शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

भाष्य - बुंद से गई...

By admin | Updated: July 6, 2017 01:11 IST

पार्टी विद अ डिफरन्स असा लौकिक असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये अवध्या तीन वर्षात आमूलाग्र बदल होईल, असे भाकीत ज्योतिषाने

पार्टी विद अ डिफरन्स असा लौकिक असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये अवध्या तीन वर्षात आमूलाग्र बदल होईल, असे भाकीत ज्योतिषाने वर्तविले नसते. गटबाजी केवळ काँग्रेसची मक्तेदारी नाही, हे देखील भाजपाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे स्थानिक ज्येष्ठ माजी मंत्र्याने फिरविलेली पाठ, पक्षाच्याच नेत्याविरुध्द बदनामीची मोहीम असे प्रकार जळगाव जिल्ह्यात घडून गेले. धुळ्याच्या आमदारांनी तर पक्षात अस्पृश्यपणाची वागणूक मिळत असल्याची खंत जाहीरपणे व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईत तीन दिवस मुक्काम ठोकून पक्षाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. कानमंत्र दिला. परंतु भाजपाच्या स्थानिक मंडळींनी या कानाने ऐकले आणि त्या कानाने सोडून दिले, असे वाटणारी घटना जळगावात घडली. पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने भाजपाने या वर्षाचे निमित्त साधून पक्षसंघटनेचा विस्तार करण्याचे ठरविले. त्यासाठी महत्त्वाकांक्षी अशी विस्तारक योजना राबवली. कागदावर मोठे आकडे आणि हॉटेलच्या लॉनवर विस्तृत बैठक घेऊन या मोहिमेची आखणी करण्यात आली. या अभियानासाठी प्रदेश कार्यालयाने प्रचार साहित्य पाठविले. विस्तारकांकरवी ते खेडोपाडी पोहोचवायचे नियोजन होते. पण पक्षाच्या कार्यालयमंत्र्याने हे तीन टन प्रचार साहित्य चक्क घाऊक रद्दी विक्रेत्याकडे विकून टाकले. १० हजार रुपये रोख घेऊन उर्वरित २० हजार रुपये वैयक्तिक बँक खात्यात जमा करुन घेतले. ३० हजारांचे असे हिस्सेवाटे का केले या प्रश्नाच्या खोलात न गेलेले बरे. भाजपा ज्यांना गुरुस्थानी मानतो, त्या उपाध्यायांची शेकड्याने रंगीत छायाचित्रे, पक्षाचे मुखपत्र मनोगत, शिवार संवाद ही ३१ पानी रंगीत पुस्तिका, केंद्र व राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजनांची माहितीपत्रके असे सगळे साहित्य आमदार, जिल्हाध्यक्ष व संघटनामंत्र्यांच्या नावे लिहिलेल्या खोक्यांसह रद्दी कारखान्यात पोहोचले. ही बातमी छायाचित्रांसह समाजमाध्यमांवर प्रसारित होण्यासाठी पक्षातील नाराज गट सक्रिय होता, असे आता सांगितले जात आहे. पावसामुळे खराब झालेले साहित्य नष्ट करायचे होते, असा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आणि कार्यालयमंत्र्यावर खापर फोडून त्याचे काम थांबविले. या घटनेने शतप्रतिशत आणि पंचायत से संसद तक या घोषणा देणाऱ्या भाजपामधील बौध्दिक दिवाळखोरी ठसठशीतपणे समोर आली. कागदावर संघटनात्मक अभियान रंगविणारे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी तोंडघशी पडल्यानंतर आमदारांनी ३० हजार रुपये देऊन हे साहित्य पुन्हा खरेदी केले. पण ‘बुंद से गई वो हौदसे आती नही’ हे भाजपाच्या मंडळींना कोण सांगणार?