथल्या सुवर्ण गणेशाची चोरी झाली होती. यापूर्वी दानपेटी चोरीच्या घटनाही अनेकदा घडलेल्या आहेत. मात्र, थेट देवच पळवून नेल्याची घटना घडल्याने भाविकांच्या श्रद्धेलाच धक्का बसला होता. श्रद्धा आणि देवत्व या गोष्टी थेट कायद्यात बसत नसल्याने, कोर्ट-कचेरीत याचा निकाल कसा लागणार, याची चिंताही होती. मात्र, न्यायालयाने आरोपींना कायमची अद्दल घडवली. रायगड जिल्ह्यातील दिवे आगारमधील सुवर्ण गणेशाच्या मंदिरावर पाच वर्षांपूर्वी दरोडा टाकून, दोघा निष्पाप सुरक्षा रक्षकांचा अत्यंत निर्घृणपणे लोखंडी पहारींनी खून करून, सुवर्ण गणेशाची १ किलो ३२५ ग्रॅम सोन्याची प्राचीन मूर्ती व २२५ ग्रॅम वजनाचे अन्य सोन्याचे दागिने, असा ११ लाख २० हजार रु पये किमतीचा ऐवज लुटून नेणाºया १० दरोडेखोरांपैकी पाच जणांना आजन्म जन्मठेप आणि उर्वरित पाचपैकी तीन महिलांसह दोघांना सक्तमजुरीचा झालेली शिक्षा, ही त्या सुवर्ण गणेशानेच दिली असल्याची भावना दिवे आगारसह राज्यातील सर्व गणेशभक्तांची आहे. देव आणि भक्ती या संकल्पनेला जरी कायद्यात स्थान नसले, तरी सोन्याच्या गणपतीची चोरी करून, तो वितळवून त्यांची विक्री करणे, हा गुन्ह्याचा प्रकार केवळ नास्तिकता दर्शविणारा नाही, तर देव ही संकल्पना मानणाºया लाखो-करोडो लोकांच्या मनावर भावनिक वार करणारा असाच आहे. ‘रेअरेस्ट आॅफ द रेअरेस्ट’ अशा प्रकारच्या गुन्ह्यातच फाशीची शिक्षा देता येते आणि हा गुन्हा तसाच असल्याने फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकील अ‍ॅड. प्रसाद पाटील यांनी न्यायालयाकडे केली होती. पोलीस तपास यंत्रणेने धार्मिक भावना कुठेही दुखावणार नाही, याची सतत काळजीही घेतली. प्रारंभी हे दरोडेखोर देव आणि भक्ती यावर मोठी श्रद्धा असणाºया महाराष्ट्रातील नसावेत, अशी भावना पोलीस तपास यंत्रणेची होती. परिणामी, दिवे आगारपासून तपासास प्रारंभ केल्यावर सापडलेल्या एका तपासाच्या दुव्यानुसार पोलीस तपास पथके शेजारील राज्यातदेखील पोहोचली होती, पण अखेर दरोडेखोर आपल्याच राज्यातील असल्याचे निष्पन्न झाल्यावर, पोलीस तपास यंत्रणादेखील थक्क झाली.श्रद्धेला तडा देणाºया या घटनेबरोबरच, खुनासारख्या कृत्याला अखेर योग्य ती शिक्षा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. शेवटी श्रद्धा एखाद्या मूर्तीमध्ये नसते, तर ती आपल्या मनातही असते. दिवे आगारच्या घटनेनंतर जो निकाल लागला, त्यामुळे श्रद्धेला बळकटी प्राप्त झाली. ही जनमानसात उमटलेली भावना आजच्या समाजमनाचे प्रतिबिंब व्यक्त करते.

टॅग्स :Courtन्यायालय