शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

एका माळेचे मणी

By admin | Updated: January 6, 2017 01:49 IST

मूलतत्त्ववादी आणि खरे तर बुरसटलेले विचार ही काही कोणा एका विशिष्ट विचारसरणीची किंवा कुणा एका व्यक्तीची मक्तेदारी नसते हेच खरे.

मूलतत्त्ववादी आणि खरे तर बुरसटलेले विचार ही काही कोणा एका विशिष्ट विचारसरणीची किंवा कुणा एका व्यक्तीची मक्तेदारी नसते हेच खरे. त्यामुळे कोणत्याही महिलेवर अतिप्रसंग झाला की, महिलांच्या आधुनिक पेहराव्यावर तुटून पडणारा जसा कुणी एखादा महंत असतो तसाच आबू आझमींसारखा आमदार असतो आणि कर्नाटक राज्याचे गृहमंत्रीपद सांभाळणारा परमेश्वरदेखील असतो. सारे एका माळेचेच मणी. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बेगळुरु शहरात आनंदोत्सव साजरा करणाऱ्या युवतीवर अतिप्रसंग झाल्याची घटना घडल्यानंतर या घटनेबाबत चिंता व्यक्त करण्याऐवजी परमेश्वर यांनी ‘अशा घटना तर होतच राहणार’ अशी अत्यंत असंवेदनशील प्रतिक्रिया व्यक्त केली तर आबू आझमी थेट महिलांच्या आणि विशेषत: युवतींच्या तोकड्या कपड्यांवर टीका करुन मोकळे झाले. तोकडे कपडे घालून रात्री-बेरात्री शहरात फिरले तर असे होणारच असे आझमी यांना वाटते. आपला मुद्दा स्पष्ट करताना त्यांनी साखर सांडली तर मुंगळे गोळा होणारच अशी उपमाही वापरली. मागे उत्तर प्रदेश राज्यातील नेताजी मुलायमसिंह यादव यांनी अशाच स्वरुपाची प्रतिक्रिया व्यक्त करताना हुल्लडबाजी करणाऱ्या टारगट मुलांची वकिली केली होती. याचा अर्थ एकच हे सारे लोक स्वत:बाबतीत किंवा त्यांच्या मुलग्यांबाबतीत नव्हे तर केवळ महिला आणि युवतींबाबत अजूनही मध्ययुगीन मानसिकतेचेच गुलाम आहेत. पण तसे तरी कसे म्हणावे? याच आबू आझमी यांच्या सूनबाई हिन्दी सिनेमात काम करतात किंवा करीत होत्या. कारण इतक्यात त्यांचे नाव फारसे कानी पडलेले नाही. तरीही सूनबाई आयेशा टाकीया यांचा गाजलेला सिनेमा म्हणजे वॉन्टेड. सलमान खान त्यांचा हिरो. श्वशुर आबू आझमी यांचे विचार लक्षात घेऊन आयेशाने खरे तर या सिनेमात पायघोळ अंगरखा आणि डोक्यावरुन घेऊन नाकापर्यंत येणारी ओढणी लेवूनच काम करायला हवे होते. पण तसे काही त्या सिनेमात नव्हते. आझमींच्या भाषेत तिचे कपडे तोकडेच होते. केवळ सिनेमासंगतच नव्हे तर तिचे कपडे कालसंगतही होते. पण जे सुनेला साजेसे ते इतर युवतींच्या दृष्टीने म्हणजे पाप असा आझमी यांचा अजब न्याय असावा. त्यामुळे आझमी आणि परमेश्वर या दोहोंना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली हे चांगलेच झाले.