शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

हायकोर्टाने टोचले स्वत:चेच कान!

By admin | Updated: October 3, 2016 06:20 IST

उच्च न्यायालय प्रशासनाच्या झारीतील शुक्राचार्य प्रसंगी कायदाही धाब्यावर बसवतात.

उच्च न्यायालय प्रशासनाच्या झारीतील शुक्राचार्य प्रसंगी कायदाही धाब्यावर बसवतात. मात्र आता काही तरुण न्यायाधीश प्रशासनातील चुका निदर्शनास येताच त्यावर आसूड ओढू लागले आहेत. न्या. गौतम पटेल यांनी अलीकडच्या काळात बऱ्याच वेळा ते केले आहे.सरकारी प्रशासन स्वच्छ, पारदर्शी आणि लोकाभिमुभ करण्याची वाढती मागणी आणि प्रयत्न होत असले तरी व्यक्तिगत पातळीवर आढ्यताखोर अधिकारी अजूनही आढळतात. न्यायालयीन प्रशासनात तर ही वृत्ती प्रकर्षाने जाणवते. मनमानीचा हा स्तर न्यायालयाच्या श्रेणीनुसार वाढत जातो व उच्च न्यायालयात तर तो धास्ती वाटावी, या थराला दिसतो. उच्च न्यायालयाच्या प्रशासनात आणि खास करून मूळ शाखेवर (ओरिजिनल साईड) अजूनही गेल्या शतकातील सरंजामी वृत्तीची छाया दिसते. न्यायदान करताना कायद्यावर काटेकोर बोट ठेवणाऱ्या न्यायालयाच्या प्रशासनाच्या झारीतील हे शुक्राचार्य प्रसंगी कायदाही धाब्यावर बसवतात. पूर्वीही असे होत होते. पण त्याची वाच्यता होत नव्हती व विद्वान न्यायाधीश आपल्या न्यायालयीन कामांत याची फारशी दखल घेतानाही दिसत नव्हते.मात्र आता नव्याने नेमले गेलेले काही तरुण न्यायाधीश याला स्वागतार्ह अपवाद ठरत आहेत. प्रशासनातील चुका निदर्शनास येताच ते त्यावर निकालपत्रांमधून आसूड ओढू लागले आहेत. न्या. गौतम पटेल यांनी प्रशासनातील चुकारांचे कान टोचण्याचे काम अलीकडच्या काळात बऱ्याच वेळा केले आहे. ओघवत्या आणि अलंकृत भाषेत निकालपत्रे लिहिणाऱ्या न्या. पटेल यांच्या मनातील याविषयीचा उद्वेग आणि कळकळ शब्दाशब्दांतून व्यक्त होते. न्या. पटेल यांनी मूळ शाखेच्या (टेस्टॅमेंटरी विभाग) अधिकाऱ्यांच्या कानटोचणीचा जो ताजा कार्यक्रम केला ते प्रकरण म्हणजे लहरीपणाचा कळस ठरावे, असे आहे. जन्मदात्री आई ही तिच्या अपत्यांची नैसर्गिक पालक असते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तरीही हिंदूंच्या पुरुषप्रधान संस्कृतीत रूढ झालेल्या प्रथांमुळे वडील हयात असताना पालकत्वाच्या बाबतीत आईला दुय्यम स्थान देण्याचा समज रुजला होता. ब्रिटिशांनी केलेल्या ‘गार्डियनशिप अ‍ॅण्ड वॉर्ड््स अ‍ॅक्ट’ आणि स्वातंत्र्योत्तर काळात केल्या गेलेल्या ‘हिंदू मायनर्स अ‍ॅण्ड गार्डियन्स अ‍ॅक्ट’चाही तसाच अर्थ लावला जायचा. मात्र सुप्रीम कोर्टाने १९९९ मध्ये गीता हरिहरन वि. रिझर्व्ह बँक या प्रकरणात वडिलांच्या हयातीतही आई त्यांच्याएवढीच मुलांची पालक असते व तिलाही पालकत्वाचे सर्व अधिकार असतात, असे नि:संदिग्धपणे जाहीर केले. एकदा सुप्रीम कोर्टाने असे म्हटल्यावर तो संपूर्ण देशाचा कायदा होतो. असे असूनही याच्या विरुद्ध भूमिका घेऊन पक्षकारांना निष्कारण सतावण्याचा प्रकार न्या. पटेल यांच्यापुढे आला.मुंबईतील एका विधवेने पतीच्या निधनानंतर त्याच्या मिळकतीचे व्यवस्थापत्र मिळविण्यासाठी दोन अल्पवयीन मुलांसोबत अर्ज केला होता. संबंधित विभागातील अधिकाऱ्याने यास आक्षेप घेतला व त्याने या महिलेला, तुम्ही तुमच्या मुलांचे पालक आहात, असा आदेश आधी कोर्टाकडून घेऊन या, असे फर्मावले. न्या. पटेल यांनी आपल्या खास शैलीत या अधिकाऱ्याची चांगली कानउघाडणी केली. एवढेच नव्हे तर आधीच क्लिष्ट न्यायालयीन प्रक्रियांनी गांजलेल्या पक्षकारांना मनमानीपणाने आणखी त्रस्त करणे बंद करा, असेही सुनावले. याच अधिकाऱ्याने वर्षभरात केलेला हा दुसरा आगाऊपणा न्या. पटेल यांच्यापुढे आला होता. न्या. पटेल यांची न्यायबुद्धी नक्कीच वाखाणण्यासारखी आहे. उच्च न्यायालयात मूळ शाखा आणि अपिली शाखा यांच्या कारभारामध्ये आणि तेथील अधिकाऱ्यांच्या वृत्तीमध्ये लक्षणीय फरक जाणवतो. मूळ शाखेचे अधिकारी आढ्यताखोर व आत्मप्रौढी मिरविणारे जाणवतात, तर अपिली शाखेचे अधिकारी नको तेवढे भिजल्या मांजरासारखे वागतात. अपिली शाखेवरील रजिस्ट्रार व रजिस्ट्रार जनरल या पदांवरील अधिकारी जिल्हा न्यायाधीश दर्जाचे न्यायिक अधिकारी असतात. मूळ शाखेचे अधिकारी तसे नसूनही स्वत: न्यायाधीश असल्यासारखे वागतात. अपिली शाखेप्रमाणे मूळ शाखेवरही न्यायिक सेवेचे अधिकारी नेमावे, असे मध्यंतरी एका प्रकरणाच्या निकालपत्रात सुचविले गेले होते, ते याचसाठी. न्यायालयांच्या बाबतीत ‘दिव्याखाली अंधार’ बऱ्याच वर्षांपासून दाटलेला आहे. तो दूर करण्यासाठी असे बरेच दिवे लावण्याची गरज आहे!- अजित गोगटे