शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्त्यांच्या संख्येत भयकारी वाढ

By admin | Updated: February 7, 2017 23:25 IST

‘महाराष्ट्र ही शेतकऱ्यांची स्मशानभूमी आहे’ असे जळजळीत विधान ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी त्यांच्या वार्तापत्रात काही

‘महाराष्ट्र ही शेतकऱ्यांची स्मशानभूमी आहे’ असे जळजळीत विधान ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी त्यांच्या वार्तापत्रात काही काळापूर्वी केले तेव्हा राज्यात तर खळबळ उडालीच पण अनेक सरकारभक्तांनी साईनाथ यांचा निषेधही केला. बँकांचे कर्ज, सावकारी कर्जाचा पाश, मुलांची बेरोजगारी, ग्रामीण भागात कामाची नसलेली संधी, शेतमालाला न मिळणारे भाव आणि शहरी बाजारात दलालांकडून होत असलेली लूट अशी अनेक कारणे या आत्महत्त्यांबाबत देताना साईनाथांनी त्यांचे म्हणणे सिद्ध करणारी अनेक उदाहरणेही दिली होती.

महाराष्ट्राच्या तुलनेत मागे असलेली व गरीब राहिलेली बिहार व उत्तर प्रदेशसारखी अनेक राज्ये देशात असताना इथलाच शेतकरी आत्महत्त्या का करतो या प्रश्नाचे एक उत्तर, त्याला आलेल्या भानाची होत असलेली सामाजिक व राजकीय गळचेपी हेही आहे. या आत्महत्त्या दारूबाजीमुळे होतात असे बाष्कळ विधान एका मंत्र्यांनीही केले होते. शेतकऱ्यांवरील कर्जे माफ करा, त्यांच्याभोवतीचे सावकारी पाश दूर करा अशा मागण्या सर्व बाजूंनी उठल्या. परंतु अशी कर्जे माफ केल्याने सहकार क्षेत्रातील पुढाऱ्यांच्याच तिजोऱ्या भरतील असे सांगून आताच्या सरकारने त्या अमान्य केल्या.

पाणीपुरवठा वाढविणे, नवे जलसाठे निर्माण करणे व शेतीची उत्पादकता वाढविणे यासारखे मार्ग अवलंबिण्यावर जास्तीचा बोलीव भर सरकार देत राहिले. परंतु शेतमालाला जोवर योग्य भाव मिळत नाही आणि त्यांच्या उत्पादनावर केल्या जाणाऱ्या खर्चाचा किमान दोन वा दीडपट भाव त्याला मिळत नाही तोवर त्याचे नष्टचर्य असेच राहील हे वास्तव शरद जोशींपासून शेती व्यवसायाचा अभ्यास करणाऱ्या व शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आंदोलनात उतरणाऱ्या अनेक ग्रामीण नेत्यांनी आजवर सांगितले. तसे होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या जीवनाचा ऱ्हास व त्यांच्या आत्महत्त्या अशाच चालू राहणार आहेत. आत्महत्त्या करणे हे दुबळ्याचे वा कमजोर मानसिकता असणाऱ्याचे काम नाही. मानसशास्त्र म्हणते आत्महत्त्या करायलाही आत्मबळच लागत असते.

मध्यंतरी एका राष्ट्रीय बुवाने ‘मी शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या थांबवितो’ अशी गर्जना करत आत्महत्त्याग्रस्त भागात काही प्रवचने दिली. त्याचा मोबदला त्याला मिळाला. शेतकरी मात्र नंतरही आत्महत्त्या करीतच राहिले. आताच्या महाराष्ट्र सरकारने कोणा एका कार्यकर्त्याला मंत्र्याचा दर्जा देऊन त्याच्यावर शेतकऱ्यांचे तातडीचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी सोपविली. परिणाम हा की त्याचा लाल दिवाच तेवढा फिरत राहिला आणि आत्महत्त्यांचे सत्र तसेच चालू राहिले. तात्पर्य, आतापर्यंतच्या सरकारी योजनांनी व त्यातील कल्पनांच्या भराऱ्यांनी मूळ प्रश्नाला कधी हातच घातला नाही. आपण जलशिवार योजना आणल्याच्या समाधानात सरकार मश्गूल आणि कोणा एकावर ‘ती’ जबाबदारी सोपवून सारे स्वस्थ. आताची कबुली केंद्रानेच दिली आहे आणि ती विदारक व राज्य सरकारचे अपयश उघड करणारी आहे.

केंद्रीय कृषिमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी या आत्महत्त्यांची जाहीर केलेली वार्षिक आकडेवारी साऱ्यांचे डोळे विस्फारणारी, सरकारचे नापास असणे सांगणारी आणि पुन्हा एकवार शेतमालाला योग्य भाव देण्याच्या मागणीपर्यंत साऱ्यांना नेणारी आहे. २००७ या वर्षी ४,०३८ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या. त्यानंतरच्या प्रत्येक वर्षी ३८०२, २८७२, ३१४१, ३३३७, ३७८६, ४००४, तर २०१५ मध्ये ४२९१ मराठी शेतकऱ्यांनी आत्महत्त्येचा मार्ग पत्करला. २०१४ आणि २०१५ या दोन वर्षांत महाराष्ट्रात आत्महत्त्या करणाऱ्यांची संख्या आठ हजारांवर गेली असे सांगणारी केंद्राची यंत्रणा २०१६ मधील आत्महत्त्यांची आकडेवारी अजून जमवीत आहे. सरकार कोणाचेही असो, त्यांचे शेतकऱ्यांकडे लक्ष नसते असे सांगणारे हे विदारक वास्तव आहे.

‘शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण’ असे शरद जोशी जे म्हणत ते या आकडेवारीतून सिद्ध होणारेही आहे. दु:ख याचे की शरद जोशी यांच्या हयातीत त्यांच्या त्या जहाल वाक्याची घ्यावी तशी दखल कोणी घेतली नाही आणि आजही ती घ्यावी असे संबंधितांना वाटत नाही. दु:ख याचे की धर्म, पंथ, जात, पुतळे आणि अस्मितांचे तथाकथित प्रश्न यावर आंदोलने करणारे आपले राजकीय पक्ष वा संघटना आपल्या माणसांच्या या खऱ्या प्रश्नासाठी कधी एकत्र येत नाहीत. शेतकऱ्यांचे आंदोलन शरद जोशींनी चालवावे, त्याच्याशी आमचा संबंध नाही अशीच या साऱ्यांची आजवरची वृत्ती राहिली आहे. या बाबतीत सरकारने काही ठोस योजना तयार करून त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचवाव्या यासाठी सरकारवर दबाव आणायलाही या यंत्रणा कधी पुढे होत नाहीत.

ग्रामीण भागातील मंत्र्यांच्या दौऱ्यांचे व बैठकांचे फोटो वर्तमानपत्रात छापून आणल्याने त्या भागातील जीवनमरणाचे प्रश्न सुटतात या भ्रमातून सरकारला कोणी बाहेर काढत नाही. ग्रामीण भागातील माणसे अशी मरतात याची नागर भागालाही चिंता नाही. आणि सरकार? त्याला सत्तेच्या गुर्मीत असे भान येण्याची शक्यताच मुळात कमी असते. रुपाला म्हणाले, ‘आम्ही योजना राबवतो. यंदाच्या खरीप योजनेत १,४१,८८३ कोटी रुपयांचे कृषी साहाय्य आम्ही दिले आहे.’ त्यांना विचारायचा प्रश्न हा की, तुम्ही जे दिले ते मग कुठे गेले?