शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

...शेवटी चिमटा बसणार तो सामान्यांच्याच खिशाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2022 10:29 IST

ब्रॅण्डनेम ऐवजी ‘प्रीपॅक्ड अँड लेबल्ड’ असा शब्दप्रयोग करून अन्नधान्यासह अनेक जीवनावश्यक वस्तू जीएसटीच्या कर कक्षेत आणल्या गेल्या आहेत.

- राजेंद्र बांठिया, अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर, पुणे

केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेचा आणि व्यापारी वर्गाचा कोणताही सारासार विचार न करता जीवनावश्यक वस्तूंवर म्हणजे गव्हाचा आटा, तांदूळ, पोहे, मुरमुरे, मखाना, राई, बार्ली, ओट्स, कॉर्न, ज्वारी, बाजरी, रागी, तृण-कडधान्याचे पीठ, गूळ, नैसर्गिक मध, दही, लस्सी, ताक, पनीर, गहू, गोठविलेले मांस-मच्छी, सेंद्रिय खते जर प्रीपॅक्ड अँड लेबल्ड असतील तर त्याला पाच टक्के जीएसटी लावण्याचा कायदा दि. १३ जुलै २०२२ ला करून त्याची पाच दिवसांत अंमलबजावणी करणे, हे अयोग्य असून सामान्य जनता आणि व्यापाऱ्यांवर अन्यायकारक आहे.

सुरुवातीला २०१७ मध्ये  केंद्राने   जीएसटी  प्रणाली अमलात  आणली. त्यावेळी व्यापाऱ्यांचा  विरोध   असताना रजिस्टर  ब्रँडच्या खाद्यान्न वस्तूंवर पाच टक्के जीएसटी  लावण्यात आला. रजिस्टर ब्रँडच्या वस्तूंवर ५  टक्के  जीएसटी  असल्याने  ग्राहकांनी   अन-रजिस्टर ब्रँडच्या  वस्तूंना  प्राधान्य  दिले. रजिस्टर   आणि  अन-रजिस्टर ब्रँडच्या किमतीतील फरकामुळे अनेक  व्यापाऱ्यांनी  किमतीतील स्पर्धेला  तोंड  देण्यासाठी  रजिस्टर्ड ब्रँड रद्द केले. त्यासाठी सरकारने कायद्यात  नवीन  बदल  करून  ब्रॅण्डनेम ऐवजी प्रीपॅक्ड अँड लेबल्ड असा  शब्दप्रयोग करून छोट्या पॅकिंगपासून २५ किलोपर्यंतच्या अन्नधान्यासह अनेक जीवनावश्यक वस्तू जीएसटीच्या करकक्षेत  आणल्या आहेत. 

जीएसटी पाच  टक्के  असला तरी  ग्राहकांपर्यत  माल   पोहोचेपर्यंत तो ८ टक्के  होणार  आहे.  या कायद्यामध्ये  प्री - प्रीपॅक्ड लेबल्ड तसेच लीगल मेट्रोलॉजी कायद्यानुसार २५ किलोपर्यंत असा शब्दप्रयोग केल्यामुळे हा कायदा  क्लिष्ट झाला आहे. आताच्या नव्या नियमानुसार एक ते २५ किलोपर्यंतच्या खाद्यान्न वस्तूंवर कर लागणार आहे. त्यामुळे घाऊक व्यापाऱ्यांनी २५ किलोच्या पॅकमध्ये विकल्यास त्याला कायद्यानुसार जीएसटी भरावा लागणार आहे. छोट्या व्यापाऱ्याला हा माल सुटा करून विकायचा असला तरी प्लास्टिकच्या १/२ किंवा १ किलो बॅगमध्ये भरावा लागणार आहे. त्यावर कायद्यानुसार पॅकिंग दिनांक, बेस्ट बिफोर, वजन, आदी गोष्टींचा उल्लेख करणे बंधनकारक आहे. व्यापाऱ्यांनी तसे केल्यास तो माल आपोआप लेबल्ड वर्गात समाविष्ट होऊन त्याला जीएसटी लागेल. याचा अर्थ सर्व खाद्यान्न वस्तूंना जीएसटी लागणार आणि त्याचा भुर्दंड सर्वसामान्यांना बसणार.

डाळी, तांदूळ, रवा, मैदा, पोहे-मुरमुरे, बेसन, मका, कड़धान्य, गहू, गूळ, आदी जीवनावश्यक  वस्तू  सुट्या  करून ठेवता येत नाहीत. कारण त्या खराब होतात. पोहे-मुरमुरे या वस्तूंची सुटी विक्री केल्यास त्या ओलसर (सादळणे) होतात तसेच आटा, मैदा, रवा, बेसन यांना १५ दिवसांत कीड लागते. जीएसटीमध्ये वारंवार होणाऱ्या बदलांमुळे ही करप्रणाली आधीच गुंतागुंतीची आहे. त्यात नवीन शब्दप्रयोगाद्वारे अनेक नवीन वस्तूंना करकक्षेत आणले जात आहे. त्या वेगाने संगणकप्रणालीत बदल करणे तसेच आवश्यक मनुष्यबळ मिळवणे कठीण होत आहे. 

सुरुवातीस ब्रँडेड अन्नधान्ये, डाळी, कडधान्ये, आदी वस्तू समाजातील सधन वर्गच वापरतो, असे सांगून त्यावर करआकारणी केली गेली. आता त्यात बदल करून अन्नधान्यासह गूळ, आटा, रवा, मैदा, पोहा मुरमुरे, डाळी, कडधान्येही करपात्र केली गेली आहेत. व्यापारी, गाहकवर्ग, नागरिक या सर्वच स्तरांतून या कर-आकारणीला प्रचंड विरोध होत आहे. अनेक राज्ये याबाबत वेगवेगळी भूमिका घेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये या बदलांना स्थगिती देणे संयुक्तिक होईल. जीएसटीची आकारणी सोपी होण्यासाठी विविध नियमांमध्ये सुसूत्रता आणावी, ही आमची आग्रहाची विनंती आहे.

टॅग्स :InflationमहागाईGSTजीएसटी