शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

शेती किफायतशीर कशी बनेल?

By admin | Updated: January 9, 2015 23:32 IST

नॅशनल सॅम्पल सर्व्हे आॅर्गनायझेशनच्या एका पाहणीनुसार देशातील १५.६१ कोटी ग्रामीण कुटुंबापैकी ५७.८ टक्के कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत

शेतकरी शेतात जे काही पिकवतो, त्याला बाजारात योग्य किंमत मिळत नाही. नॅशनल सॅम्पल सर्व्हे आॅर्गनायझेशनच्या एका पाहणीनुसार देशातील १५.६१ कोटी ग्रामीण कुटुंबापैकी ५७.८ टक्के कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत आणि त्यांचे मासिक उत्पन्न ६४२६ रुपये आहे. शेतीतील गुंतवणूक शेतीच्या उत्पन्नाच्या ३० टक्के असते. त्यातील मोठा खर्च हा महागडी खते व मजुरीवर होतो. ६५ टक्के कुटुंबांकडे एक हेक्टरपेक्षाही कमी जमीन आहे, ज्यात जेमतेम उदरनिर्वाहही होणे अवघड आहे. ५० टक्के शेतकरी हे कर्जात बुडालेले आहेत आणि त्यांच्यावर सरासरी ४७ हजार रुपये एवढा कर्जाचा बोजा आहे. यातले बरेचसे म्हणजे २६ टक्केपर्यंत कर्ज खाजगी सावकारांचे आहे. त्यावर २0 टक्क्यांपेक्षाही अधिक दराने व्याज आकारले जाते. त्यामुळे आयुष्यभराच्या दारिद्र्याची हमीच मिळते.सिंचनासाठी कमी पाणीभारतात शेतीसिंचनासाठी पाण्याची पुरेशी उपलब्धता नाही, शिवाय शेती हवामानाच्या लहरीवर अवलंबून आहे. शेतीचे भूपृष्ठ सिंचन अयोग्य पध्दतीने होते, त्यात पाणी साचून राहण्याचे प्रमाण अधिक आहे. सिंचन क्षमता अधिक असूनही फक्त ४0 टक्के जमीन सिंचनाखाली आलेली आहे. दुसरीकडे भूगर्भातील पाण्याचे वाटप समान नाही. ज्यांच्याकडे पैसा आहे ते शक्तिशाली पंप लावून भूगर्भातील पाणी हवे तसे खेचून घेतात. यातील नवे तंत्रज्ञान खर्चिक असल्यामुळे सबसिडी देऊ नही गरीब शेतकऱ्यांना ते परवडत नाही.यावर ठिबक सिंचन हा पर्याय आहे. त्यासाठी भूपृष्ठीय सिंचनाचे जाळे वाढविणे व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे गरजेचे आहे. पाण्याची उपलब्धताही वाढविणे आवश्यक आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि भूगर्भातील पाण्याचे समृद्धीकरण या मार्गाने हे शक्य आहे. त्यामुळे कमी ऊ र्जेत उत्पादनवाढ शक्य होईल.संस्थागत सुधारणासंदिग्ध कायद्यांचाही फटका कृषिक्षेत्राला बसला आहे. गुदामांसंबंधीच्या कायद्याचेच उदाहरण घ्या. जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत सरकार शेतमालाचा साठा करण्यावर निर्बंध लावू शकते. यामुळे शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष होते. सरकारने शेतमालाच्या किमती आणि वितरण यात लक्ष घालण्याची काहीच गरज नाही. खुल्या बाजारातील हवाला व्यवहारापेक्षा लेखी सीलबंद बोली लावूनच घाऊ क बाजारात माल विकला गेला पाहिजे. त्यातच उत्पादकाचे हित आहे. बिहारमध्ये शेतमालाची खुल्या बाजारातील विक्री, बँकांचे आणि कमोडिटी एक्स्चेंजचे अर्थसाह्य आणि हायब्रिड बियाणांचा वापर याव्दारे मका उत्पादनात १0 टक्के वाढ साध्य करण्यात आली आहे.किफायतशीर शेतीशेतीला विमासंरक्षण देणे आवश्यक आहे. भारतातील जेमतेम ५ टक्के शेतीला विम्याचे संरक्षण आहे. शेतकऱ्यांची मंडळे स्थापून करणे आणि सामूहिक विम्याचा अवलंब करून शेती किफायतशीर करणे शक्य आहे. दीर्घकालीन तगाईचे धोरण आखल्यास अवर्षण आणि अतिवृष्टी या दोन्ही संकटकाळात शेतकऱ्यांना बँकांमार्फत कर्ज देता येईल आणि बाजारातील टोकाची चढउतारही थांबविता येईल. पीक विम्यासाठी सबसिडी दिल्यास हवामानाचा धोका सहन करणे शेतकऱ्यांना शक्य होईल तसेच किमतीच्या चढउतारापासून संरक्षणाची हमी मिळेल. खाजगी सावकार कितीही वाईट असले तरी त्यांना बाजारपेठेची चांगली माहिती असते, त्यांना बँक प्रणालीत सामावून घेतल्यास त्यांचा उपयोग होऊ शकतो.पीक बदल आणि जमिनीची मशागत या पारंपरिक गोष्टींचा शेतीला फायदा होतोच, पण त्याबाबतची जागरूकता वाढविणे आवश्यक आहे. या बिनखर्चिक उपायांमुळे शेतीचा खर्च कमी होतो, जमिनीची धूप थांबते आणि जमीन सकस बनते. कृषी वनीकरणालाही प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यामुळे कृषी साधने समृद्ध होतात.देशाच्या सातत्यपूर्ण कृषी विकासासाठी नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल अ‍ॅग्रीकल्चर या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. या संस्थेने शेतीसमोरील आव्हानांचा यशस्वी विचार केला आहे, पण त्यावर अभिनव असे उपाय शोधण्यात आणि शेतीतील अकार्यक्षमतेवर उत्तर शोधण्यात या संस्थेला यश आलेले नाही. मोठ्या व छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठीही या संस्थेने काम करणे आवश्यक आहे. शेतीपयोगी जनावरांच्या क्षेत्रातही या संस्थेकडून अधिक संशोधनाची अपेक्षा आहे.तंत्रज्ञानावर भर हवाशेतीकडे नव्या तंत्रज्ञानाच्या नजरेतून पाहणे आवश्यक आहे. चांगले तंत्रज्ञान, आर्थिक मदत यामुळे शेतकऱ्याला अधिक उत्पादन देणारे व चांगला बाजारभाव मिळवून देणारे फळांसारखे उत्पादन घेण्यास प्रोत्साहित करता येईल. वरील उपायांमुळे शेतीचा खर्च कमी होऊ शकेल तसेच शेतकऱ्याला कृषी बाजारात सामावून घेणे शक्य होईल. चांगली किमत आणि सुरक्षित पुरवठा या माध्यमातून ग्रमीण भागाचा विकास दरही दोन आकडी करता येईल.वरुण गांधीलोकसभा सदस्य