शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
6
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
7
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
8
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
9
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
10
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
11
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
12
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
13
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
14
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
15
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
16
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
17
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
20
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार

गोविंदावर चर्चा केलेली बरी

By admin | Updated: August 29, 2016 02:11 IST

तूरडाळ, महागाई, पाच पैसे किलोचा कांदा हे सगळे विषय गोविंदाच्या हंडीतून सरत्या आठवड्यात वाहून गेले. तिकडे राज्यकर्तेही खूष झाले, दुसरीकडे राजकारणी समाधानी आणि तिसरीकडे गोविंदाही फॉर्मात.

तूरडाळ, महागाई, पाच पैसे किलोचा कांदा हे सगळे विषय गोविंदाच्या हंडीतून सरत्या आठवड्यात वाहून गेले. तिकडे राज्यकर्तेही खूष झाले, दुसरीकडे राजकारणी समाधानी आणि तिसरीकडे गोविंदाही फॉर्मात... सर्वसामान्य माणसाचा आवाज गोविंदासाठी लावलेल्या डीजेच्या आवाजात कुठे विरुन गेला कोणास ठाऊक? सर्वसाधारणपणे कल्याणकारी राज्यात नेहमी विकासाचे प्रश्न, केलेली कामे, लोकांच्या हाती काय पडले याचा लेखाजोखा ठेवला जातो. निदान असे बोलले तरी जाते. पण संपलेल्या आठवड्याकडे नजर टाकली तर यातले काहीएक सर्वसामान्य माणसाच्या हाती लागले नाही.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री सांगतात डाळ स्वस्त झालीय, रेशन दुकानात १०३ ते १०५ रुपये किलोने ती मिळते, मात्र तीच डाळ मॉलमध्ये ९५ रुपयांना दिली जाणार असल्याचे सरकारच सांगते. त्यावेळी गोरगरिबांनी तूर डाळीसाठी रेशन दुकान सोडून मॉलपुढे रांगा लावायच्या का? जर लावल्या तर तेथे पुरेसा साठा आहे का? गिरीष बापट यांनी या सगळ्यांची शांतपणे संगती लावावी आणि त्यांना जे काही चालू आहे ते पटत असेल तर मग काही चर्चाच उरत नाही.

रेशन दुकानातून जी डाळ मिळते, ती किती खराब आहे याचे पुरावे बापट यांनी नेमलेल्याच दक्षता समितीने आणून दाखवले. अन्न व नागरी पुरवठा विभाग ज्या एफडीएच्या अंतर्गत येते त्याचे अधिकारी कोणतीही भेसळ रोखण्याच्या मानसिकतेत नाहीत. रेशन दुकानांच्या धान्याचे नियोजन करण्यासाठी या विभागाला महसूल विभागाने दिलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. ते कर्मचारी देखील आधी स्वत:चे पाहातात आणि नंतर गोरगरिबांकडे लक्ष देतात, असा सार्वत्रिक समज आहे. अशा वेळी जनतेने काय करायचे याचे उत्तर गोविंदा पथकांसाठी पेपरबाजी करणाऱ्या एकाही नेत्याने दिलेले नाही. कांद्यावरुन राष्ट्रवादीने नाशकात व्यापाऱ्यांना हाताशी धरुन राजकारण सुरु केले.

दिल्लीत बसलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना याचे गांभीर्य लक्षात आले आणि त्यांनी त्यासाठी बैठक घेतली. कांद्याच्या राजकारणावरुन निवडणुकीत राज्य गमवावे लागल्याचा इतिहास जुना नाही. तरीही या प्रश्नाकडे भाजपा म्हणावे तेवढे लक्ष देण्यास तयार नाही. शेतकरी नाममात्र दराने कांदा विकतो तो सर्वसामान्य ग्राहकाना मात्र आजही तीस चाळीस रुपये दराने मिळतो. कांद्याच्या खराब होणाऱ्या उंच ढिगाऱ्यांपेक्षा गोविंदाचे मनोरे या वर्षी जास्त चर्चेत आले, कांदा तर काय रोजचाच विषय आहे...

सरत्या आठवड्यात आणखी एक महत्वाची गोष्ट घडली, पण तिच्याकडेही कोणाचे लक्ष गेले नाही. महाराष्ट्राच्या पाण्यावर तेलंगणाने स्वत:ची भूमी सुजल सुफल करण्याची मुहूर्तमेढ आपल्या राज्यात, आपल्याच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रोवली. आपल्या राज्यातील आपल्या हक्काचे पाणी अडवायचे की नाही याचा निर्णय आपण घ्यायचा आहे. कृष्णा लवाद, असो की आंध्र आणि अन्य कोणत्या राज्यांचे वाद असोत अन्य राज्ये किती नियमाने वागतात हे गेल्या ५० वर्षात आपण जवळून पाहिलेले आहे. तरीही आपण त्यात फारसे गांभीर्य दाखवलेले नाही. आपल्याकडच्या प्राणहिता, गोदावरी आणि पैनगंगा या तीन बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. गेल्यावर्षी गोदावरीच्या पात्रातील एक हजार टीएमसी पाणी वाया गेले असे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन सांगतात.

मात्र आपण या नद्यांचे पाणी अडवायचा विषय निघाला की निधी नसल्याचे कारण पुढे करतो. या सगळ्या साठमारीत आपल्या राज्यातले वाहून जाणारे पाणी आहे, असे सांगत तेलंगणाला तब्बल १३० टीएमसी पाणी देण्याचा करार करुन मोकळे झालो आहोत. आम्ही पाणी अडवू शकत नाही, मग तुम्हीच आमच्याकडे बंधारे बांधा, तुम्हीच पैसे खर्च करा, तुम्हीच शेतकऱ्यांना मोबदलाही द्या आम्ही फक्त यामुळे आमचे ३० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले असे म्हणून मोकळे होऊ... या अशा चर्चा तरी कशासाठी करायच्या... त्यापेक्षा गोविंदाचे ढाकुम ढुकुम बरे आहे आपले... - अतुल कुलकर्णी