शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
4
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
5
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
6
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
7
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
8
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
9
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
10
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
11
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
12
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
13
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
14
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
15
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
16
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
17
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
18
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
19
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी

खरा कस लागेल

By admin | Updated: March 30, 2016 03:10 IST

उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुकीची व्यूहरचना करण्याची कामगिरी काँग्रेस पक्षाने या विषयातील तज्ज्ञ म्हणून अलीकडच्या काळात मान्यता पावलेले प्रशांत किशोर यांच्यावर

उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुकीची व्यूहरचना करण्याची कामगिरी काँग्रेस पक्षाने या विषयातील तज्ज्ञ म्हणून अलीकडच्या काळात मान्यता पावलेले प्रशांत किशोर यांच्यावर सोपविली असून त्यांच्यातील वकूब खऱ्या अर्थाने तिथे कसाला लागेल असे म्हणता येईल. तब्बल चारशे कोटींचा अर्थसंकल्प, पाचशे कार्यकर्त्यांची फौज, कांग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दोनेकशे सभा आणि प्रियंका गांधी-वड्रा यांचा सक्रीय सहभाग असे या व्यूहरचनेचे ढोबळ स्वरुप असल्याचे सांगितले जाते. प्रशांत किशोर प्रकाशझोतात आले, ते लोकसभेच्या मागील निवडणुकीच्या वेळी. त्यावेळी त्यांच्यावर भाजपाच्या प्रचार मोहिमेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या निवडणुकीचा निकाल साऱ्या जगासमोर आहे. त्यानंतर बिहार विधानसभेच्या निवडणुकीत नितीशकुमार यांनी प्रशांत किशोर यांना स्वत:कडे वळवून घेतले आणि आपल्या निवडणूक प्रचाराची धुरा त्यांच्या खांद्यावर ठेवली. त्या निवडणुकीचा निकालदेखील लोकांच्या समोर आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला किंवा व्यक्तिश: नरेन्द्र मोदी यांना जे घवघवीत यश मिळाले त्याचे शिल्पकार म्हणून त्या पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांचेही नाव घेतले जाते. लोकसभा निवडणुकीनंतर पाठोपाठच झालेल्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या यशाचेही तेच शिल्पकार होते. पण दिल्ली आणि बिहारमध्ये त्यांची कला काही फळली नाही. पण लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या यशात आणखी एक मोठा आणि महत्वाचा वाटेकरी होता आणि तो म्हणजे संपुआची आधीची कारकीर्द. त्यामुळे केवळ एकट्या प्रशांत किशोर यांनी भाजपा आणि मोदी यांना सत्तास्थानी बसविले असे म्हणणे म्हणजे मोदी, शाह आणि काँग्रेस यांचे श्रेय हिरावून घेणे! तोच प्रकार बिहार निवडणुकीबाबत. लालू आणि शरद हे दोघे यादव नितीशकुमारांसकट कधीच एकत्र येऊ शकत नाहीत असा माध्यमांचा होरा होता तर त्यांनी एकत्र येऊ नये असा भाजपाचा आशावाद होता. पण प्रत्यक्षात भाजपाच्या विरोधात मोठी आघाडी उभी राहिली आणि शाह यांचे शिल्पकला कौशल्य पुन्हा एकदा उघडे पडले. अशी आघाडी झाली नसती आणि मोहन भागवतांनी आरक्षणासंबंधी वादग्रस्त विधान केले नसते व तरीही नितीशकुमार घसघशीत बहुमताने मुख्यमंत्री बनले असते तर नि:संशय ते प्रशांत किशोर यांचे शिल्पकला कौशल्य मानले गेले असते. उत्तर प्रदेशाची तर बातच निराळी. मुलायमसिंह, मायावती, भाजपा आपले अस्तित्व राखून असतानाच आता बिहारातील मोठी आघाडीही तिथे उतरणार आहे. त्यांच्या तुलनेत काँग्रेसची आजची स्थिती अत्यंत नाजूक म्हणता येईल अशीच आहे. साहजिकच तिथे काँग्रेसचे शंभर जागांचे उद्दिष्ट साध्य करण्यात प्रशांत किशोर यशस्वी ठरले तरच त्यांच्या कौशल्यावर शिक्कामोर्तब होईल आणि म्हणूनच आता खरा त्यांचा कस लागेल.