शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
पतीचा तिनदा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
5
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
6
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
7
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
8
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
9
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
10
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
11
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
12
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
13
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
14
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
15
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
16
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
17
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
18
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
19
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
20
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती

ज्ञानदेवांचा चिद्विलासवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2016 05:53 IST

संपूर्ण विश्व हे वासुदेव तत्वाने भरले आहे. हे ज्याला समजले तोच खरा ज्ञानी आणि तोच खरा भक्त होय.

संपूर्ण विश्व हे वासुदेव तत्वाने भरले आहे. हे ज्याला समजले तोच खरा ज्ञानी आणि तोच खरा भक्त होय. ज्ञानदेव हेच सूत्र सांगतात...हे समस्तही श्री वासुदेवो।ऐसा प्रतितीरसाचा भावो।म्हणोनी भक्तामाजी रावो।आणि ज्ञानिया तोचि।सर्वत्र भरून राहिलेले तेच एकमेव ब्रह्मतत्व आहे. तेच अहैत आहे. तेच चैतन्य आहे. त्या चैतन्याची आराधना हीच परमात्म्याची पूजा होय. हेच चैतन्य प्रत्येक जीवमात्रात वास करीत आहे. म्हणूनच जीवाजीवातील चैतन्याची अनुभूती जेव्हा ज्ञानदेवांना झाली तेव्हा तीच अनुभूती ‘चिद्विलास’ तत्वातून उभी राहिली. ज्ञानदेवांनी एक सुंदर दृष्टांत दिला आहे...सुवर्णाचे मणि केले।तेच सोनियाचे सुती ओविले।तैसे म्या जग धरिले। सबाह्याभ्यंतरी।सोन्याचे मणी करावेत आणि सोन्याच्या सुतात ओवावेत मग काय वर्णावे? मणीही सोनेच आणि सुतही सोन्याचेच. सुवर्णाशिवाय दुसरे काही नाही. त्याप्रमाणे विश्व हा परमात्म्याचा विलास आहे.जग हे परमात्म्याने भरले आहे. आणि परमात्माच संपूर्ण विश्वात भरून उरला आहे.तो चैतन्याच्या अनुभूतीने विश्वरुपात वावरतो आहे. मग परमात्म्यापासून विश्व वेगळे कसे करता येईल? विश्व आणि त्यात भरलेला आत्मा एवढे देखील संभवत नाही. तर अवघा एकच आत्मा आहे आणि त्याला ब्रह्म असे म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज हे रामानुजांप्रमाणे विशिष्टाद्वैती अथवा वल्लभाचार्याप्रमाणे शुद्धाद्वैती नव्हते तर‘अवघेचित आत्मा’सांगणारे अद्वैती होते. जो भक्त सर्वत्र पाहतो आणि माझ्या ठायी सर्वांना पाहतो त्याच्या ठायी ऐक्याच्या भूमिकेतून मी सर्व भूतांत सारखाच व्यापून राहिलो आहे. त्यामुळे जीवा-जीवातील भेदानेही त्याच्या ठायी द्वैती उत्पन्न होत नाही.‘वासुदेव: सर्वमिति’या वचनाची अनुभूती हीच आहे.ज्ञानदेवांच्या या विचारातून सकल संतांनी परमात्म्यांचे विश्व उभे केले आणि विश्वाबरोबरच जीवाशिवातील परमात्मा शोधला. त्यातूनच ‘जनता-जनार्दन’ ही संकल्पना रुजली गेली. चिद्विलास तत्व मांडून ज्ञानदेवांनी भागवतधर्माला तत्वज्ञानाची बैठक दिली तर विश्व, त्यातील चैतन्य आणि परमात्मस्वरुप याची अनुभूती चिद्विलासातून मांडली गेली.आपले शुद्ध कर्म करीत जो नैतिक जीवन जगतो तो कोणीही त्याचा अधिकारी आहे. परमात्म्याच्या स्वरुपाची ओळख करून घेणे हे जसे अध्यात्माचे प्रयोजन आहे तसेच जीवनातील मूल्ये कृतीत उतरवून मानवाला दिव्याकडे नेणे हे देखील अध्यात्माचे सर्वात मोठे प्रयोजन ठरते.-डॉ. रामचंद्र देखणे