शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

खरा कस लागेल

By admin | Updated: March 30, 2016 03:10 IST

उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुकीची व्यूहरचना करण्याची कामगिरी काँग्रेस पक्षाने या विषयातील तज्ज्ञ म्हणून अलीकडच्या काळात मान्यता पावलेले प्रशांत किशोर यांच्यावर

उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुकीची व्यूहरचना करण्याची कामगिरी काँग्रेस पक्षाने या विषयातील तज्ज्ञ म्हणून अलीकडच्या काळात मान्यता पावलेले प्रशांत किशोर यांच्यावर सोपविली असून त्यांच्यातील वकूब खऱ्या अर्थाने तिथे कसाला लागेल असे म्हणता येईल. तब्बल चारशे कोटींचा अर्थसंकल्प, पाचशे कार्यकर्त्यांची फौज, कांग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दोनेकशे सभा आणि प्रियंका गांधी-वड्रा यांचा सक्रीय सहभाग असे या व्यूहरचनेचे ढोबळ स्वरुप असल्याचे सांगितले जाते. प्रशांत किशोर प्रकाशझोतात आले, ते लोकसभेच्या मागील निवडणुकीच्या वेळी. त्यावेळी त्यांच्यावर भाजपाच्या प्रचार मोहिमेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या निवडणुकीचा निकाल साऱ्या जगासमोर आहे. त्यानंतर बिहार विधानसभेच्या निवडणुकीत नितीशकुमार यांनी प्रशांत किशोर यांना स्वत:कडे वळवून घेतले आणि आपल्या निवडणूक प्रचाराची धुरा त्यांच्या खांद्यावर ठेवली. त्या निवडणुकीचा निकालदेखील लोकांच्या समोर आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला किंवा व्यक्तिश: नरेन्द्र मोदी यांना जे घवघवीत यश मिळाले त्याचे शिल्पकार म्हणून त्या पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांचेही नाव घेतले जाते. लोकसभा निवडणुकीनंतर पाठोपाठच झालेल्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या यशाचेही तेच शिल्पकार होते. पण दिल्ली आणि बिहारमध्ये त्यांची कला काही फळली नाही. पण लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या यशात आणखी एक मोठा आणि महत्वाचा वाटेकरी होता आणि तो म्हणजे संपुआची आधीची कारकीर्द. त्यामुळे केवळ एकट्या प्रशांत किशोर यांनी भाजपा आणि मोदी यांना सत्तास्थानी बसविले असे म्हणणे म्हणजे मोदी, शाह आणि काँग्रेस यांचे श्रेय हिरावून घेणे! तोच प्रकार बिहार निवडणुकीबाबत. लालू आणि शरद हे दोघे यादव नितीशकुमारांसकट कधीच एकत्र येऊ शकत नाहीत असा माध्यमांचा होरा होता तर त्यांनी एकत्र येऊ नये असा भाजपाचा आशावाद होता. पण प्रत्यक्षात भाजपाच्या विरोधात मोठी आघाडी उभी राहिली आणि शाह यांचे शिल्पकला कौशल्य पुन्हा एकदा उघडे पडले. अशी आघाडी झाली नसती आणि मोहन भागवतांनी आरक्षणासंबंधी वादग्रस्त विधान केले नसते व तरीही नितीशकुमार घसघशीत बहुमताने मुख्यमंत्री बनले असते तर नि:संशय ते प्रशांत किशोर यांचे शिल्पकला कौशल्य मानले गेले असते. उत्तर प्रदेशाची तर बातच निराळी. मुलायमसिंह, मायावती, भाजपा आपले अस्तित्व राखून असतानाच आता बिहारातील मोठी आघाडीही तिथे उतरणार आहे. त्यांच्या तुलनेत काँग्रेसची आजची स्थिती अत्यंत नाजूक म्हणता येईल अशीच आहे. साहजिकच तिथे काँग्रेसचे शंभर जागांचे उद्दिष्ट साध्य करण्यात प्रशांत किशोर यशस्वी ठरले तरच त्यांच्या कौशल्यावर शिक्कामोर्तब होईल आणि म्हणूनच आता खरा त्यांचा कस लागेल.