शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गंगा मैलीच!

By admin | Updated: March 20, 2017 00:02 IST

गंगा नदी म्हणजे भारतीयांच्या आस्थेचा विषय. परंतु लोकांच्या या आस्थेविषयी मनात संशय निर्माण व्हावा एवढी दैनावस्था गंगेची

गंगा नदी म्हणजे भारतीयांच्या आस्थेचा विषय. परंतु लोकांच्या या आस्थेविषयी मनात संशय निर्माण व्हावा एवढी दैनावस्था गंगेची आज झाली आहे. गंगेच्या शुद्धीकरणासाठी आजवर अनेक योजना राबविण्यात आल्या. कोट्यवधी रुपये खर्च झाले. परंतु ती प्रदूषणमुक्त होण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाहीत. राष्ट्रीय हरित लवादालाही या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेणे भाग पडले आहे. गरज पडल्यास उत्तर प्रदेशात गंगा नदीशी संबंधित सर्व योजनांची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी केली जाईल, अशी ताकीद लवादाने नुकतीच दिली आहे. त्यामुळे गंगेचे वास्तव लक्षात घेता आता आम्ही उगाचच गंगा शुद्धीकरणाचा बोभाटा करण्यापेक्षा या विषयावर गांभीर्याने विचार करणे अधिक क्रमप्राप्त ठरणार आहे. केंद्र सरकारने मोठ्या गाज्यावाज्यासह २० हजार कोटी रुपयांच्या नमामी गंगे योजनेस प्रारंभ केला होता. या योजनेचा दुसरा टप्पा गेल्यावर्षी सुरू झाला. परंतु याचा पहिला टप्पाच एवढा निष्कृष्ट ठरला की केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला कधी न्यायालय तर कधी हरित लवादाचे फटकारे सहन करावे लागत आहेत. मुळात गंगेच्या शुद्धीकरणासाठी अनेक दावे केले जात असले तरी गंगा शुद्ध कशी होणार याबाबत ठोस उपाय कुणाहीकडे नाही. गंगेच्या परिसरातील शेकडो कारखान्यांचा सुद्धा तिच्या प्रदूषणात फार मोठा हातभार आहे. काही दिवसांपूर्वी वाराणसीतील गंगाजलाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. त्याचे निष्कर्ष अत्यंत धक्कादायक आहेत. गंगेच्या १०० मिलीलिटर पाण्यात ५० हजार हानिकारक विषाणू आढळून आले आहेत. आंघोळीच्या पाण्यासाठी शासनाने जे मानक निर्धारित केले आहे त्यापेक्षा विषाणूंची ही संख्या १० हजार पट अधिक आहे. धोक्यात असलेल्या जगातील दहा नद्यांमध्ये गंगेचा समावेश असल्याचे वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंडचे म्हणणे आहे. गंगेत माशांच्या सुमारे १४० प्रजाती आढळतात. परंतु गंगा स्वच्छ ठेवण्यात मोलाचे सहकार्य करणाऱ्या माशांच्या अनेक प्रजाती प्रदूषणाने नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे गंगेच्या शुद्धीकरणासाठी अब्जावधी रुपयांच्या योजना राबविण्यात आल्या तरी जोपर्यंत लोक जागरुक असणार नाहीत तोपर्यंत या योजनेचे भवितव्य अंधारातच राहील.