शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

मानव जीवन

By admin | Updated: September 27, 2016 05:18 IST

भारतीय धारणेनुसार जगात असलेल्या चौऱ्यांशी लक्ष योनींमध्ये मनुष्ययोनी सर्वश्रेष्ठ आहे. कारण मनुष्याला बुध्दी प्राप्त झाली आहे व तिचा वापर करून तो योग्यायोग्यतेचा निर्णय घेत

- डॉ. भूषणकुमार उपाध्यायभारतीय धारणेनुसार जगात असलेल्या चौऱ्यांशी लक्ष योनींमध्ये मनुष्ययोनी सर्वश्रेष्ठ आहे. कारण मनुष्याला बुध्दी प्राप्त झाली आहे व तिचा वापर करून तो योग्यायोग्यतेचा निर्णय घेत असतो, तसेच मनुष्य योनीपेक्षा श्रेष्ठ अशा देव योनीतही जाऊ शकतो. तो ज्ञान, भक्ती व कर्म यांच्या साधनेने जन्म व मृत्युच्या फेऱ्यातून मुक्तसुध्दा होऊ शकतो.आहार, निद्रा, भय आणि भोग हे सर्व प्राणीमात्रात सर्वसाधारण रूपात आढळतात. माणसांत एकच विशेष आहे, जे प्राण्यांत आढळत नाही, ते म्हणजे ज्ञान किंवा बुध्दी.जगातील सर्व धर्म मनुष्याच्या याच ज्ञानाला सुरक्षित करण्याचे काम करतात व त्याला परमतत्वाशी जोडण्याचा प्रयत्न करतात. परमतत्त्वाचा साक्षात्कार जीवनाचे अंतिम उद्दिष्ट असते व ही अशी अवस्था आहे की, जेव्हा मनुष्याचे द्वंद्व संपते व त्याचे रूपांतर सच्चिदानंदात होते. याच परम अवस्थेचे वर्णन संत महात्म्यांनी वेगवेगळ्या प्रकारे केले आहे. संत मीराबाई म्हणते,‘लाली देखन मैं गई, मै भी हो गई लाल।’ संत तुळशीदास म्हणतात,‘जानत तुमही तुमही होई जाई।’ भारतीय दार्शनिक परंपरेचे मानणे आहे की मनुष्य जीवनातच मोक्ष प्राप्ती होऊ शकते. त्यामुळेच मनुष्य जीवनाला एवढे महत्व दिलेले आहे. संत तुळशीदास म्हणतात, बडे भाग्य मानुष तन पावा।सुर दुर्लभसद्ग्रन्थन गावा।। म्हणजेच मनुष्य जीवन मोठ्या भाग्याने मिळते. असे हे मानव जीवन देव देवता यांना सुध्दा दुर्लभ आहे, असे अनेक ग्रंथात वर्णन केले आहे. थोडक्यात, या जीवनाचा उपयोग परम तत्त्वाच्या प्राप्तीसाठीच व्हावा.या उलट काही जण हिंसा-अपराध असे कृत्य करून या अमूल्य जीवनाचा दुरूपयोग करतात. या नकारात्मक कृत्यांचा त्यांच्या स्वत:च्या जीवनावरही विध्वंसकारी असा परिणाम होतो आणि ते स्वत: नष्ट होतात. तरी या जीवनाचा उपयोग वेळीच परमतत्त्व शोधण्यासाठी व्हावा. भारतीय ऋषींनी परम तत्त्वाच्या प्राप्तिसाठी फारच स्पष्ट व अचूक मार्ग सांगितले आहेत. त्याच्या अंतर्गत अनेक उपासना पध्दती विकसित झाल्या आहेत. अतिशय शुध्द अंत:करणाने जेव्हा व्यक्ती स्वत:मध्ये दुसऱ्याला किंवा दुसऱ्यामध्ये स्वत:ला पाहते, तेव्हा ती परमतत्त्वाशी जोडली जाते. या अवस्थेत मनुष्याला विविधतेत एकतेचा अनुभव होतो आणि तो पूर्ण ब्रम्हांडचा नागरिक होतोे. वैश्विक नागरिक होण्याची ही कल्पना भारतीय चिंतन परंपरेची बहुमोल देणगी आहे.