शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

गांधी विचारांचा थोर भाष्यकार

By admin | Updated: March 17, 2015 23:29 IST

नारायणभाई देसाई यांच्या निधनाने गांधी विचार व गांधी चरित्र यांचा थोर भाष्यकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

नारायणभाई देसाई यांच्या निधनाने गांधी विचार व गांधी चरित्र यांचा थोर भाष्यकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. गांधीजींनी ज्यांना आपले पुत्र मानले ते त्यांचे स्वीय सचिव महादेवभाई देसाई यांचे नारायणभाई हे चिरंजीव होते आणि गांधीजींचे जीवन त्यांच्या आंदोलनातील नेतृत्वासह जवळून पाहण्याची व त्यात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली होती. गांधीजींविषयीच्या कोणत्याही प्रश्नावर अंतिम भूमिका मांडण्याएवढा मोठा अधिकार त्यांनी निरीक्षण व अध्ययन यातून प्राप्त केला होता. गेली काही वर्षे ते ‘बापूकथा’ सांगण्याच्या मोहिमेवर होते. ११७ शहरांत प्रत्येकी एक आठवडा त्यांनी सांगितलेली ही रसाळ गांधीकथा आता मराठी, गुजराथी व इंग्रजी भाषेतील अनेक खंडात उपलब्धही आहे. गांधीजींवर लिहिलेली एक लाखांवर पुस्तके आज जगातील सर्व भाषांत उपलब्ध आहेत. तरीही त्यात प्यारेलालजी, तेंडुलकर किंवा लुई फिशर यांनी लिहिलेली चरित्रे अधिक मान्यता पावली आहेत. नारायणभार्इंचा अधिकार या तोलाचा होता हे येथे लक्षात घ्यायचे. बापूंवर लिहिल्या गेलेल्या इतर चरित्रग्रंथांहून नारायणभार्इंचे लेखन वेगळे होते. इतर चरित्रे बापूंच्या राजकीय, सामाजिक वा सुधारणाविषयक अंगांवर भर देतात. नारायणभार्इंचे बापूचरित्र समग्ररीत्या लिहिले आहे. बापूंचे आयुष्य ही त्यांची जीवनभरची आत्मसाधना होती. स्वातंत्र्याचा लढा असो वा भंगीमुक्तीचे आंदोलन, तो त्यांच्यासाठी आत्मशुद्धीचा व स्वत:च्या जवळ जाण्याचा प्रयत्न होता. नारायणभार्इंची बापूकथा त्यांच्या सगळ्या चळवळींचे व आंदोलनव्यवहाराचे नाते त्यांच्या आत्मशोधाच्या चळवळीशी जोडून दाखवणारे आहे. गांधीजींच्या आयुष्यात अनेक घटना आहेत, आव्हाने आहेत, संकटे आणि खस्ताही बऱ्याच आहेत. मात्र सगळ्या दिव्यांमधून जाणारा व बाहेर पडणारा गांधी एक आत्मसाधक आहे या विचारापासून नारायणभार्इंचे बापूचरित्र जराही कुठे ढळलेले नाही. त्यांच्या गांधीकथेत दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी काळ्या माणसांच्या अधिकारासाठी दिलेल्या लढ्यापासून १९४२ च्या संग्रामापर्यंतची सारी कहाणी तपशिलाने पण अतिशय हळुवारपणे यायची. विशेषत: कस्तुरबांच्या निधनाची हकिकत सांगताना त्यांचे व त्यांच्या श्रोत्यांचे डोळे पाणावायचे. पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये कस्तुरबांच्या समाधीशेजारीच नारायणभार्इंच्या वडिलांची, महादेवभार्इंची समाधी आहे. ही एकच गोष्ट त्यांची गांधीजींशी असणारी जवळीक सांगणारी आहे. मृत्यूसमयी नारायणभार्इंचे वय ९० वर्षांचे होते. वयाच्या ३८ व्या वर्षापर्यंत ते गांधीजींजवळ वाढले. गांधीजींच्या जवळ असणारी व त्यांचे निकटवर्ती अनुयायी असणारी माणसे त्यांनी जवळून पाहिली. त्यांचीही अतिशय सुरेख वर्णने त्यांच्या सगळ्या वैशिष्ट्यांसह त्यांच्या कथेत येत. मधुर वाणी, जबर स्मरणशक्ती, सखोल अध्ययन, प्रखर निरीक्षण आणि विद्यार्थ्याची विनम्र वृत्ती या साऱ्या गोष्टींचा अनुभव त्यांच्या श्रोत्यांच्या पदरात पडायचा. साबरमती आश्रमात जन्म झालेल्या आणि त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘बापूंच्या मांडीवर वाढलेल्या’ नारायणभार्इंवर यथाकाळ सेवाग्राम आश्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आली. सर्वसेवासंघाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते. गुजरातमधील गांधी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. जयप्रकाशांच्या आंदोलनात स्थापन झालेल्या तरुण शांती सेनेचे अध्वर्यूपदही त्यांच्याकडे होते. १९६० ते ७६ या काळात त्यांनी विनोबांसोबत १२ हजार कि.मी.ची पदयात्रा केली व त्यांच्या भूदान यज्ञाला तीन हजार एकर जमीन मिळवून दिली. नारायणभाई आंतरराष्ट्रीय युद्धविरोधी संघटनेचे अध्यक्ष आणि जागतिक शांती सेनेचे संस्थापक होते. सारे जग अण्वस्त्रमुक्त करण्याच्या ईर्ष्येनेही त्यांनी जागतिक व्यासपीठांवर मोठी झुंज दिली. युनेस्को या जागतिक संघटनेने त्यासाठी अहिंसा व सद््भावनेचा श्रेष्ठ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. शालेय शिक्षणापासून दूर राहिलेल्या नारायणभार्इंचा अनेक देशी व विदेशी भाषांवर अधिकार होता आणि त्यात ते अस्खलितपणे बोलू शकत. ‘रोझ इन फायर’ हे त्यांनी लिहिलेले गांधीजी व महादेवभाई यांच्या संबंधांवरील पुस्तक इतिहासाचा एक मोठा ठेवा मानले जाते. त्यांच्या ५० वर पुस्तकांतील त्यांची भाष्येही गांधी विचारांवरील अधिकृत भाष्ये मानली जातात. ९० वर्षे ‘गांधीजीवन’ जगत राहिलेले नारायणभाई जगाचा निरोप घेताना मात्र एक व्यथा मनात घेऊन गेले. गुजरात विद्यापीठाच्या अखेरच्या दीक्षांत समारंभात भाषण करताना ती व्यथा त्यांनी बोलून दाखविली. ‘सारे जग एक करायला निघालेले गांधीवादी स्वत:ला मात्र एकत्र आणू शकले नाहीत’ ही त्यांची वेदना होती. किमान तुम्ही तुमचे अहंकार बाजूला सारा आणि एकमेकांच्या जवळ या, गांधीजींचा विचार त्याच स्थितीत तुम्हाला पुढे नेता येईल’ असे त्यावेळी ते म्हणाले होते. त्या समारंभाचे प्रमुख पाहुणे असलेल्या न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी त्यांना या मार्गातले अडसर तेव्हा समजावून सांगितले. मात्र त्यावर समाधान न झालेले नारायणभाई त्यांची ती व्यथा आपल्या सोबत घेऊन या जगातून आता रवाना झाले आहेत. यातून या देशातले स्वत:ला गांधीवादी म्हणवणारे काही धडा घेतील तर ती त्यांची नारायणभार्इंना खरी श्रद्धांजली ठरेल.