शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

ऊसदराचे सूत्र; शासनाचा आदेश अन् शेतकरी संघटनेचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2023 08:03 IST

शेतकऱ्यांचे सगळ्याच पातळीवर जास्त शोषण होते, याची जाणीव करून देणारा हा आदेश आहे.

महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीत शेतकरी संघटनांच्या चळवळीचा उदय होण्यापूर्वी ऊसदरावर आणि तो कधी द्यायचा यावरही फारसे नियमन नव्हते. केंद्र शासनाचा ऊस नियंत्रण आदेश १९६६ चा आहे. परंतु ऊसदराचे नियमन करणारा काही कायदा आहे हेच शेतकऱ्यांना फारसे माहीत नव्हते. सुरुवातीला उसाची वैधानिक किमान किंमत (एसएमपी) ऊस गाळप झाल्यापासून चौदा दिवसांत देण्याचे कायदेशीर बंधन होते. ही उसाची किमान किंमत होती आणि ती राज्यासाठी एकच असायची. सरासरी उतारा विचारात घेऊन ती दिली जाई. त्यानंतर हंगाम संपल्यावर शिल्लक साखर, कर्जे, उत्पादन खर्च याचा विचार करून बँक किती रक्कम देता येऊ शकते, असा दाखला देई. त्यानंतर दुसरा हप्ता देण्यास साखर संचालक परवानगी देत असे. त्यामुळे त्यावेळी ऊस बिलाचे किमान चार तुकडे पाडले जात. ही पद्धत २००९ ला किफायतशीर आणि वाजवी किंमत (एफआरपी) लागू झाल्यावर बंद झाली. उसाची किंमत आणि शेतकऱ्याच्या नफ्याचा त्यामध्ये अंतर्भाव झाला. 

शेतकरी ऊसपीक बारा महिने शेतात वाढवतो, त्यामुळे त्याचा मोबदला कारखान्यांनी त्यांच्या सोयीने वर्षभर द्यावा, याला संघटनांनी विरोध केला. एकरकमी बिले हातात आल्यावर शेतकऱ्याचे सोसायटीचे कर्ज फिटते. त्यामुळे त्याला पुन्हा कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. शून्य टक्के व्याज धोरणाचा लाभ होतो. शिल्लक चार पैसे राहिले तर त्यातून त्याला मुलाबाळांचे शिक्षण, घरबांधणी, मुलीचे लग्न अशा गोष्टी करता येतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऊस बिल कधी मिळणार, यासाठी कारखान्याकडे डोळे लावून बसावे लागत नाही. म्हणून एकरकमी एफआरपी, अशी मागणी संघटनांनी लावून धरली व त्यानुसार ऊस बिले देण्यास कारखानदारीला भाग पाडले. आता ही एकरकमी एफआरपी द्यायची कोणत्या सूत्राने यावरूनही बराच वाद झाला. कारण एफआरपी देण्याचा पाया हा उसाचा उतारा असतो. तो अंतिम होतो हंगाम संपल्यावर. 

महाराष्ट्रात कारखाने आहेत दोनशे आणि अंतिम उतारा निश्चित करून देणारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही एकच यंत्रणा आहे. मग त्यासाठी मधला मार्ग म्हणून मागच्या वर्षीचा उतारा व मागच्या वर्षीचा तोडणी-ओढणी खर्च गृहीत धरून एफआरपी देण्याचे सूत्र निश्चित करण्यात आले; परंतु त्यास शेतकऱ्यांकडून विरोध झाला. यंदाचा ऊस आणि मागच्या वर्षीचा उतारा असे नको, असे त्याचे म्हणणे होते. त्यावरील तोडगा म्हणून राज्य शासनाने २०२२ मध्ये एक अधिसूचना काढली आणि उसाची एफआरपी कशी द्यायची, याचे सूत्र ठरवून दिले. राज्य शासनाने २६ डिसेंबरला आदेश काढून त्याच सूत्रानुसार २०२३-२४ च्या हंगामाचे ऊसदर देण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार पुणे व नाशिक महसूल विभागातील कारखान्यांनी १०.२५ टक्के उतारा आधारभूत धरावयाचा आहे. म्हणजे त्यांची एफआरपी टनास ३१५० रुपये येते. वाढीव एका टक्क्यास ३०७ रुपये द्यायचे आहेत. या एकूण रकमेतून तोडणी-ओढणी खर्चाचे ७५० रुपये वजा करून शिल्लक रक्कम शेतकऱ्यांना पहिला हप्ता म्हणून द्यायची आहे. हंगाम संपल्यानंतर सगळा हिशेब झाल्यावर दुसरा अंतिम हप्ता द्यायचा आहे. 

छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागातील कारखान्यांसाठी ९.५० टक्के उतारा निश्चित केला आहे. शेतकऱ्यांच्या एकरकमी एफआरपी मागणीला छेद देण्यासाठी सरकारच्या आशीर्वादाने शोधलेली पळवाट म्हणजेच हा आदेश आहे. कारखाने पंधरा महिने साखर विक्री करतात आणि त्यांना शेतकऱ्यांची बिले मात्र एकरकमी द्यावी लागतात, असे कारखानदार म्हणू लागल्यावर त्यातूनच भांडण सुरू झाले. सरासरी उताऱ्यात पॉइंट दोन, चारचा फरक असतो. पैशात विचार केल्यास दहा-पंधरा रुपयेच त्यात फरक पडतो असे असताना कारखाने शेतकऱ्यांची बिले हंगाम संपेपर्यंत अडकून का ठेवतात, असे शेतकऱ्यांना वाटते. त्यामुळे राज्य शासनाने काढलेला आदेश हा साखर कारखानदारांची पाठराखण करणारा असल्याचा आक्षेप घेत त्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 

शासनाने हा आदेश लागू करण्यापूर्वीच कोल्हापूर-सांगलीतील कारखान्यांनी एफआरपीपेक्षा टनास शंभर रुपये जास्त दर दिला आहे. कारण या विभागात चळवळीचा रेटा मोठा आहे. याचा अर्थ जिथे चळवळ जिवंत आहे तिथे शेतकऱ्याला त्याच्या घामाचा चांगला भाव मिळतो. याउलट विदर्भ-मराठवाड्यात शेतकऱ्यांचे सगळ्याच पातळीवर जास्त शोषण होते, याची जाणीव करून देणारा हा आदेश आहे.

 

टॅग्स :State Governmentराज्य सरकार