शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

न्यायाधीशांची अंधश्रद्धा

By admin | Updated: January 19, 2017 00:04 IST

न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली कामकाज चालणाऱ्या मोहटादेवी देवस्थानने मंदिरात मूर्तीखाली दोन किलो सोने पुरले

न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली कामकाज चालणाऱ्या मोहटादेवी देवस्थानने मंदिरात मूर्तीखाली दोन किलो सोने पुरले. ही श्रद्धा की अंधश्रद्धा? सोने पुरण्यात कुठली तर्कबुद्धी व विवेकबुद्धी? याचे उत्तर न्यायव्यवस्थेने देणे आवश्यक आहे. दुर्दैवाने ते मिळत नाही. कुठलाही घोटाळा घडला की निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी होते. न्यायाधीशांनीच चौकशी करावी, असा कायदा नाही. मात्र, भारतीय घटनेप्रमाणे न्यायपालिका ही स्वतंत्र्य व्यवस्था असल्याने न्यायाधीश हे तटस्थपणे चौकशी करुन सत्य जनतेसमोर आणू शकतात, असा जनतेला व सरकारलाही विश्वास असतो. त्यामुळे अशी मागणी होते. न्यायपालिका तर्कशुद्ध व विवेकबुद्धीवर आधारित असल्याने तिच्याबद्दल सर्वसामान्य माणसाला आजही प्रचंड आदर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मोहटादेवी देवस्थानातील घोटाळ्याला मात्र न्यायव्यवस्था न्याय द्यायला तयार नाही, असे दिसते. या देवस्थानात श्रद्धेच्या नावाखाली लक्षावधी रुपयांचा सुवर्ण घोटाळा घडला आहे. त्याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर व पुराव्यानिशी वृत्तमालिका प्रसिद्ध केली. या देवस्थानचा थेट न्यायव्यवस्थेशी संबंध यासाठी आहे की प्रधान जिल्हा न्यायाधीश हे देवस्थानचे प्रमुख आहेत. देवस्थानवर पदसिद्ध अध्यक्ष म्हणून जिल्हा न्यायाधीश कार्यरत असतात. तालुका दिवाणी न्यायाधीशांसह तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपवनसंरक्षक हे शासकीय अधिकारीही देवस्थानचे पदसिद्ध सदस्य आहेत. कायदा राबविणारे व कायदा नीट राबविला जातो की नाही हे पाहणारे असे दोघेही विश्वस्तपदी असताना या देवस्थानने ब्रह्मांडातील ऊर्जा मिळविण्याच्या नावाखाली तब्बल १ किलो ८९० ग्रॅम सोन्याची अध्यात्मिक यंत्रे बनवली व ती मंदिरात मूर्तीखाली पुरली. त्यातून भाविकांना ऊर्जा मिळेल असा दावा केला गेला. ही सुवर्ण यंत्रे बनविण्यासाठी व त्यावरील मंत्रोच्चारासाठी तब्बल २४ लाख ८५ हजाराची बिदागी पंडिताला दिली गेली. गायीच्या पोटातून निघणारा ‘गोरोचन’ सारखा घटक या यंत्रावर संस्कार करण्यासाठी वापरला गेला. हे सगळे सांगोवांगी नाही. कागदावर लिखित स्वरुपात आहे. देवस्थानने तसे लिखित ठरावच केले आहेत. तत्कालीन जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या नावाचा या ठरावांमध्ये अनेकदा उल्लेख आहे. त्यांच्या अध्यक्षतेखालीच या बैठका झालेल्या दिसतात. २०१० ते गतवर्षी झालेल्या नवरात्रौत्सवापर्यंत ही सुवर्ण यंत्रे पुरण्याचा प्रकार सुरु होता. न्हावकर यांच्यानंतर आलेल्या सर्व अध्यक्षांनाही हा सर्व प्रकार माहित आहे. मात्र, यात कुणालाही काहीच आक्षेपार्ह वाटले नाही. विशेष म्हणजे मोहटा ग्रामस्थांनी यास विरोध केला. नागरिकांतून जे विश्वस्त असतात त्यांनी हरकत घेतलीे. मात्र, या विरोधाला कुणीही जुमानले नाही.कपाळावर भस्म फासून खेड्यात बुवाबाजी करणाऱ्या एखाद्या मांत्रिकाने हे सुवर्ण पुराण केले असते तर समजण्यासारखे होते. मात्र, न्यायाधीश अध्यक्ष असलेल्या संस्थेनेच अशी अंधश्रद्धा जोपासली. या सुवर्ण घोटाळ्यासह देवस्थानातील इतरही गैरप्रकारांबाबत मुख्यमंत्र्यांपासून उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्र्तींपर्यंत तक्रारी झाल्या आहेत. जिल्ह्याच्या प्रधान न्यायाधीशांनी याबाबत खुलासा करणे अपेक्षित आहे. मात्र, त्यांनी आजवर काहीच खुलासा केलेला नाही. न्यायाधीशच नव्हे तर कुठलाही सर्वसामान्य माणूस हा ‘धर्मनिरपेक्षता’ व ‘विज्ञाननिष्ठा’ या दोन संविधानिक तत्त्वांना बांधील असतो. त्यामुळे सोने मंदिरात पुरणे हे कायद्याच्या कोणत्या तत्वात बसते? हा न्यायनिवाडा होणे अपेक्षित आहे. न्यायाधीश अध्यक्ष असताना देवस्थानात गडबडी होतात हेही आश्चर्य आहे. त्यामुळे न्यायाधीश व इतर सामान्य माणूस यात काय फरक राहिला? न्यायाधीश अध्यक्षपदी असल्याने न्यायालयाची बेअदबी होईल या भीतीपोटी लोक देवस्थानाबाबत बोलणे टाळतात. इतर विश्वस्तही बोलायला घाबरतात. त्यामुळे सार्वजनिक न्यासाच्या ठिकाणी न्यायाधीश पदसिद्ध अध्यक्ष असावेत का? याचाच सरकारने फेरविचार करणे आवश्यक वाटते. - सुधीर लंके