शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

गुरुचे महत्व

By admin | Updated: July 23, 2016 04:55 IST

आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. या व्यास पौर्णिमेला व्यासगुरूंची मनोभावे पूजा केली जाते.

आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. या व्यास पौर्णिमेला व्यासगुरूंची मनोभावे पूजा केली जाते. अज्ञान, अंध:कार दूर करणाऱ्या, सर्वार्थाने गुरू म्हणजे मोठा असणाऱ्या ज्ञानसूर्याची मानव समाजाला निरंतर गरज होती, आहे, असणार आहे म्हणून गुरूंच्या कृतज्ञतापूर्वक स्मरणाचे महत्त्व आहे.यद्यद् आचरति श्रेष्ठ: तद् देवेत्तरो नर:या गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील एकविसाव्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे वयाने, ज्ञानाने आणि क्षमतेने श्रेष्ठ असणाऱ्यांचे अनुकरण करण्याकडे सर्वसाधारण लोकांचा कल असतो. त्यांच्याजवळ अनुभवातून आलेले आणि त्यांनी प्रयत्नपूर्वक मिळवलेले संचित ज्ञान पुढच्या पिढ्यांना दिशादर्शक ठरत असते.पूर्वी पाठांतरातून, मुखोद्गत वाणी माध्यमातून हा वारसा दर पिढ्यांकडे हस्तांतरित होत असे. छापण्याचे कौशल्य हस्तगत झाल्यावर ग्रंथातून, नियतकालिकांमधून ज्ञानसंग्रह व ज्ञानप्रसार सहजपणे वेगाने होऊ लागला. पण ज्ञानाबरोबर श्रेयस्कर शहाणपणा येतो का, हा प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटलपासूनचा वादाचा विषय आजही अनुत्तरित आहे.आज विज्ञान युगाची विलक्षण झेप पेलत नुकती चालायला, बोलायला लागलेली बाळे वाढत्या वयाबरोबर शाळांच्या वेळा, दप्तरांचे ओझे, ट्यूशन्स, छंद मंडळ यात भरडली जातात. करिअरमागे धावणारे त्यांचे आई-वडील त्यांना संपन्नता देतात पण सहवास, प्रेम ते केव्हा देणार? मुलांच्या अनुकरण वृत्तीचा, निरीक्षण शक्तीचा सहज फायदा करून घेत त्यांचे हे पहिले निसर्गदत्त गुरू मुलांना घडवू शकतात.विचारशक्तीबाबत आपल्यापेक्षा निम्न स्तरावरच्या पशु-पक्ष्यांकडे बघावे. लबाड कोकिळा कावळ्याच्या घरट्यात आणि चातकातली मादी सातभार्इंच्या घरट्यात अंडी घालते. ती अंडी आणि नंतर थोडी वेगळी दिसणारी पिले पक्ष्यांच्या विश्वात मायेने जोपासली जातात. पालक मात्र शिक्षकांवर मुलांच्या विकासाची जबाबदारी टाकून मोकळे होतात. ज्ञानाची क्षितिजे आणि बुद्ध्यांकाची स्पर्धा पार करीत आणि भावनेचा ओलावा, आवेग, संवेदना गमवत ही कोवळी, उमलती पिढी अकाली तणावग्रस्त होते. परिपक्वतेविना निराशेच्या गर्तेत कोसळते. पुस्तकातील विद्या आणि परक्याजवळचे धन जसे कामी येत नाही तसेच असीम ज्ञान देणाऱ्या इंटरनेटकडून मायेचे, माणुसकीचे संस्कार लाभत नाहीत. संत कबीर म्हणतात त्याप्रमाणे माणूस घडवताना गुरूही, मडके घडविताना कुंभार जसे वरून थापट्या मारतात पण आतून आधार देत असतात, तसेच करीत असतो.-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे