शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

आडवी उभी झाली!

By admin | Updated: April 7, 2016 00:14 IST

केरळ आणि त्या पाठोपाठ बिहार या दोन राज्यांनी संपूर्ण दारुबंदीचे धोरण अंमलात आणले म्हणून या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या या धाडसी निर्णयाचे स्वागत आणि कौतुक

केरळ आणि त्या पाठोपाठ बिहार या दोन राज्यांनी संपूर्ण दारुबंदीचे धोरण अंमलात आणले म्हणून या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या या धाडसी निर्णयाचे स्वागत आणि कौतुक होणे स्वाभाविकच आहे. महाराष्ट्रातही नवे सरकार स्थापन झाल्यानंतर दोन जिल्ह्यांमध्ये दारुबंदी लागू करण्याचा निर्णय लागू करण्यात आला म्हणून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अनेकांनी आणि विशेषत: महिलांनी उत्स्फूर्त अभिनंदन केले. दारुबंदीचे धोरण अंमलात आल्यापासूनच्या वर्षभरात दोन्ही जिल्ह्यातील अपघात आणि एकूणच गुन्हेगारीत घट झाल्याचे मध्यंतरी जाहीर करण्यात आले. अर्थात त्याचवेळी राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मात्र अर्थमंत्र्यांच्या या निर्णयामुळे सरकारी महसुलात घट झाल्याबद्दल त्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीतच चार खडे शब्द सुनावल्याचे वृत्त मध्यंतरी प्रसिद्ध झाले होते. दारुबंदीचा तो निर्णय नेमका कशातून आला, लोकानुनयातून की दारुच्या सक्त विरोधातून यावर चर्चा होऊ शकते, पण मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातल्या एका गावाची जी कहाणी आता प्रसिद्ध झाली आहे ती मात्र साऱ्यांनाच चक्रावून सोडणारी आहे. ग्रामसभेत बहुमताने जर दारुच्या दुकानास विरोध झाला तर संबंधित गावातील ‘सरकारी दारु’चे दुकान बंद करावे असा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. या निर्णयानुसार संबंधित गावातील महिलांनी पुढाकार घेऊन सुमारे अकरा वर्षांपूर्वीच त्या गावातील दारुची उभी बाटली आडवी केली. पण आता त्याच महिलांनी आठ महिन्यांपूर्वी पुढाकार घेऊन ग्रामसभेत दारुच्या दुकानाला परवानगी मिळावी असा ठराव बहुमताने संमत केला आणि आडवी बाटली उभी होऊन आता तिथे थाटामाटात दारुचे दुकान सुरु झाले आहे. यामागील कारणच खरे चक्रावून सोडणारे आहे. कारण काय तर म्हणे या गावात दारु मिळत नाही म्हणून आजूबाजूच्या गावातील व्यापाऱ्यांनी म्हणे तिथे येणे-जाणेच पूर्णपणे थांबवून टाकले. त्याचा स्थानिक व्यापारावर तर परिणाम होत गेलाच शिवाय गावकऱ्यांची गैरसोय होत असतानाच गावाच्या अर्थकारणावरही त्याचा प्रतिकूल परिणाम होत गेला. याचा अर्थ खडसे यांनी दारुचा आणि अर्थकारणाचा जो संबंध जोडला, तो या गावातही दिसून आला. अर्थात गावात सरकारी दारु मिळत नव्हती म्हणजे गावठीही मिळत नव्हती असे नव्हे. जिथे कुठे कोणतीही बंदी असते तिथे अवैध धंद्याला बरकत येतच असते.