शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

क्षणभंगुर जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:21 IST

आपण ज्या जगात राहतो त्याचे नाव मर्त्यलोक आहे. मर्त्य हा शब्द ‘मृत्यू’ या शब्दापासून तयार झालेला आहे, ज्याचा अर्थ आहे मरणारा. शेवटी या जगात जेवढ्या काही वस्तू आहेत, त्या सजीव असोत वा निर्जीव, सर्वांचा नाश हा एक दिवस अटळ आहे. जेव्हा आपण सजीव किंवा निर्जीव पदार्थांची तुलना करतो, तेव्हा आपल्याला समजते की निर्जीव पदार्थांचे जीवन सजीव पदार्थांपेक्षा निश्चित जास्त आहे.

- डॉ. भूषण कुमार उपाध्यायआपण ज्या जगात राहतो त्याचे नाव मर्त्यलोक आहे. मर्त्य हा शब्द ‘मृत्यू’ या शब्दापासून तयार झालेला आहे, ज्याचा अर्थ आहे मरणारा. शेवटी या जगात जेवढ्या काही वस्तू आहेत, त्या सजीव असोत वा निर्जीव, सर्वांचा नाश हा एक दिवस अटळ आहे. जेव्हा आपण सजीव किंवा निर्जीव पदार्थांची तुलना करतो, तेव्हा आपल्याला समजते की निर्जीव पदार्थांचे जीवन सजीव पदार्थांपेक्षा निश्चित जास्त आहे. निर्जीव पदार्थ शेवटपर्यंत उपयोगात येतो. परंतु सजीवांमधून जीव निघून गेल्यानंतर त्याचे कलेवर पूर्णत: खराब होते किंवा ते जाळले जाते अथवा ते जमिनीमध्ये दफन केले जाते. सजीवांसाठी अन्न, पाणी व वायु आवश्यक आहे, तर हाच नियम निर्जीवांसाठी लागू नाही. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सजीव व निर्जीव दोन्ही ऊर्जेपासून तयार झालेले आहेत व या ऊर्जेचा नाश होत नाही. केवळ एका ऊर्जेचे रूपांतरण होते.भारतीय तत्त्वज्ञानात मानवी जीवनाच्या मृत्यूसंदर्भात खूपच खोलवर चर्चा झालेली आहे. मृत्यू काय आहे व त्याचे रहस्य काय? याचे फारच मोठे स्पष्टीकरण उपनिषद्, गीता तसेच इतरही ग्रंथातून पहायला मिळते. कठोपनिषदामध्ये नचिकेताची कहाणी खूपच चमत्कारिक आहे. नचिकेताच्या प्रश्नांना कंटाळून त्याच्या पित्याने त्यास यमराजास दान दिले. नचिकेता आपल्या पित्याच्या आज्ञेनुसार यमराजाकडे गेला व त्याने यमराजांना जीवन व मृत्यूच्या संदर्भात खूपच गहन प्रश्न विचारले, ज्याचे वर्णन कठोपनिषदामध्ये पाहायला मिळते.यासंबंधी केल्या गेलेल्या विचारमंथनातून असे समजते की मानवाचे जीवन क्षणभंगुर आहे. केव्हा, कुठे व कसा मानवाचा मृत्यू होईल, हे पूर्णत: अनिश्चित आहे. शेवटी मानवाने नेहमीच यासाठी तयार असायला हवे. मृत्यूमध्ये शरीरही सोडले जाते. शेवटी हे जग आणि या जगातील सर्व संपन्नता निरर्थक होते. याच करणामुळे भारतीय अध्यात्मशास्त्रात मृत्यूवर कसा विजय मिळवावा हे शिकविले जाते. निर्वाण किंवा समाधी हे या मृत्यूवरील विजयाचेच प्रतीक आहे. संतांनीही याचे वर्णन आपल्या साहित्यात खूप सुंदररीत्या केलेले आहे. संत कबीर यांचे खालील कथन याच गोष्टीचे द्योतक आहे-‘‘ जस की तस धर दिन्ही चदरिया’’

टॅग्स :newsबातम्या