शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
2
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
3
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
4
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
5
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
6
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
7
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
8
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
9
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
10
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
11
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
12
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
13
"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
14
'भाजपा उपऱ्यांचा पक्ष बनलाय; आता रेशिमबाग नाही तर अदानी-अंबानी भाजपा चालवणार', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 
15
चीनमध्ये सापडला २२०० वर्षापूर्वीचा जुना नॅशनल हायवे; डोंगर फोडून बनवला होता चार पदरी रस्ता
16
नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'
17
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
18
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
19
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
20
भाजपचा दिग्गजांना दे धक्का, भाजपकडून ४० टक्के नवे चेहरे! तिकीट न मिळाल्याने अनेकांची नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

भारत-चीन सामरिक संबंध

By admin | Updated: October 29, 2014 01:21 IST

भारत-चीन यांच्यातील सामरिक व सुरक्षिततेच्या संबंधावरच जागतिक राजकारणाची स्थिरता व विकास अवलंबून आहे. दोन्ही राष्ट्रांना सध्या तरी युद्ध परवडणारे नाही.

भारत-चीन यांच्यातील सामरिक व सुरक्षिततेच्या संबंधावरच जागतिक राजकारणाची स्थिरता व विकास अवलंबून आहे. दोन्ही राष्ट्रांना सध्या तरी युद्ध परवडणारे नाही. किंबहुना दोन्ही राष्ट्रांनी विवादास्पद विषय बाजूला ठेवून विकासाला प्रधान्य दिले तर दोन्ही राष्ट्रांना 21 व्या शतकाच्या उत्तरार्धात निश्चितच महत्त्व येणार आहे. परंतु त्यासाठी दोन्ही राष्ट्रांनी राजनैतिक मुत्सद्दीपणा दाखविणो गरजेचे आहे. नुकत्याच झालेल्या चीनच्या राष्ट्रप्रमुखांच्या भारत भेटीत काही महत्त्वाचे करार करण्यात आलेले आहे. त्यात नथुला खिंडीतून कैलास मानसरोवर यात्रेसाठी मंजुरी, रेल्वे सुधारणा, व्यापार आणि विकासासाठी दोन्ही देशांत झालेला करार, भारतीय अंतराळ संशोधन संस्था व चीनचे राष्ट्रीय अंतराळ प्रशासन यांच्यातील अवकाशाचा वापर, शांतता आणि सुरक्षिततेसाठी करण्याचा करार, यांचा समावेश आहे. या सोबत कला, संस्कृती व आर्थिक विकासावर दोन्ही देशांनी भर दिलेला आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जपान भेट व नंतर चीनच्या राष्ट्रपतींची भारत भेट यामध्ये चीन-जपान संघर्षाची अप्रत्यक्ष चिन्हे पाहावयास मिळत आहे. एकीकडे भारत सरकार चीनसोबत विविध करार करीत होते. तेव्हाच 18 सप्टेंबरला चीनचे 1000 सैनिक दक्षिण लडाख येथे  ‘तात्पुरता रस्ता’ तयार करीत होते. त्याकडे भारत सरकारने चीनचे लक्ष वेधल्यानंतर तो प्रश्न तात्पुरता थांबला आहे. परंतु त्याकडे बारकाईने पाहणो गरजेचे आहे. भारताने चीन-भारत-बांगलादेश-म्यानमार असा कॉरीडॉर तयार करून आर्थिक विकास, व्यापाराला चालना व संवाद वाढीकडे 
लक्ष वेधले आहे. परंतु चीनच्या आर्थिक आणि लष्करी शक्तीकडे दुर्लक्ष करता कामा नये. चीनचा शत्रू हा भारत नाही तर अमेरिका 
