शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
3
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
5
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
6
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
7
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
8
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
9
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
10
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
11
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
12
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
13
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
14
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
15
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
16
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
17
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
18
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
19
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
20
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना

जोवर आहे स्मरण....

By admin | Updated: January 8, 2017 01:27 IST

माणूस गेल्यानंतर त्याचं काय होतं? तो कुठे जातो, हा प्रश्न अनादी काळापासून माणसाला छळतो आहे, पण त्याचं उत्तर त्याला मिळालेला नाही. हा शोध न संपणारा आहे.

- रविप्रकाश कुलकर्णी

माणूस गेल्यानंतर त्याचं काय होतं? तो कुठे जातो, हा प्रश्न अनादी काळापासून माणसाला छळतो आहे, पण त्याचं उत्तर त्याला मिळालेला नाही. हा शोध न संपणारा आहे.पण त्यातूनच समाधान वाटावे, असे त्याला एक उत्तर मिळाले. अशी माणसं तुमच्या मनात जाऊन राहातात. त्याचं स्मरण असेपर्यंत ती राहातात, नाहीतर विस्मरणात जातात. त्यामुळेच म्हटलं जातं, जोवरी आहे स्मरण, त्याला काय करील मरण?मनाच्या कल्पनेनं कल्पित, इष्ट आराध्य व्यक्तीच म्हणा, शक्तीच म्हणा, त्याची पूजा तुम्ही इच्छिता, त्याप्रमाणे करायची, म्हणूनच मानसपूजेला सर्वश्रेष्ठ मानला गेलं आहे, पण सर्वसामान्य माणसाचं मन चंचल असतं. त्याला हा मनाचा खेळ झेपण्यासारखा नसतो. त्याला सर्व गोष्टी समोर दिसेनाशा वाटतात. त्याच्याप्रमाणे, तो कोडकौतुक करतो-करून घेतो. भक्तांच्या प्रमाणेच त्याचे देव असतात, असं जे म्हटलं, ते या अर्थात. जे देवांच्याबाबत तेच मग हाडामांसाच्या माणसाबाबत होऊ पाहातं. राहतो फरक तो कमी-जास्त करण्याबाबत. श्रद्धेने केलेले स्मरण हा मुळातला मानसपूजेचाच प्रकार, पण हे सगळ्यालाच कसं सोसणार आणि झेपणार? त्यातून पिंड, तर्पण ही कल्पना सुरू झाली. पुढे मूर्ती, फोटो प्रकार प्रगत अवस्थेप्रमाणे वाढत गेला.सिनेमा, चलत चित्रीकरण याचे स्मरण ही गोष्ट इथे येऊन ठेपला आहे.आपल्या आजूबाजूला असणारे पुतळे, स्मारके, स्थान संस्थान अशा पुढच्या गोष्टी येतात. त्याची अवस्था काय आहे, हेदेखील पाहायचे कष्ट किती घेतात? त्याचा परिणाम वगैरे गोष्टी फार पुढच्या....त्यात पुन्हा काही पुतळ्यांचे उद्घाटन होत आहे, तर दुसरीकडे नवे पुतळे उभारण्याची लाटच सुरू झाली आहे. याची संगती लावायची कशी?हे सगळं कलाबाह्यतेकडे झुकत आहे. कलेऐवजी अ-कलाकडे चालत आहे, असे वाटायला लागतं. अलीकडे पुन्हा-पुन्हा हा विचार मनात येतो. त्याच कारणही तसेच आजूबाजूला घडतं-बिघडतं आहे म्हणून. गायक महंमद रफी यांचं स्मारक ते जाऊन छत्तीस वर्षे झाल्यानंतर, वान्द्रे येथील लकी हॉटेलसमोरील चौकात उभारलं आहे, तसेच वान्द्रे येथील सोळाव्या रस्त्याला ‘महंमद रफी मार्ग’ नाव दिलं गेलं आहे. चतुरस्त्र अशा महंमद रफीच्या स्मरणासाठी केलेल्या या उपक्रमाला विरोध करण्याचं काहीच कारण नाही, पण दगड-विटाच्या या स्मारकाबरोबरच रफीचं खरं स्मारक सूर स्मारक असायला हवं असं वाटतं. महंमद रफीबाबत सर्व काही, ज्यात काही वादग्रस्त गोष्टी असू शकतात. हे सर्व एकत्रित मिळण्याची व्यवस्था करता येऊ शकते का? कुणीतरी त्याची सुरुवात करायला हवी. सी. रामचंद्र यांची जन्मशताब्दी सुरू झाली आहे. शिवाजी पार्कच्या एका कोपऱ्यावर त्यांचं स्मारक आहे. म्हणजे काय ते जाऊन पाहा, म्हणजे कळेल... राहता राहिले ते तुम्ही-आम्ही. तुमच्या-आमच्या भावविश्वाचा हा अविभाज्य भाग झालेला असतो, पण स्मारक वगैरे आपल्या कल्पनेतच राहतं. तेव्हा मग म्हणायचं , जोवरी आहे स्मरण, त्याला कसले आहे मरण? स्वत:चंच समाधान असंच करून घ्यायचं का?घडलं ते...आपल्या आजूबाजूला असणारे पुतळे, स्मारके, स्थान संस्थान अशा पुढच्या गोष्टी येतात. त्याची अवस्था काय आहे, हेदेखील पाहायचे कष्ट किती घेतात? गायक महंमद रफी स्मारक ते जाऊन छत्तीस वर्षे झाल्यानंतर, वान्द्रे येथील लकी हॉटेलसमोरील चौकात स्मृतिशिल्प रूपातउभारलं आहे,दगड-विटाच्या या स्मारकाबरोबरच रफीचं खरं स्मारक सूर स्मारक असायला हवं असं वाटतं. लिहिता-लिहिता आठवलं, आता सी. रामचंद्र यांची जन्मशताब्दी सुरू झाली आहे. शिवाजी पार्कच्या एका कोपऱ्यावर त्यांचं स्मारक आहे. म्हणजे काय ते जाऊन पाहा, म्हणजे कळेल...!तर दुसऱ्या कोपऱ्यात वसंत देसाई यांचं स्मारक आहे. तेथे जी वीणा आहे, त्याच्या तारा गायब होतात, असे नेहमीच होत म्हणे. याला काय म्हणावे?