शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मानव जीवन

By admin | Updated: September 27, 2016 05:18 IST

भारतीय धारणेनुसार जगात असलेल्या चौऱ्यांशी लक्ष योनींमध्ये मनुष्ययोनी सर्वश्रेष्ठ आहे. कारण मनुष्याला बुध्दी प्राप्त झाली आहे व तिचा वापर करून तो योग्यायोग्यतेचा निर्णय घेत

- डॉ. भूषणकुमार उपाध्यायभारतीय धारणेनुसार जगात असलेल्या चौऱ्यांशी लक्ष योनींमध्ये मनुष्ययोनी सर्वश्रेष्ठ आहे. कारण मनुष्याला बुध्दी प्राप्त झाली आहे व तिचा वापर करून तो योग्यायोग्यतेचा निर्णय घेत असतो, तसेच मनुष्य योनीपेक्षा श्रेष्ठ अशा देव योनीतही जाऊ शकतो. तो ज्ञान, भक्ती व कर्म यांच्या साधनेने जन्म व मृत्युच्या फेऱ्यातून मुक्तसुध्दा होऊ शकतो.आहार, निद्रा, भय आणि भोग हे सर्व प्राणीमात्रात सर्वसाधारण रूपात आढळतात. माणसांत एकच विशेष आहे, जे प्राण्यांत आढळत नाही, ते म्हणजे ज्ञान किंवा बुध्दी.जगातील सर्व धर्म मनुष्याच्या याच ज्ञानाला सुरक्षित करण्याचे काम करतात व त्याला परमतत्वाशी जोडण्याचा प्रयत्न करतात. परमतत्त्वाचा साक्षात्कार जीवनाचे अंतिम उद्दिष्ट असते व ही अशी अवस्था आहे की, जेव्हा मनुष्याचे द्वंद्व संपते व त्याचे रूपांतर सच्चिदानंदात होते. याच परम अवस्थेचे वर्णन संत महात्म्यांनी वेगवेगळ्या प्रकारे केले आहे. संत मीराबाई म्हणते,‘लाली देखन मैं गई, मै भी हो गई लाल।’ संत तुळशीदास म्हणतात,‘जानत तुमही तुमही होई जाई।’ भारतीय दार्शनिक परंपरेचे मानणे आहे की मनुष्य जीवनातच मोक्ष प्राप्ती होऊ शकते. त्यामुळेच मनुष्य जीवनाला एवढे महत्व दिलेले आहे. संत तुळशीदास म्हणतात, बडे भाग्य मानुष तन पावा।सुर दुर्लभसद्ग्रन्थन गावा।। म्हणजेच मनुष्य जीवन मोठ्या भाग्याने मिळते. असे हे मानव जीवन देव देवता यांना सुध्दा दुर्लभ आहे, असे अनेक ग्रंथात वर्णन केले आहे. थोडक्यात, या जीवनाचा उपयोग परम तत्त्वाच्या प्राप्तीसाठीच व्हावा.या उलट काही जण हिंसा-अपराध असे कृत्य करून या अमूल्य जीवनाचा दुरूपयोग करतात. या नकारात्मक कृत्यांचा त्यांच्या स्वत:च्या जीवनावरही विध्वंसकारी असा परिणाम होतो आणि ते स्वत: नष्ट होतात. तरी या जीवनाचा उपयोग वेळीच परमतत्त्व शोधण्यासाठी व्हावा. भारतीय ऋषींनी परम तत्त्वाच्या प्राप्तिसाठी फारच स्पष्ट व अचूक मार्ग सांगितले आहेत. त्याच्या अंतर्गत अनेक उपासना पध्दती विकसित झाल्या आहेत. अतिशय शुध्द अंत:करणाने जेव्हा व्यक्ती स्वत:मध्ये दुसऱ्याला किंवा दुसऱ्यामध्ये स्वत:ला पाहते, तेव्हा ती परमतत्त्वाशी जोडली जाते. या अवस्थेत मनुष्याला विविधतेत एकतेचा अनुभव होतो आणि तो पूर्ण ब्रम्हांडचा नागरिक होतोे. वैश्विक नागरिक होण्याची ही कल्पना भारतीय चिंतन परंपरेची बहुमोल देणगी आहे.