आहे. चीन त्यानुसार योजना आखून त्यावर अंमलबजावणी करीत 
आहे. तरीही भारताला चीनकडे दुर्लक्ष न करता त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी दूरदृष्टी असणारे ‘व्हिजन’ तयार करावे लागणार आहे व त्यासाठी केवळ राजकीय घोषणावर भर न देता त्याला सामरिक बळ देणो गरजेचे आहे.
भारत-चीन ही दोन्ही राष्ट्रे 21 व्या शतकात आर्थिक व लष्करीदृष्टय़ा आशिया खंडात व जागतिक पातळीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करणार आहेत. परंतु दोन्ही देशांच्या दरम्यान काही मूलभूत प्रश्नावर मतभेद आहेत व हे मतभेद आपण आजच्या संदर्भासह नीट समजून घेणो गरजेचे आहे. चीनने शीतयुद्धाच्या कालखंडात आशियाई राष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत भारताच्या सहाय्याने सदस्यत्व मिळविले व पी-5 हा दर्जा मिळवल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनने आपला आण्विक कार्यक्रम, आण्विक प्रसार बंदी कराराच्या चौकटीत विकसित केला व त्यामुळे आज चीनकडे असणारी आण्विक शक्ती ही जागतिक शांतता आणि सुरक्षितते पुढील आव्हान आहे.
भारत-चीनदरम्यान अण्वस्त्र शक्ती हा मुद्दा आता महत्त्वाचा बनलेला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन्ही देशांदरम्यानच्या सीमा प्रश्नामुळे दोन्ही देशांत अस्थिरतेचे वातावरण तयार होत आहे. 1962च्या युद्धात चीनने भारताची भूमी बळकावली आहे व अरुणाचल प्रदेश हा चीनचाच प्रांत आहे, अशी भूमिका घेतलेली आहे. परंतु हा एक सामरिक डाव आहे. एकीकडे अरुणाचल प्रदेशावर हक्क सांगायचा व दुसरीकडे बोलणी करून सीमाप्रश्न तेवत ठेवायचा. 1993 पासून ते आजपावेतो दोन्ही देशांदरम्यान विविध पातळ्यांवर बोलणी सुरू आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चीन-पाकिस्तान यांच्यातील लष्करी व सामरिक भागीदारी, हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. शीतयुद्धाच्या कालखंडात पाकिस्तानला अमेरिकेकडून आर्थिक व लष्करी मदत मिळत होती व आज ती मदत चीन करीत आहे. पाकिस्तानचे ग्वादार हे बंदर, काराकोरम हायवे व इतर ठिकाणचा विकास चीन करीत आहे.
भारत-चीन यांच्याकडे असलेली युवाशक्ती व आर्थिक शक्ती म्हणून उदयास येण्यासाठी जागतिक पाळीवरील असलेले पोषक वातावरण यामुळे येणा:या कालखंडात दोन्ही राष्ट्रांचा आर्थिक दबदबा वाढणार आहे. दोन्ही राष्ट्रांनी आपले सुरक्षाविषयक प्रश्न बाजूला ठेवले तर दोघांचेही आंतरराष्ट्रीय पातळीवर वर्चस्व प्रस्थापित होऊ शकेल. दोन्ही राष्ट्रांकडे सॉफ्टवेअर व हार्डवेअरचे प्रशिक्षित मानवी बळ आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर ते आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे चिनी संस्कृतीचा पाया हा भारतीय बौद्ध धर्मावर आधारलेला आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवरील एवढी प्रबळ असलेली ही दोन राष्ट्रे सांस्कृतिकदृष्टय़ा एक आहेत व त्याचा फायदा दोन्ही राष्ट्रांना मिळणार आहे.
आजचे जागतिक संदर्भ बघता आता तिसरे महायुद्ध किंवा दोन राष्ट्रामधील युद्धे आता होणार नाहीत. युद्धे आता अप्रत्यक्ष लढली जाणार आहेत. त्यासाठी सायबर हल्ले, दहशतवाद व इतर असामरिक अस्त्रंचा वापर संघर्ष करण्यासाठी केला जाणार आहे व संघर्ष निवारण आणि व्यवस्थापनासाठी उल्ला्रीिल्लूी इ4्र’्िरल्लॅ टीं241ी2 किंवा विश्वास बांधणी प्रक्रियेला महत्त्व आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या सत्तासंतुलनाच्या राजकारणात उइट चा वापर होणो गरजेचे आहे. 
 
डॉ. विजय खरे
प्राध्यापक, संरक्षण व सामरिक शास्त्र
सावित्रीबाई फुले विद्यापीठ