शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
4
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
5
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
6
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
7
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
8
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
9
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
10
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
11
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
12
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
13
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
14
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
15
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
16
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
17
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
18
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
19
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
20
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

क्षणभंगुर जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:21 IST

आपण ज्या जगात राहतो त्याचे नाव मर्त्यलोक आहे. मर्त्य हा शब्द ‘मृत्यू’ या शब्दापासून तयार झालेला आहे, ज्याचा अर्थ आहे मरणारा. शेवटी या जगात जेवढ्या काही वस्तू आहेत, त्या सजीव असोत वा निर्जीव, सर्वांचा नाश हा एक दिवस अटळ आहे. जेव्हा आपण सजीव किंवा निर्जीव पदार्थांची तुलना करतो, तेव्हा आपल्याला समजते की निर्जीव पदार्थांचे जीवन सजीव पदार्थांपेक्षा निश्चित जास्त आहे.

- डॉ. भूषण कुमार उपाध्यायआपण ज्या जगात राहतो त्याचे नाव मर्त्यलोक आहे. मर्त्य हा शब्द ‘मृत्यू’ या शब्दापासून तयार झालेला आहे, ज्याचा अर्थ आहे मरणारा. शेवटी या जगात जेवढ्या काही वस्तू आहेत, त्या सजीव असोत वा निर्जीव, सर्वांचा नाश हा एक दिवस अटळ आहे. जेव्हा आपण सजीव किंवा निर्जीव पदार्थांची तुलना करतो, तेव्हा आपल्याला समजते की निर्जीव पदार्थांचे जीवन सजीव पदार्थांपेक्षा निश्चित जास्त आहे. निर्जीव पदार्थ शेवटपर्यंत उपयोगात येतो. परंतु सजीवांमधून जीव निघून गेल्यानंतर त्याचे कलेवर पूर्णत: खराब होते किंवा ते जाळले जाते अथवा ते जमिनीमध्ये दफन केले जाते. सजीवांसाठी अन्न, पाणी व वायु आवश्यक आहे, तर हाच नियम निर्जीवांसाठी लागू नाही. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सजीव व निर्जीव दोन्ही ऊर्जेपासून तयार झालेले आहेत व या ऊर्जेचा नाश होत नाही. केवळ एका ऊर्जेचे रूपांतरण होते.भारतीय तत्त्वज्ञानात मानवी जीवनाच्या मृत्यूसंदर्भात खूपच खोलवर चर्चा झालेली आहे. मृत्यू काय आहे व त्याचे रहस्य काय? याचे फारच मोठे स्पष्टीकरण उपनिषद्, गीता तसेच इतरही ग्रंथातून पहायला मिळते. कठोपनिषदामध्ये नचिकेताची कहाणी खूपच चमत्कारिक आहे. नचिकेताच्या प्रश्नांना कंटाळून त्याच्या पित्याने त्यास यमराजास दान दिले. नचिकेता आपल्या पित्याच्या आज्ञेनुसार यमराजाकडे गेला व त्याने यमराजांना जीवन व मृत्यूच्या संदर्भात खूपच गहन प्रश्न विचारले, ज्याचे वर्णन कठोपनिषदामध्ये पाहायला मिळते.यासंबंधी केल्या गेलेल्या विचारमंथनातून असे समजते की मानवाचे जीवन क्षणभंगुर आहे. केव्हा, कुठे व कसा मानवाचा मृत्यू होईल, हे पूर्णत: अनिश्चित आहे. शेवटी मानवाने नेहमीच यासाठी तयार असायला हवे. मृत्यूमध्ये शरीरही सोडले जाते. शेवटी हे जग आणि या जगातील सर्व संपन्नता निरर्थक होते. याच करणामुळे भारतीय अध्यात्मशास्त्रात मृत्यूवर कसा विजय मिळवावा हे शिकविले जाते. निर्वाण किंवा समाधी हे या मृत्यूवरील विजयाचेच प्रतीक आहे. संतांनीही याचे वर्णन आपल्या साहित्यात खूप सुंदररीत्या केलेले आहे. संत कबीर यांचे खालील कथन याच गोष्टीचे द्योतक आहे-‘‘ जस की तस धर दिन्ही चदरिया’’

टॅग्स :newsबातम्या