शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ऊसदराचे सूत्र; शासनाचा आदेश अन् शेतकरी संघटनेचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2023 08:03 IST

शेतकऱ्यांचे सगळ्याच पातळीवर जास्त शोषण होते, याची जाणीव करून देणारा हा आदेश आहे.

महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीत शेतकरी संघटनांच्या चळवळीचा उदय होण्यापूर्वी ऊसदरावर आणि तो कधी द्यायचा यावरही फारसे नियमन नव्हते. केंद्र शासनाचा ऊस नियंत्रण आदेश १९६६ चा आहे. परंतु ऊसदराचे नियमन करणारा काही कायदा आहे हेच शेतकऱ्यांना फारसे माहीत नव्हते. सुरुवातीला उसाची वैधानिक किमान किंमत (एसएमपी) ऊस गाळप झाल्यापासून चौदा दिवसांत देण्याचे कायदेशीर बंधन होते. ही उसाची किमान किंमत होती आणि ती राज्यासाठी एकच असायची. सरासरी उतारा विचारात घेऊन ती दिली जाई. त्यानंतर हंगाम संपल्यावर शिल्लक साखर, कर्जे, उत्पादन खर्च याचा विचार करून बँक किती रक्कम देता येऊ शकते, असा दाखला देई. त्यानंतर दुसरा हप्ता देण्यास साखर संचालक परवानगी देत असे. त्यामुळे त्यावेळी ऊस बिलाचे किमान चार तुकडे पाडले जात. ही पद्धत २००९ ला किफायतशीर आणि वाजवी किंमत (एफआरपी) लागू झाल्यावर बंद झाली. उसाची किंमत आणि शेतकऱ्याच्या नफ्याचा त्यामध्ये अंतर्भाव झाला. 

शेतकरी ऊसपीक बारा महिने शेतात वाढवतो, त्यामुळे त्याचा मोबदला कारखान्यांनी त्यांच्या सोयीने वर्षभर द्यावा, याला संघटनांनी विरोध केला. एकरकमी बिले हातात आल्यावर शेतकऱ्याचे सोसायटीचे कर्ज फिटते. त्यामुळे त्याला पुन्हा कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. शून्य टक्के व्याज धोरणाचा लाभ होतो. शिल्लक चार पैसे राहिले तर त्यातून त्याला मुलाबाळांचे शिक्षण, घरबांधणी, मुलीचे लग्न अशा गोष्टी करता येतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऊस बिल कधी मिळणार, यासाठी कारखान्याकडे डोळे लावून बसावे लागत नाही. म्हणून एकरकमी एफआरपी, अशी मागणी संघटनांनी लावून धरली व त्यानुसार ऊस बिले देण्यास कारखानदारीला भाग पाडले. आता ही एकरकमी एफआरपी द्यायची कोणत्या सूत्राने यावरूनही बराच वाद झाला. कारण एफआरपी देण्याचा पाया हा उसाचा उतारा असतो. तो अंतिम होतो हंगाम संपल्यावर. 

महाराष्ट्रात कारखाने आहेत दोनशे आणि अंतिम उतारा निश्चित करून देणारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही एकच यंत्रणा आहे. मग त्यासाठी मधला मार्ग म्हणून मागच्या वर्षीचा उतारा व मागच्या वर्षीचा तोडणी-ओढणी खर्च गृहीत धरून एफआरपी देण्याचे सूत्र निश्चित करण्यात आले; परंतु त्यास शेतकऱ्यांकडून विरोध झाला. यंदाचा ऊस आणि मागच्या वर्षीचा उतारा असे नको, असे त्याचे म्हणणे होते. त्यावरील तोडगा म्हणून राज्य शासनाने २०२२ मध्ये एक अधिसूचना काढली आणि उसाची एफआरपी कशी द्यायची, याचे सूत्र ठरवून दिले. राज्य शासनाने २६ डिसेंबरला आदेश काढून त्याच सूत्रानुसार २०२३-२४ च्या हंगामाचे ऊसदर देण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार पुणे व नाशिक महसूल विभागातील कारखान्यांनी १०.२५ टक्के उतारा आधारभूत धरावयाचा आहे. म्हणजे त्यांची एफआरपी टनास ३१५० रुपये येते. वाढीव एका टक्क्यास ३०७ रुपये द्यायचे आहेत. या एकूण रकमेतून तोडणी-ओढणी खर्चाचे ७५० रुपये वजा करून शिल्लक रक्कम शेतकऱ्यांना पहिला हप्ता म्हणून द्यायची आहे. हंगाम संपल्यानंतर सगळा हिशेब झाल्यावर दुसरा अंतिम हप्ता द्यायचा आहे. 

छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागातील कारखान्यांसाठी ९.५० टक्के उतारा निश्चित केला आहे. शेतकऱ्यांच्या एकरकमी एफआरपी मागणीला छेद देण्यासाठी सरकारच्या आशीर्वादाने शोधलेली पळवाट म्हणजेच हा आदेश आहे. कारखाने पंधरा महिने साखर विक्री करतात आणि त्यांना शेतकऱ्यांची बिले मात्र एकरकमी द्यावी लागतात, असे कारखानदार म्हणू लागल्यावर त्यातूनच भांडण सुरू झाले. सरासरी उताऱ्यात पॉइंट दोन, चारचा फरक असतो. पैशात विचार केल्यास दहा-पंधरा रुपयेच त्यात फरक पडतो असे असताना कारखाने शेतकऱ्यांची बिले हंगाम संपेपर्यंत अडकून का ठेवतात, असे शेतकऱ्यांना वाटते. त्यामुळे राज्य शासनाने काढलेला आदेश हा साखर कारखानदारांची पाठराखण करणारा असल्याचा आक्षेप घेत त्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 

शासनाने हा आदेश लागू करण्यापूर्वीच कोल्हापूर-सांगलीतील कारखान्यांनी एफआरपीपेक्षा टनास शंभर रुपये जास्त दर दिला आहे. कारण या विभागात चळवळीचा रेटा मोठा आहे. याचा अर्थ जिथे चळवळ जिवंत आहे तिथे शेतकऱ्याला त्याच्या घामाचा चांगला भाव मिळतो. याउलट विदर्भ-मराठवाड्यात शेतकऱ्यांचे सगळ्याच पातळीवर जास्त शोषण होते, याची जाणीव करून देणारा हा आदेश आहे.

 

टॅग्स :State Governmentराज्य सरकार