शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
5
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
6
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
7
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
8
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
9
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
10
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
11
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
12
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
13
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
14
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
15
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
17
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
18
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
20
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!

फकिराची वेदना

By admin | Updated: January 17, 2017 00:32 IST

तिची ताटातूट होताना बाप म्हणून या माणसाला होणाऱ्या वेदना आपण समजून घेणार की नाही?

तिची ताटातूट होताना बाप म्हणून या माणसाला होणाऱ्या वेदना आपण समजून घेणार की नाही? कुठला बाप आपल्या मुलीला कुंटणखान्यात जाऊ देईल? ‘माझे आता वय झाले, शरीराने थकत चाललो, मी गेल्यानंतर आश्रमातील अनाथ, अपंग मुलांचे काय होईल’, शंकरबाबा सध्या अस्वस्थ असतात. परवा नागपुरातील एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या मनातील वेदना साऱ्यांसमोर मांडली, तेव्हा ‘छंद’ म्हणून समाजसेवा करणारी सुटाबुटातील माणसेसुद्धा क्षणभर बेचैन झाली. माणुसकीचा गहिवर ज्यांच्या अंत:करणात आहे, त्यांना शंकरबाबा पापळकर हे नाव अपरिचित नाही.अमरावती जिल्ह्याच्या परतवाडानजीक वझ्झर आश्रमात शंकरबाबा आपल्या अंध, अपंग, अनाथ, मतिमंद मुला-मुलींसोबत राहतात. ही मुले नालीत, रस्त्यावर, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेली. त्यांच्या संगोपनाची आणि पुनर्वसनाची तपश्चर्या हा वृद्ध कार्यकर्ता मांडून बसला आहे. ‘आपण गेल्यावर या मुलांचे काय होईल’, हा एकच प्रश्न त्यांना सध्या व्याकुळ करीत असतो. सरकार ऐकत नाही आणि ज्यांच्याजवळ गाऱ्हाणे मांडावे ती माणसे शंकरबाबांच्या आसऱ्याने सामाजिक प्रतिष्ठा मिळविण्यात गर्क. अशा वेळी त्याने करावे तरी काय? मग तो चिडतो, संतापतो. कुणाला शीघ्रकोपी वाटतो, काहींना तुसडा. त्याचे संतापपणे समजून घेण्यासाठी आपण त्याच्या मनाच्या तळाशी नाही पोहोचू शकत! परवा नागपुरातील कार्यक्रमात शंकरबाबा ज्यांच्यापुढे रडले त्या सुशिक्षितांचा उमाळा प्रसंगोत्पात होता. अशा प्रसंगात त्यांचा कंठ दाटून येतो आणि ते निर्मळ होतात. त्यांचे असे भावविवश होणे क्षणभंगूर असते. पुढे या वंचितांच्या वेदनेशी, त्यांच्या अश्रूंशी त्यांचे कुठलेच नाते उरत नाही.अनाथ, अपंग, मतिमंदांचे केवळ संगोपनच नव्हे तर त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक असल्याचे शंकरबाबा सांगतात. १८ वर्षांनंतर या अनाथांना कायद्यानुसार अनाथालयात ठेवता येत नाही. मग यातील मुले वाममार्गाला वळतात. जो कायदा १८ वर्षांखालील मुलांसाठी संवेदनशील असतो तोच त्या मुला-मुलींच्या १८ वर्षांनंतर एका दिवसात एवढा निष्ठूर का होतो? आई-वडिलांनी टाकून दिलेली लक्षावधी मुले या कायद्यामुळे अनाथाश्रमाबाहेर पडतात, ती पुढे कुठे जातात, हा प्रश्न सरकारला अस्वस्थ का करीत नाही? या अनाथांसाठी सरकारने कायद्यात सुधारणा कराव्यात एवढेच शंकरबाबांचे मागणे आहे. अनाथ, अपंगांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळू नये का, ते या देशाचे नागरिक नाहीत का, असे असंख्य प्रश्न शंकरबाबा आपल्या पुढ्यात मांडतात...आई-वडिलांनी कचरापेटीत टाकून दिलेल्या त्या मुलीचा काय दोष? सज्ञान होईपर्यंत तिला शंकरबाबा नावाचा एखादा महात्मा आई-बापाची माया देऊन मोठी करतो; पण १८ वर्षांची झाल्यानंतर कायद्यानुसार तिला आश्रमात राहता येत नाही. तिची ताटातूट होताना बाप म्हणून या माणसाला होणाऱ्या यातना आपण समजून घेणार की नाही? कुठला बाप आपल्या मुलीला कुंटणखान्यात जाऊ देईल? उद्या आपली मुलगी अशा नरकात जात असेल तर जन्मदाते म्हणून आपण तिला आनंदाने जाऊ देणार का? आश्रमातील काही मुलींचे शंकरबाबांनी लग्न लावून दिले आहे. त्यांना सासरी धाडताना बाबा खूप रडतो आणि हसतोही. ‘पुढे ती कुठे जाईल’, या प्रश्नाने एरवी धास्तावलेला शंकरबाबा आता निश्चिंत होऊन एकटाच हसत राहतो. त्याच्या रडण्याचा, हसण्याचा आपल्याला अदमासही लागत नाही... आठ वर्षांपूर्वी आश्रमातल्या एका मुलीच्या साक्षगंधाच्या दिवशी बाबांची पत्नी मरण पावली. ही दु:खद वार्ता त्यांना सकाळीच कळली होती. पण, मुलीचे साक्षगंध होईपर्यंत त्यांनी ती कुणालाच सांगितली नाही. अनाथांचा संसार उभा करण्यासाठी या फकिराने स्वत:चा संसार असा स्वत:च्या हाताने मोडून पाडला आहे. त्यामुळे या अनाथांना पोटाशी धरताना नात्यांचे कोवळे बंध कधी आड येत नाहीत. बाबांनी सुरू केलेली ही अशी तपश्चर्या आहे, ती त्यांच्या पश्चात पुढे नाही जाऊ शकत. शंकरबाबा व्याकुळ होण्यामागे हेच कारण आहे. या मुलांच्या पुनर्वसनाचा कायदा सरकारने केला तर त्यांची परवड होणार नाही. मग कुणीही अनाथ गुन्हेगार होणार नाही, अपंग भीक मागणार नाही आणि मुलगी कुंटणखान्यात जाणार नाही. या फकिराची ही वेदना म्हणूनच आपण साऱ्यांनी समजून घ्यायला हवी. - गजानन जानभोर