शहरं
Join us  
Trending Stories
1
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
2
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
3
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
4
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
5
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
6
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
7
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
8
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
9
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
10
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
11
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
12
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
13
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
14
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
15
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
16
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
17
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
18
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
19
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
20
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का

मराठवाड्याची संघर्ष यात्रा

By admin | Updated: April 19, 2017 01:22 IST

निव्वळ आश्वासनांवर शेतकरी आश्वस्त राहू शकणार नाही़ मराठवाड्यात ५९ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांची कामे रखडलेली आहेत़ पाझर, मालगुजारी,

निव्वळ आश्वासनांवर शेतकरी आश्वस्त राहू शकणार नाही़ मराठवाड्यात ५९ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांची कामे रखडलेली आहेत़ पाझर, मालगुजारी, गाव तलावांमध्ये गाळ आहे़ कालवे नादुरुस्त आहेत़ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहचतच नाही़ त्यासाठी मराठवाड्याची संघर्ष यात्रा कायम आहे़एकीकडे विरोधक कर्जमाफीची मागणी लावून धरत आहेत, दुसरीकडे सत्ताधारी कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्तीच्या योजना सांगत आहेत़ तरीही मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे़ विद्यमान सरकारने शाश्वत शेती अन् उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा केल्या असल्यातरी प्रत्यक्षात आश्वासने पाळली जात आहेत असे दिसत नाही़ तूर खरेदी केंद्राचे काय झाले, सोयाबीनचे तुटपुंजे अनुदान, हमीभावाची नसलेली हमी, रोज होणाऱ्या शेतकरी आत्महत्या या सर्वच प्रश्नांची उत्तरे सरकारने दिली पाहिजेत़ त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीने काढलेल्या संघर्ष यात्रेकडे केवळ राजकीय संदर्भाने पाहता येणार नाही़अस्मानी, सुल्तानी संकटांनी पिचलेल्या शेतकऱ्यांना संघर्ष यात्रेने लढण्याचे बळ मिळत असेल तर हा विधायक विरोध समजून सरकारने चर्चा केली पाहिजे़ सलग चार वर्षांपासून दुष्काळात होरपळणारा शेतकरी केवळ आश्वासनांनी आश्वस्त राहू शकत नाही़ प्रत्यक्ष कृती दिसली पाहिजे़ मराठवाड्यातील शेती शाश्वत करायची असेल तर पाणी हा महत्त्वाचा विषय आहे़ त्याकडे सरकार किती गांभीर्याने पाहते हे निधी वाटपावरून लक्षात येते़ निजाम राजवटीत गुलाम राहिलेल्या मराठवाड्यातील जनतेला एकमेव उपजीविकेचे, विकासाचे साधन शेतीच राहिले आहे़ एकूण शेती क्षेत्रापैकी ८५ टक्के शेती कोरडवाहू आहे़ मराठवाड्याचा पश्चिमोत्तर भाग दुष्काळप्रवण आहे़ महाराष्ट्रातील प्रत्यक्ष सिंचितक्षेत्राचे प्रमाण हे निर्मित क्षमतेच्या ३८़८ टक्के आहे़ त्यात विदर्भामध्ये ४०़९ टक्के उर्वरित महाराष्ट्रात ४३ टक्के, तर मराठवाड्यात २६़२ टक्के आहे़ तुलनेने मराठवाड्यातील सिंचन कमी आहे़ प्रकल्पांपेक्षाही भूजलाद्वारे मराठवाड्यात अधिक सिंचन होते़ साधारणत: २ लाख ७१ हजार ६१८ विहिरींद्वारे सव्वाचार लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते़ अलीकडच्या काळात विंधनविहिरी (बोअरवेल)ची संख्या सर्वाधिक आहे; परंतु जलतुटीचा प्रदेश असलेल्या मराठवाड्यात अतिउपशावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे़ या विभागात ४ हजार ८०० पाझर तलाव, ५ हजारांहून अधिक गावतलाव, मालगुजारी तलाव, कोल्हापुरी बंधारे आहेत़ गावातील पाणी गावात अडवून ती साठविण्याची मोठी संधी आहे़ त्यासाठी मराठवाड्यातील पाझर तलाव, गावतलाव, मालगुजारी तलाव व कोल्हापुरी बंधाऱ्यातील गाळ काढला पाहिजे़ गेल्यावर्षीच्या पावसाने काही ठिकाणी पाणी असले तरी येणाऱ्या पंधरवड्यात बहुतेक गाव तलाव कोरडेठाक होतील़ तेथील गाळ उपसा करता येईल़ पावसाळ्यात तलाव पूर्ण नाही भरल्यास जवळच्या नदी-नाले व ओहळाचे पाणी तलावाच्या दिशेने वळवावे अथवा उपसा करून तलावात सोडता येऊ शकते़ विदर्भातील मालगुजारी तलावाचा गाळ काढणे व नूतनीकरणासाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी शिफारस केळकर समितीने केली होती़ त्याच धर्तीवर मराठवाड्यातील तलावांसाठी शासनाने तरतूद केली पाहिजे़अर्थतज्ज्ञ प्रा़ एच़एम़ देसरडा, सामाजिक कार्यकर्ते डॉ़ बालाजी कोम्पलवार यांनी सातत्याने अभ्यासपूर्वक शासनाला केलेला पत्रव्यवहार, मांडलेला अहवाल लक्षात घेतला तरी समस्या निराकरणाची दिशा मिळू शकेल़ मराठवाड्यातील सरासरी पर्जन्यमान ५०० मिलि आहे़ म्हणजेच ते २० इंचापेक्षा अधिक आहे़ मराठवाड्याच्या एकूण ६४़९० लाख हेक्टर भौगोलिक क्षेत्रावर सरासरी हेक्टरी ५० लाख लिटर पावसाचे पाणी जमिनीवर पडते़ ते नैसर्गिक व उपसापद्धतीने संवर्धित केल्यास प्रत्येक गाव पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी होऊ शकते़- धर्मराज हल्लाळे