शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

गंगा मैलीच!

By admin | Updated: March 20, 2017 00:02 IST

गंगा नदी म्हणजे भारतीयांच्या आस्थेचा विषय. परंतु लोकांच्या या आस्थेविषयी मनात संशय निर्माण व्हावा एवढी दैनावस्था गंगेची

गंगा नदी म्हणजे भारतीयांच्या आस्थेचा विषय. परंतु लोकांच्या या आस्थेविषयी मनात संशय निर्माण व्हावा एवढी दैनावस्था गंगेची आज झाली आहे. गंगेच्या शुद्धीकरणासाठी आजवर अनेक योजना राबविण्यात आल्या. कोट्यवधी रुपये खर्च झाले. परंतु ती प्रदूषणमुक्त होण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाहीत. राष्ट्रीय हरित लवादालाही या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेणे भाग पडले आहे. गरज पडल्यास उत्तर प्रदेशात गंगा नदीशी संबंधित सर्व योजनांची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी केली जाईल, अशी ताकीद लवादाने नुकतीच दिली आहे. त्यामुळे गंगेचे वास्तव लक्षात घेता आता आम्ही उगाचच गंगा शुद्धीकरणाचा बोभाटा करण्यापेक्षा या विषयावर गांभीर्याने विचार करणे अधिक क्रमप्राप्त ठरणार आहे. केंद्र सरकारने मोठ्या गाज्यावाज्यासह २० हजार कोटी रुपयांच्या नमामी गंगे योजनेस प्रारंभ केला होता. या योजनेचा दुसरा टप्पा गेल्यावर्षी सुरू झाला. परंतु याचा पहिला टप्पाच एवढा निष्कृष्ट ठरला की केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला कधी न्यायालय तर कधी हरित लवादाचे फटकारे सहन करावे लागत आहेत. मुळात गंगेच्या शुद्धीकरणासाठी अनेक दावे केले जात असले तरी गंगा शुद्ध कशी होणार याबाबत ठोस उपाय कुणाहीकडे नाही. गंगेच्या परिसरातील शेकडो कारखान्यांचा सुद्धा तिच्या प्रदूषणात फार मोठा हातभार आहे. काही दिवसांपूर्वी वाराणसीतील गंगाजलाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. त्याचे निष्कर्ष अत्यंत धक्कादायक आहेत. गंगेच्या १०० मिलीलिटर पाण्यात ५० हजार हानिकारक विषाणू आढळून आले आहेत. आंघोळीच्या पाण्यासाठी शासनाने जे मानक निर्धारित केले आहे त्यापेक्षा विषाणूंची ही संख्या १० हजार पट अधिक आहे. धोक्यात असलेल्या जगातील दहा नद्यांमध्ये गंगेचा समावेश असल्याचे वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंडचे म्हणणे आहे. गंगेत माशांच्या सुमारे १४० प्रजाती आढळतात. परंतु गंगा स्वच्छ ठेवण्यात मोलाचे सहकार्य करणाऱ्या माशांच्या अनेक प्रजाती प्रदूषणाने नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे गंगेच्या शुद्धीकरणासाठी अब्जावधी रुपयांच्या योजना राबविण्यात आल्या तरी जोपर्यंत लोक जागरुक असणार नाहीत तोपर्यंत या योजनेचे भवितव्य अंधारातच राहील.