शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

निमित्त : शिक्षक दिन

By admin | Updated: September 4, 2014 12:51 IST

कदा शिक्षकी पेशात शिरलेला माणूस सहसा बाहेर पडत नाही. पदाच्या श्रेणी फार तर बदलतात.

- तारा भवाळकर
 
वयाच्या १९ व्या वर्षी पहिली नोकरी लागली, ती माध्यमिक शिक्षक म्हणून आणि ६0 वर्षांनंतर निवृत्ती घेतली ती प्राध्यापक-म्हणजे शिक्षक म्हणून! एकूण ४२ वर्षांचा अधिकृत मास्तरकीचा अनुभव! तरी पहिल्या नोकरीतल्या एका ज्येष्ठ सहकारी शिक्षकांचे एक वाक्य नेहमी आठवते. ‘‘लहानपणी आईला सांगत होतो, शाळेत जातो ग, तरुणपणी बायकोला सांगत होतो, शाळेत जातो ग, आणि आता सुनेला सांगतो, शाळेत जातो ग.’’ एकूण एकदा शिक्षकी पेशात शिरलेला माणूस सहसा बाहेर पडत नाही. पदाच्या श्रेणी फार तर बदलतात. माझ्यापुरतं सांगायचं तर एकूण ४२ वर्षांत एकुणात शिक्षण क्षेत्रातली अनेक स्थित्यंतरं अनुभवली; पण त्याही आधी विद्यार्थी दशेतल्या शिक्षकांची आठवण येते. तेव्हा आणि आता विद्यार्थी स्तरातला बदल प्रकर्षाने जाणवतो.
आमच्या पिढीतल्या बहुतेकांचे प्राथमिक शिक्षण नगरपालिकेच्या शाळांतूनच झाले. पहिली ते सातवी. सातवीची परीक्षा आमच्या दृष्टीने हल्लीच्या १0वी-१२वीसारखी. कारण ती व्ह.फा.ची (व्हर्नाक्युलर फायनल) परीक्षा झाली की सर्टिफिकेट मिळे. अनेकांना तेवढय़ा गुणवत्तेवर प्राथमिक शिक्षक होता येई.
तर आमच्या तेव्हाच्या ५ नं. च्या शाळेतल्या एक शिक्षिका कराचीहून आलेल्या होत्या. स्वातंत्र्योत्तर फाळणीच्या दंगलीतून जगून वाचून आलेल्यांपैकी एक! त्यांचे अनुभव आम्ही सहावीच्या वर्गात ‘आऽ’ वासून ऐकत असू, आणि घरी सांगत असू. त्या मराठी कविता छान शिकवत. वर्गात सामूहिकपणे चालीवर कविता म्हणणे सर्रास चाले. आपोआप पाठ होऊन जात. त्याच बाईंनी शिवणाच्या तासाला ‘पोलके बेतायला’ आणि शिवायला एवढे छान शिकवले होते की, त्या भांडवलावर आजतागायत शिंप्याला माझ्याकडून एक छदामही मिळाला नाही. दुसरे एक मास्तर फार कडक. पाढे पाठ करून घेताना आणि गणित शिकवताना छडी खाल्ली नाही, असा एकही मुलगा किंवा मुलगी वर्गात नव्हती. घरी तक्रार केली, तर उलट ‘चांगलं बडवून काढा आणि गणित पक्कं करून घ्या,’ असं सांगायला आई-वडील शाळेत येण्याची शक्यता जास्त.
पण हेच ‘मास्तर’ दिवाळी आली की, आकाश-कंदिलाचे सगळे सामान स्वत: आणून आमच्याकडून सुंदर आकाशदिवे करवून घेत. आज वर्गात शिक्षक रागावले म्हणून भांडायला जाणारे पालक किंवा ‘अपमान’ झाला म्हणून आत्महत्या करणार्‍या विद्यार्थ्यांच्या हकीकती ऐकल्या की शिक्षक, विद्यार्थी, पालक या नात्यात केवढा अंतराय निर्माण झाला आहे, ते जाणवते. शिक्षक रागावले, त्यांनी मारले तरी त्यांच्याविषयीचा आदर कधी कमी झाल्याचं आठवत नाही.
