शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
4
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
5
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
6
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
7
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
8
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
9
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
10
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
11
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
12
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
13
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
14
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
15
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
16
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
17
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
18
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
19
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
20
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

नवे सरकार शहर विकासाचे आव्हान पेलणार कसे?

By admin | Updated: November 2, 2014 02:06 IST

महाराष्ट्र हे आता नागरीबहुल लोकसंख्या असलेले राज्य आहे. शहरे ही विकासाची इंजिने असतात आणि तीच राष्ट्राचा आणि राज्याचा रुतलेला गाडा विकास हमरस्त्यावरून पळवितात.

महाराष्ट्र हे आता नागरीबहुल लोकसंख्या असलेले राज्य आहे. शहरे ही विकासाची इंजिने असतात आणि तीच राष्ट्राचा आणि राज्याचा रुतलेला गाडा विकास हमरस्त्यावरून पळवितात. विकासाची आव्हानेही तीच शहरे पेलू शकतात, जी सातत्याने सुधारणा करू शकतात. हा विचार नव्या सरकारने स्वीकारला तर शहर विकासाची आव्हाने सक्षमपणो पेलता 
येणार आहेत.
 
व्या सरकारपुढे शहरी भागाची परिस्थिती सुधारणा करण्याचे मोठे आव्हान आहे. नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पन्नास टक्के नागरिकांची वाढलेली सुबत्ता आणि त्यांतून आलेली शहरी बेपर्वा वृत्तीची सूज या गोष्टींशी मुकाबला करीत सुधारणा करणो हे एक दिव्य असणार आहे. सुधारणा करायच्या म्हणजे काय करायचे, हे बहुतेकांना समजते आणि पटतेही. पण ते कसे करायचे हे बहुतेकांना कळत नाही. उदाहरणार्थ परवडणारी घरे आवश्यक आहेत, सार्वजनिक वाहतूक सुधारणो आणि सुरक्षित करणो हे महत्त्वाचे आहे, हे सर्वाना समजते. परंतु ते साध्य करण्यातील अडथळे कोणते, ते कसे दूर करायचे, कोणी जबाबदारी घ्यायची आणि मुख्य म्हणजे हे करण्यासाठी जे कठोर आणि कटू निर्णय घ्यावे लागतील, ते नागरिकांना समजून देऊन त्यांची नवीन मनोवृत्ती घडवायची ही तारेवरची कसरत नव्या सरकारला करावी लागणार आहे. 
उदाहरणार्थ परवडणा:या घरांच्या धोरणात दोन कायद्यांचे मोठे अडसर आहेत. एक म्हणजे गेली साठ वर्षे अस्तित्वात असलेला भाडे गोठविणारा नियंत्नण कायदा. महाराष्ट्राच्या निर्मितीच्याही आधीचा असला, तरी तो घरांचा तुटवडा वाढविणारा असूनही सर्व राजकीय पक्षांनी त्याचे जोखड मानगुटीवर वागविले आहे. येत्या पाच वर्षात तो टप्प्याटप्प्याने फेकून दिले तरच भाडेतत्त्वावर मिळणा:या, परवडणा:या, अधिकृत घरांचा पुरवठा वाढू शकेल. या कायद्याने लोकांना परवडणारी भाडय़ाची घरे बांधून देण्याच्या यवसायाचेच उच्चाटन केले होते. त्यामुळेच अनधिकृत झोपडपट्टय़ा निर्माण झाल्या. 
दुसरा कायदा, जो शिवसेना-भाजपा सरकारच्या काळात केला गेला होता तो झोपडपट्टीतील आणि जुन्या करप्राप्त इमारतींमधील भाडेकरूंना फुकट घरे देण्याचा. ह्या कायद्याने घरबांधणीच्या व्यवसायालाच नाही तर बेफाट नफेखोरी, खंडणी-भ्रष्टाचाराचा राक्षस निर्माण केला. आणि बेदरकार धंदेवाईक बिल्डरांना आणि राजकीय गुंडांना बलशाली केले. तेव्हा हे दोन्ही कायदे तातडीची राजकीय शस्त्नक्रिया करून काढून टाकले नाहीत, तर झोपडपट्टय़ांचा कॅन्सर शहरांचा आणि महाराष्ट्राचा मृत्यू घडवून आणोल यात शंका नाही. याच्याबरोबरच महाराष्ट्र प्रदेश आणि नगर नियोजन कायद्यात सुधारणा करणो, महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ तसेच झो. पू. संस्था कायद्यांमध्ये सुधारणा करणो आवश्यक आहे. हे दोन्ही उपक्रम व्यावसायिक क्षमता, दूरदृष्टी आणि या क्षेत्नाचा अनुभव असणा:या नेतृत्वाच्या कुशल हातात देणो आवश्यक आहे. तसे झाले तरच राजकीय दबावातून त्यांची मुक्तता होईल. लोकांना परवडणारी घरे पुरविता येतील, यासाठी सिंगापूरच्या शासकीय घरबांधणी संस्थेचे प्रारूप उपयोगी ठरेल. दुसरी महत्त्वाची समस्या ही अधिक गुंतागुंतीची आणि सुधारणा करण्यासाठी जास्तच आव्हाने असणारी आहे शहर वाहतुकीची. यात जास्तीत जास्त लोकांचे हित, हा निकष असावा लागणार आहे. त्यासाठी शहरे ही लोकांसाठी आहेत मोटारींसाठी नाहीत, हे तत्त्व सर्वात आधी राजकीय तत्त्व म्हणून स्वीकारावे लागेल. उड्डाणपूल बांधले की खाजगी गाडय़ांची संख्या वाढते, सार्वजनिक वाहतुकीला दुय्यम स्थान मिळते आणि पादचा:यांना जीव मुठीत धरून चालण्यापलीकडे काहीच पर्याय उरत नाही. म्हणूनच आधी पादचारी, मग सायकली, नंतर सार्वजनिक वाहतूक आणि सर्वात शेवटी मोटारी असा प्राधान्यक्रम घडवावा लागेल. तो लोकांना आणि मुख्य म्हणजे सामान्य राजकीय कार्यकत्र्याना पटवून द्यावा लागेल. शिवाय त्यासाठी शहर नियोजन करू शकणा:या नियोजनकारांची मोठी फौज निर्माण करून प्रत्येक शहरात ती तैनात करावी लागेल. आज वाहतूक नियोजन करणारे शिक्षित लोकच शहरात उपलब्ध नाहीत, ही मुंबईसारख्या प्रगत शहराची दुरवस्था आहे! परंतु हे केल्याने केवळ शहराचे हार्डवेअर सुधारेल. ही नवीन वाहतूक कार्यक्षम ठेवण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर प्रत्येक नागरिकाच्या, वाहतूक पोलिसांच्या, वाहन चालविण्याचा परवाना देणा:या परीक्षकांच्या डोक्यात भरावे लागेल.
(लेखिका नगर रचना तज्ज्ञ आहेत.)
 
