शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

ज्ञानदेवांचा चिद्विलासवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2016 05:53 IST

संपूर्ण विश्व हे वासुदेव तत्वाने भरले आहे. हे ज्याला समजले तोच खरा ज्ञानी आणि तोच खरा भक्त होय.

संपूर्ण विश्व हे वासुदेव तत्वाने भरले आहे. हे ज्याला समजले तोच खरा ज्ञानी आणि तोच खरा भक्त होय. ज्ञानदेव हेच सूत्र सांगतात...हे समस्तही श्री वासुदेवो।ऐसा प्रतितीरसाचा भावो।म्हणोनी भक्तामाजी रावो।आणि ज्ञानिया तोचि।सर्वत्र भरून राहिलेले तेच एकमेव ब्रह्मतत्व आहे. तेच अहैत आहे. तेच चैतन्य आहे. त्या चैतन्याची आराधना हीच परमात्म्याची पूजा होय. हेच चैतन्य प्रत्येक जीवमात्रात वास करीत आहे. म्हणूनच जीवाजीवातील चैतन्याची अनुभूती जेव्हा ज्ञानदेवांना झाली तेव्हा तीच अनुभूती ‘चिद्विलास’ तत्वातून उभी राहिली. ज्ञानदेवांनी एक सुंदर दृष्टांत दिला आहे...सुवर्णाचे मणि केले।तेच सोनियाचे सुती ओविले।तैसे म्या जग धरिले। सबाह्याभ्यंतरी।सोन्याचे मणी करावेत आणि सोन्याच्या सुतात ओवावेत मग काय वर्णावे? मणीही सोनेच आणि सुतही सोन्याचेच. सुवर्णाशिवाय दुसरे काही नाही. त्याप्रमाणे विश्व हा परमात्म्याचा विलास आहे.जग हे परमात्म्याने भरले आहे. आणि परमात्माच संपूर्ण विश्वात भरून उरला आहे.तो चैतन्याच्या अनुभूतीने विश्वरुपात वावरतो आहे. मग परमात्म्यापासून विश्व वेगळे कसे करता येईल? विश्व आणि त्यात भरलेला आत्मा एवढे देखील संभवत नाही. तर अवघा एकच आत्मा आहे आणि त्याला ब्रह्म असे म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज हे रामानुजांप्रमाणे विशिष्टाद्वैती अथवा वल्लभाचार्याप्रमाणे शुद्धाद्वैती नव्हते तर‘अवघेचित आत्मा’सांगणारे अद्वैती होते. जो भक्त सर्वत्र पाहतो आणि माझ्या ठायी सर्वांना पाहतो त्याच्या ठायी ऐक्याच्या भूमिकेतून मी सर्व भूतांत सारखाच व्यापून राहिलो आहे. त्यामुळे जीवा-जीवातील भेदानेही त्याच्या ठायी द्वैती उत्पन्न होत नाही.‘वासुदेव: सर्वमिति’या वचनाची अनुभूती हीच आहे.ज्ञानदेवांच्या या विचारातून सकल संतांनी परमात्म्यांचे विश्व उभे केले आणि विश्वाबरोबरच जीवाशिवातील परमात्मा शोधला. त्यातूनच ‘जनता-जनार्दन’ ही संकल्पना रुजली गेली. चिद्विलास तत्व मांडून ज्ञानदेवांनी भागवतधर्माला तत्वज्ञानाची बैठक दिली तर विश्व, त्यातील चैतन्य आणि परमात्मस्वरुप याची अनुभूती चिद्विलासातून मांडली गेली.आपले शुद्ध कर्म करीत जो नैतिक जीवन जगतो तो कोणीही त्याचा अधिकारी आहे. परमात्म्याच्या स्वरुपाची ओळख करून घेणे हे जसे अध्यात्माचे प्रयोजन आहे तसेच जीवनातील मूल्ये कृतीत उतरवून मानवाला दिव्याकडे नेणे हे देखील अध्यात्माचे सर्वात मोठे प्रयोजन ठरते.-डॉ. रामचंद्र देखणे