शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

आभासाचा सोस नकोच !

By किरण अग्रवाल | Updated: June 14, 2018 08:00 IST

या आभासी जगताच्या भूलभुलय्यात स्वत:ला हरवून बसणाऱ्या व ठेचकाळणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, तीच ठरावी खरी चिंतेची बाब.

इच्छा कितीही आणि काहीही असली तरी इच्छेनुरूप सर्वांनाच सर्व गोष्टी भेटतात, असे कधीच होत नसते. म्हणूनच तडजोड व समझौता करणे प्रत्येकाला भाग पडते. अर्थात, हेदेखील तेव्हाच शक्य होते जेव्हा किमान बाबींवर समाधान मानण्याची तुमची वृत्ती अगर प्रवृत्ती असेल. अन्यथा, तडजोडही व्यर्थ ठरल्याखेरीज राहात नाही. हे समाधानही त्याच्याच ठायी असते, जो वास्तविकतेशी नाळ टिकवून असतो. उगाच स्वप्नातल्या दुनियेत उडविले जाणारे पतंग धाराशयीच होतात. म्हटले तर हे जीवनानुभवाचे साधे-सरळ अध्यात्म; पण यासंबंधीची जाणीव आज बाळगतो कोण? अनुभवसंपन्नता लाभलेली ज्येष्ठांची पिढी तशीही यातून तावून-सुलाखून निघालेली असते. अडते ती तरुण पिढीच, जी वास्तवापेक्षा आभासात रममाण होण्यात अधिक स्वारस्य बाळगते. या आभासी जगताच्या भूलभुलय्यात स्वत:ला हरवून बसणाऱ्या व ठेचकाळणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, तीच ठरावी खरी चिंतेची बाब.तरुण पिढी जी आभासी जाळ्यात गुंतताना दिसत आहे, त्यात टीव्ही मालिका तसेच सोशल मीडियाचा मोठा वाटा असल्याचे म्हणता यावे. ओसरी पाहून पाय पसरण्याचा मंत्र विसरायला लावून ‘अनलिमिटेड’ महत्त्वाकांक्षांचे पेव त्यातूनच फुटतात. वास्तविकतेशी फारकत घडून येण्यास व स्वप्नात झुलण्याची सवय बळावण्यासही ही माध्यमे कारणीभूत ठरण्याची अनेक उदाहरणे आहेत. सोशल मीडियातले मित्र त्यांच्या खासगी जगण्याला ज्यापद्धतीने सोशल-सार्वजनिक करून बसतात, त्यातूनही अनेकांना प्रेरणा लाभून जाते व आपलेही जगणे ‘तसे’ करण्याच्या नादात ते पायावर धोंडा पाडून घेतात. अल्पावधीत व अल्पश्रमात मोठा पल्ला गाठण्याच्या इर्षेतून हे घडून येताना दिसते. अशातून गैरमार्गाचे दरवाजे तर धुंडाळले जातातच; परंतु ही ईर्षा यशस्वीतेचा टप्पा गाठणार नसेल तर विकृतीच्या पातळीवरही पोहोचलेली दिसून येते. मागे असाच सोशल मीडियावरील काही मान्यवरांचे अकाउण्ट्स हॅक करून अश्लील संदेश पाठविणारा राजस्थानातील बाडमेरचा दीप्तेश सालेचा हा तरुण पकडला गेला होता, तर फेसबुकवर बनावट अकाउण्ट उघडून शेकडो महिलांना अश्लील संदेश पाठविणाºया लातूरच्या विश्वजीत जोशीनामक तरुणासही अटक करण्यात आली होती. सोशल मीडियावर बनावट खाते उघडून असा उटपटांगपणा केला गेल्याच्या अनेक घटना ठिकठिकाणच्या पोलीस दप्तरी नोंद होत आहेत. विकृतीचीच ही उदाहरणे असून, आभासी जगण्याला मूर्त रूप देऊ न शकल्यातून ती आकारास आलेली दिसतात. म्हणूनच प्रश्न आहे तो, या आभासी अवस्थेतून तरुणपिढीला कसे बाहेर काढता यावे असा.बरे, हा जो काही आभास असतो तो पुरती मती गुंग करणारा किंवा विचारशक्ती गहाण टाकायला भाग पाडणाराच असतो. त्यामुळे संबंधिताला स्वत:च्या बरे-वाईटाचीही शुद्ध राहात नाही. अनाकलनीय ओढवलेपण व फसवणुकीला संधीही त्यातूनच मिळून जाते. वास्तविक आयुष्यात खडतरता वाट्यास आलेली मंडळी यात बळी पडण्याची शक्यता मोठी असते. चित्रपटात काम मिळवून देण्याच्या नावाने हर्षद ऊर्फ हॅरी सपकाळ या तोतया चित्रपट दिग्दर्शकाने नाशकातील एका मुलीला साडेनऊ लाखाला गंडविल्याची घटना त्यातूनच घडून आल्याचे पहावयास मिळाले. इतकेच नव्हे तर, फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून आभासी आयुष्याची स्वप्ने रंगवत एक तरुणी हैदराबादला गेल्याची व तेथे तिच्या प्रियकराने ती अल्पवयीन असल्याचे जाणून तिला घरी परत पाठविल्याचाही प्रकार अलीकडेच उघडकीस आला आहे. या सर्व घटना पाहता तरुणांसमोरील मायावी जगाची, इच्छा-आकांक्षांची वाढती क्षितिजे स्पष्ट व्हावीत. तेव्हा त्यातून ओढवणारे धोके लक्षात आणून देऊन, त्यांना जमिनीवर राहण्यासाठी प्रोत्साहित करण्याची भूमिका ज्येष्ठांना व पालकांना घ्यावी लागेल. स्वप्ने जरूर बघायला हवीत; पण ती सत्यात उतरवता येण्याजोगीच हवीत. आभासाऐवजी वास्तवाशी प्रामाणिकता असायला हवी. गुणवत्तेची स्पर्धा करताना कमी टक्क्यांमुळे मुले आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात, तो याच आभासाशी नाते सांगणारा असतो. म्हणूनच आभासाचा सोस नकोच !