शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

राज्यपाल येती गावा...

By admin | Updated: February 5, 2015 23:58 IST

तात्कालिक व पर्यायाने वेळकाढू उपाययोजनांवरच निभावून नेण्याची सवय जडल्याने शासनातील महनीय व्यक्तींचे दौरे अंशत: का होईना लाभदायी ठरत असतात.

राज्यपालांच्या दौऱ्यामुळे नाशिक व नंदुरबार जिल्ह्यातील नागलवाडी व पिंपळखुटा गावात घडून आलेल्या प्रासंगिकविकासाला यापुढील काळातस्थायित्व लाभू शकेल का?कर्तव्यदत्त कामात कसूर करणाऱ्या नोकरशाहीला हल्ली प्रासंगिक, तात्कालिक व पर्यायाने वेळकाढू उपाययोजनांवरच निभावून नेण्याची सवय जडल्याने शासनातील महनीय व्यक्तींचे दौरे अंशत: का होईना लाभदायी ठरत असतात. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी नाशिक व नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी गावांना दिलेल्या भेटीनिमित्त त्या-त्या गावांच्या झालेल्या कायापालटातूनही हीच बाब अधोरेखित होऊन गेली आहे.प्रशासकीय यंत्रणेने घातलेली हाता-पायांची घडी सोडवणे हे किती जिकिरीचे असते याबद्दल सविस्तर विवेचन करण्याची गरज नसावी. किरकोळ वा सहजशक्य म्हणवली जाणारी विकासकामे साकारतानाही त्यासाठी बनविली जाणारी ढीगभर कागदपत्रे व त्या कागदपत्रांचा या टेबलावरून त्या टेबलावरचा प्रवास अनेकांनी कधी ना कधी अनुभवून झालेला असतो. पण जेव्हा शासनातील एखादी महनीय व्यक्ती कुणा गावाला भेट देण्यासाठी येते, तेव्हा हीच यंत्रणा प्रचलित ‘अ’व्यवस्थांमधून मार्ग काढत अवघ्या दोन-चार दिवसांत वा प्रसंगी काही तासांत आपल्यातील कार्यक्षमतेचा असा काही परिचय घडवून देते की, कुणीही आश्चर्याने अवाक् व्हावे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या दौऱ्यानिमित्त नाशिक जिल्ह्यातील नागलवाडी व नंदुरबार जिल्ह्यातील पिंपळखुटा या अतिदुर्गम आदिवासी गावांच्या बदललेल्या रंग-रूपाकडे याच संदर्भाने पाहता येणारे आहे. ते बघूनच दोन्ही ठिकाणी लगतच्या गावकऱ्यांनीही राज्यपालांना आपल्या गावी येण्याचा आग्रह धरल्याचे दिसून आले. त्यांच्या येण्याने तरी आपल्या गावाचा चेहरा-मोहरा बदलेल, अशी आशा त्यामागे होती. तेव्हा, राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तींच्या दौऱ्यामुळे घडून येणारा सदरचा प्रासंगिक विकास स्थायी व सार्वत्रिक स्वरूपात का घडून येऊ नये हा तर याबाबतीतला खरा मुद्दा आहेच, पण तो यापुढील काळातही टिकवून ठेवता येणार आहे का, असा प्रश्नही आहे.यासंदर्भातील आजवरचा अनुभव समाधानकारक नाही, म्हणूनही हा प्रश्न महत्त्वाचा ठरावा. यापूर्वी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रपतिपदी असताना आॅक्टो. २००५ मध्ये इगतपुरी तालुक्यातील वैतागवाडीनामक वस्तीवर येऊन गेले होते. त्यांच्या येण्याने चकाचक झालेल्या या वस्तीच्या नावातील ‘वैताग’ खुद्द राष्ट्रपती महोदयांनी दूर करीत या वस्तीला आशाकिरणवाडी असे नाव दिले होते. परंतु तद्नंतरच्या काळात विकासविषयक कुठल्याही योजनेच्या बाबतीत आशेचा किरण बाळगावा, अशी तेथली परिस्थिती राहिली नाही. आज तेथील ग्रामस्थांना वस्तीच्या मूळ नावाप्रमाणे ‘वैतागा’चाच सामना करावा लागत आहे. चारच वर्षांपूर्वी सप्टें. २०१० मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग व संपुआ अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली येथून देशातील आधारकार्ड वितरण योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यावेळी टेंभलीचाही चेहरा-मोहरा असाच रात्रीतून बदलण्यात आला होता. आज त्या विकासाची गंध-पावडर तर उडून गेली आहेच, परंतु ज्या गावातून ‘आधार’चा देशपातळीवरील शुभारंभ करण्यात आला ते गावही खुद्द शंभर टक्के ‘आधार’युक्त होऊ शकलेले नाही. ही उजळणी यासाठी की, मान्यवरांच्या येण्याने अवतरणारा प्रासंगिक विकास नंतरच्या काळातही टिकून राहिल्याचे उदाहरण अपवादाने आढळावे. तेव्हा, विकास ही जर निरंतर चालणारी प्रक्रिया असेल तर ती अशी प्रसंगोपातच का घडून यावी? आपल्या यंत्रणा स्थायी स्वरूपाची कामे करण्यापेक्षा अथवा त्याकडे निरंतर लक्ष पुरविण्याऐवजी तात्कालिक, दिखाऊ वा प्रदर्शनी आणि पर्यायाने झगमगाटी कामांतच कशा समाधान शोधत असतात याचे उत्तर या उदाहरणांतून मिळून येणारे आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उत्तर महाराष्ट्रातील दौऱ्यानिमित्त नागलवाडीचा जो विकास झाला व पिंपळखुटा गावाला जोडणारा जो रस्ता झाला त्याचीही अवस्था वैतागवाडी वा टेंभलीसारखी होऊ नये म्हणजे झाले.- किरण अग्रवाल