शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

गुरु विचार बदलतो

By admin | Updated: September 20, 2016 05:37 IST

भारतीय संस्कृतीमध्ये गुरूचे स्थान अनन्यसाधारण आहे. गुरूशिवाय आपल्याला ज्ञान मिळू शकत नाही.

भारतीय संस्कृतीमध्ये गुरूचे स्थान अनन्यसाधारण आहे. गुरूशिवाय आपल्याला ज्ञान मिळू शकत नाही. याच कारणामुळे परमात्म्याला गुरूची उपाधी दिलीे आहे. ‘गुरु: साक्षात परबह्म’।शास्त्रात अनेक प्रकारच्या गुरूंचे वर्णन आले आहे. परंतु श्रेष्ठ गुरू तोच, जो आत्मसाक्षात्कार किंवा संपूर्ण सत्याचे दर्शन घडवतो. म्हणूनच भक्त कबीर आपल्या गुरूसाठी शिर देण्यास सुध्दा तयार झाला.यह तन विष की वल्लरी,गुरु अमृत की खान ।शीश दिए जो गुरु मिले, तब भी सस्ता जान ।।गुरू आमच्यासाठी हे जगच बदलत नाहीत, तर आम्हालाच बदलून टाकतात. म्हणजेच आमचे विचार बदलतात. भारतीय परंपरेत परमेश्वर आपल्यातच वास करत असल्याचे मानले जाते. भक्त कबीर म्हणतात, मोको कहाँ ढुंढोरे बंदे,मैतो तेरे पास में ।ना मंदिर में, ना मस्जिद में,ना काबा कैलास में ।।परमेश्वर आमच्यातच वास करतो, परंतु आम्ही त्याला ओळखू शकत नाही. गुरू आम्हाला परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग सांगतात आणि आमच्यातील सुप्त अशा दिव्य शक्ती प्रकट करतात. आमच्यातील या सुप्त दिव्य शक्ती जेव्हा प्रकट होतात, तेव्हा सजीव व जग सृष्टी यांच्याबाबत असणारे आमचे विचार संपूर्णपणे बदलतात. त्यावेळी आम्हास वाटते की, आम्ही त्या अखंड सत्याशी जोडले गेलो आहोत आणि आम्हाला एकातच सर्व किंवा सर्वांमध्ये एक असल्याचा साक्षात्कार होतो.भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णानी परिस्थिती बदलली नाही, तर अर्जुनाचे विचार बदलले. जो अर्जुन हताश होऊन कर्तव्यापासून दूर पळत होता, तोच अर्जुन पूर्ण विश्वास आणि ताकदीने कर्तव्याशी जोडला गेला. ‘दिव्यं ददामि ते चक्षु:’अर्थात मी तुम्हाला दिव्य दृष्टी देतो. भगवान श्रीकृष्णाचे हे वचन गुरूद्वारा शिष्यामधील सुप्त शक्तीचा प्रत्यय घडवते.यासाठीच धन-दौलत, पुत्रादिकाचा लोभ उत्पन्न करणारा शिष्य घडवणाऱ्या गुरूला भारतीय परंपरेत स्थान नाही. गुरू आपल्याला अखंड व शाश्वत परमानंद देतो. -डॉ. भूषणकुमार उपाध्याय