शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

सेवा शुल्क पूर्णत: माफ करा

By admin | Updated: January 8, 2017 01:44 IST

आपल्याकडे हॉटेल उद्योगातील सर्व्हिस चार्ज (सेवा शुल्क) आणि सर्व्हिस टॅक्सबाबतचा विचार दोन वर्षांपूर्वीच सुरू झाला होता. आता केंद्र सरकारने यापैकी सेवा शुल्क ग्राहकाला ऐच्छिक केले आहे.

- वर्षा राऊत आपल्याकडे हॉटेल उद्योगातील सर्व्हिस चार्ज (सेवा शुल्क) आणि सर्व्हिस टॅक्सबाबतचा विचार दोन वर्षांपूर्वीच सुरू झाला होता. आता केंद्र सरकारने यापैकी सेवा शुल्क ग्राहकाला ऐच्छिक केले आहे. मात्र असे असले तरी सेवा शुल्क द्यायचे की नाही, याबाबत ग्राहकांचा गोंधळ उडाला आहे. मुळात सेवा शुल्क भरणे हे बंधनकारक नाही. मात्र हॉटेलचालकांनी आपापल्यापरीने सेवा शुल्क सुरू केले आहे. परिणामी वेटरला देण्यात येणारी ‘टिप’, सेवा शुल्क आणि उर्वरित करांचा भरणा सर्वसामान्य ग्राहकांवर पडत असून, त्याच्या बिलात वरचेवर वाढच होत आहे.सर्व्हिस टॅक्स आणि सर्व्हिस चार्ज यातला फरक ग्राहकांनी ओळखला पाहिजे. सर्वसामान्य ग्राहक जेव्हा हॉटेलमध्ये जातो; तेव्हा आपण अदा करणारे बिल नीट पाहत नाही. परिणामी ‘बिल रीडिंग’ महत्त्वाचे आहे. शिवाय ग्राहकांनी ‘लेबल रीडिंग’ करणे आवश्यक आहे. ग्राहकांनी आपले बिल वाचावे किंवा बिल रीडिंग करावे, अशी व्यवस्था असून, ग्राहकांनी बिल वाचावे याबाबत व्यापारी, हॉटेलचालक कधीच आग्रही नसतात. अथवा ग्राहकांची फसवणूक होणार नाही, याची काळजीही हॉटेलचालक कधी घेत नाहीत. उडपी हॉटेल्सचा विचार करायचा झाला तर ते सेवा शुल्क घेत नसतील. मात्र मोठी हॉटेल्स सेवा शुल्क घेत असून, त्यांचा मार्ग हा छुपा आहे. आपण जेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये जातो; तेव्हा तेथील सेवा किती चांगल्या आहेत, सेवेबाबत आपण समाधानी आहोत का? जेवण चांगले आहे का? हे सर्व आपण पाहत नाही. सेवा शुल्काचा उल्लेख मेन्यू कार्डवर असला पाहिजे ही एकतर्फी बाब असून, ग्राहकाला पद्धतशीरपणे फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो की प्रथमत: आपण मेन्यू कार्डवरील आवडता पदार्थ आणि त्यानंतर त्या पदार्थाची किंमत पाहतो. मात्र मेन्यू कार्डवरील सेवा शुल्काची प्रिंट पाहत नाही.परिणामी आपण एखाद्या हॉटेल चालकाला सेवा शुल्काबाबत विचारले असता हॉटेलचालक नियमांवर बोट ठेवतो. याचा अर्थ एवढाच की आपण काही तरी निमित्ताने हॉटेलमध्ये जात असतो. आपले हॉटेलमध्ये जाणे कोणत्याही निमित्ताने थांबणार नाही. मात्र अशा वेळी आपण ज्या हॉटेलमध्ये जातो; तेव्हा समाधानकारक सेवा देणे हॉटेलचे काम असते. सरकारने सेवा शुल्क ऐच्छिक केल्यानंतर सर्वसामान्य ग्राहकांचा आणखी गोंधळ उडाला आहे. परिणामी ग्राहकांनी सेवा शुल्क अदाच करू नये, असा सरसकट आदेश सरकारने देणे गरजेचे आहे. यात कोणत्याही जर आणि तरची बाब असू नये. सेवा शुल्क अदा करणे हे ग्राहकांवर अवलंबून नसावे. दुसरे असे की, एखाद्या ग्राहकाने अदा केलेले सेवा शुल्क वेटरच्याच खिशात जात नसेल तर मग ते कुठे जाते, हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे सेवा शुल्क ऐच्छिक करण्यात येऊ नये, असे हॉटेलचालकांचे म्हणणे आहे. शिवाय त्यांच्यावर उर्वरित करांचाही भरणा पडतो आहे, असे स्पष्टीकरण हॉटेल संघटनांनी दिले आहे. मात्र आपण जर बारकाईने विचार केला तर ‘फूड इंडस्ट्री’ ही शंभर टक्के नफ्यात आहे. खाद्यपदार्थांचा उद्योग वाढला आहे आणि हा खर्च ग्राहकांच्या खिशातून वसूल केला जात आहे. परिणामी या सगळ्याच्या ‘कॉस्टिंग’मध्ये जाणे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे आहे.(लेखिका मुंबई ग्राहक पंचायतीच्या जनजागृती विभागाच्या प्रमुख आहेत.)(शब्दांकन : सचिन लुंगसे)