शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

केवळ माध्यमांमुळे

By admin | Updated: October 29, 2016 03:16 IST

केवळ माध्यमांनी धसास लावले म्हणूनच जशी मुहम्मद शहाबुद्दीन याची पुन्हा तुरुंगात रवानगी झाली तशीच वेळ आता रॉकी यादव नावाच्या एका दिवट्यावरदेखील आली आहे.

केवळ माध्यमांनी धसास लावले म्हणूनच जशी मुहम्मद शहाबुद्दीन याची पुन्हा तुरुंगात रवानगी झाली तशीच वेळ आता रॉकी यादव नावाच्या एका दिवट्यावरदेखील आली आहे. हे दोघे बिहारचे आणि तेथील सत्ताधाऱ्यांशी संबंधित. शहाबुद्दीन हा बिहारातील एक नामचिन गुंड, लालूंच्या पक्षाचा माजी खासदार आणि त्यांच्या गळातला ताईत तर रॉकी यादवची माता मनोरमादेवी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पक्षाची आमदार. रॉकीचे वडील बिंदी यादव हेही राजकारणात पण ते नावाला, त्यांची खरी ओळख म्हणजे ते गुंडांच्या टोळ्यांचे तारणहार. रॉकी यादव त्याच्या मोटारीने जात असताना, पाठीमागून आलेली एक मोटार त्याला मागे टाकून पुढे गेली व त्याचा याला इतका झणका आला की त्याने ती मोटार चालविणाऱ्या आदित्य सचदेवा या बाराव्या वर्गात शिकणाऱ्या मुलाची चक्क हत्त्याच करुन टाकली. पोलिसांनी रॉकीला अटक केली व त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हादेखील दाखल केला. पण पाटणा उच्च न्यायालयाने जसा शहाबुद्दीनला जामीन मंजूर केला होता, तसाच तो रॉकी यादवलादेखील केला. परंतु यातील लक्षणीय बाब म्हणजे गया येथील सत्र न्यायालयाने त्याआधी दोनदा रॉकीचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. पाटणा उच्च न्यायालयाने दोन्ही प्रकरणात घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात माध्यमांनी जोरात आवाज उठविला. त्यात सारा ठपका राज्य सरकारवर ठेवला आणि तोही तसा फार चुकीचा नव्हता. कदाचित या टीकेचा परिणाम म्हणून की काय बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्या न्यायालयाने जसा शहाबुद्दीनाचा जामीन रद्द केला तसाच रॉकी यादवचाही केला. नितीशकुमार यांनी बिहारात जो कडकतम दारुबंदी कायदा अंमलात आणला होता, त्या कायद्याखाली रॉकीमाता मनोरमादेवी यांच्या विरोधात अगोदरच एक खटला भरला गेला आहे. ही दोन्ही प्रकरणे लक्षात घेता वेळीच माध्यमांनी चोहो बाजूंनी रान पेटवले नसते तर कदाचित आज शहाबुद्दीन आणि रॉकी यादव हे दोघे गुंड त्यांचे पुढील प्रताप दाखविण्यासाठी मोकळेपणाने पाटण्यात फिरत राहिले असते. पण या दोन्ही प्रकरणांमध्ये खरे तर सर्वोच्च न्यायालयाने पाटणा उच्च न्यायालयाची ‘न्यायनिष्ठुरता’ तपासून पाहाण्याची गरज आहे. शहाबुद्दीन दोन खुनांचा दोषी ठरुन जन्मठेप भोगत होता तर रॉकीनेही खूनच केला होता. या पार्श्वभूमीवर व विशेषत: रॉकी प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने योग्य भूमिका घेतली असता उच्च न्यायालयाने वेगळी भूमिका घेण्याचे कारण काय?