शहरांच्या सुधारणा कार्यक्रमात थिंकटँकची मदत घ्यावी, असे सुचवावेसे वाटते. मागील सरकारने असा थिंकटँक मुंबई शहर आणि प्रदेशातील शहर सुधारणा कार्यक्रमासाठी निर्माण केला आहे. त्या संस्थेने शहर सुधारणा करण्यासाठी अनेक नवीन धोरणो, उपाय अभ्यास करून सुचिवले होते. परंतु नागरिकांच्या दुर्दैवाने त्याचा उपयोग मागच्या सरकारला करून घेता आला नाही. नव्या सरकारने त्याचा उपयोग जाणून फायदा करून घेतला पाहिजे. 
 
कोरियाची राजधानी सिऊल शहराकडून याबाबत खूप शिकण्यासारखे आहे. तेथील थिंकटँकच्या मदतीने सिउल महानगरात सर्वच बाबतीत गेल्या 2क् वर्षात मोठय़ा सुधारणा करणो शक्य झाले. जगातील बहुतेक सर्व मोठय़ा शहरांमध्ये ही व्यवस्था खूप महत्त्वाची मानली जाते. त्यामुळेच अनेक महानगरे बकालपणा आणि दुर्दशेतून अतिशय कमी काळात बाहेर पडू शकली. 
 
सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी आधी वाहतुकीचे सार्वजनिक रस्ते मुक्त करावे लागतील. मोटारींच्या पार्किगमधून व फेरीवाल्यांच्या विळख्यातून ते मुक्त करणो, हेही काम सोपे नाही. कारण दोन्ही बाबतींत सामूहिक दबाव आज फार मोठे आहेत. याही बाबतीत कायद्यात झटापट सुधारणा करणो, वाहतूक पोलिसांना अधिक सक्षम करणो तातडीने करता येईल. 
 
- सुलक्षणा महाजन