प्रारंभी शाळेत शिक्षक म्हणून काम करतानाचा काळ तर माझ्या दृष्टीने शिक्षकी (पुढे प्राध्यापक, रीडर इ.इ.) पेशातला तो सर्वांत आनंदाचा काळ होता. शिक्षक म्हणून समृद्धीचा अनुभव देणारा काळ होता. नंतरच्या काळात निरनिराळ्या गावांत काम करताना अनेक स्तरावरचे विद्यार्थी भेटत आले. कित्येकांच्या मनात अजून सादर आत्मभाव जाणवतो. एरव्ही माझ्या ऐन उमेदीत ६-७ वीतला एक विद्यार्थी जवळ-जवळ पन्नास वर्षांनी अमेरिकेतून थेट फोन करून मी त्याला ‘ब्लॉग’वर सापडल्याचा आनंद व्यक्त करतो, याचा अर्थ कसा लावायचा? अशा वेळी खरे तर विद्यार्थ्यांपेक्षा मला आनंद होतो. शिक्षकी पेशात आमच्यावेळी वेतन कमी होते, पण या आनंदाने शिक्षक  झाल्याचा पश्‍चात्ताप कधीच वाटत नाही. उलट सतत ‘तरुण’ वाटते.
सुदैवाने प्राथमिक शाळेत जसे कडक शिस्तीचे, प्रेमळ शिक्षक भेटले, तसेच माध्यमिक शाळेतही भेटले. एरव्ही पाठय़पुस्तकही विकत घेऊ न शकणार्‍या माझ्यासारख्या मुलीला शालान्त परीक्षाही देणे शक्य नव्हते. अनेक नावे सांगता येतील; पण प्रकर्षाने आठवणारे एक नाव- कल्याणच्या शाळेतले  वि. रा. परांजपे (ठाण्याचे पुढे शिवसेनेचे नेते झालेले प्रकाश परांजपेंचे वडील.) त्यांच्यामुळे माझ्या मालकीचे पहिले पुस्तक मी विकत घेऊ शकले. ८ वीनंतर थांबणारे शिक्षण पूर्ण करू शकले. मुख्य म्हणजे त्यांनी प्रथम रंगमंचाची नशा अनुभवण्याची संधी दिली, ती अजून आहे.
नंतरही महाविद्यालयात नियमित विद्यार्थी म्हणून जाता आले नाही. नोकरी करीत बहि:स्थ पद्धतीने परीक्षा दिल्या, पण तेव्हाही नाशिकच्या हं. प्रा. ठाकरसी महाविद्यालयातील नामवंत प्राध्यापक प्रा. वि. बा. आंबेकर, डॉ. सोहोनी, प्रा. मामा पाटणकर (वि. भा. पाटणकरांचे वडील), डॉ. बाळासो दातार (पुढे पीएच.डी.चे मार्गदर्शकही) नंतर पुणे विद्यापीठात प्रा. भालचंद्र फडके असे अनेक जण माझे शैक्षणिक पालकत्व स्वीकारीत गेले.
या सगळ्या वाटचालीत ग्रंथ, पुस्तके आणि विविध वाचनालये यांचा फार मोठा वाटा आहे. उपजत वाचनप्रेमाला दिशा देणारेही निरनिराळ्या टप्प्यांवर भेटत गेले. प्रा. नरहर कुरुंदकर, डॉ. रा. चिं. ढेरे, य. दि. फडके, कमल देसाई, छाया दातार अशी कितीतरी नावे.. शिक्षक- मार्गदर्शक म्हणून हे सगळे आदर्श मिळत गेल्याने एक शिक्षक म्हणून विविध स्तरांवर विद्यार्थ्यांशी कसे वागावे, याचा एक वस्तुपाठ मिळत गेला. प्रत्येक टप्प्यावर आपले विद्यार्थीपणही सतत साथीला असल्याखेरीज शिक्षकही होता येत नाही, हे उमगत गेले.
या सगळ्या पार्श्‍वभूमीवर परवाच सध्याच्या शिक्षण व्यवस्थेतील काही ‘पीडित’ शिक्षक (प्राध्यापकही), विद्यार्थी, पालक यांचे अनुभव ऐकून आपण ४२ वर्षे ज्या क्षेत्रात व्यतीत केली, तेच का ‘पवित्र वगैरे’ शिक्षण क्षेत्र! हा प्रश्न कुरतडतो आहे.