शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण

By admin | Updated: February 28, 2017 00:00 IST

पर्यावरण हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे.

पर्यावरण हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मानवाच्या जीवनाची सुरक्षा व समृद्धी दोन्हीसाठी पर्यावरणाची आवश्यकता आहे. पर्यावरण वैज्ञानिकाच्या म्हणण्यानुसार पर्यावरण संकटात असल्याने पूर्ण मानव जगताचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ग्लोबल वार्मिंग किंवा विश्वात वाढलेली उष्णता यासाठी जबाबदार आहे. भारतीय शास्त्रात पर्यावरणाचे महत्त्व विस्तृतपणे सांगितलेले आहे. जंगल, वृक्ष तसेच प्राणी मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. भारतीय तत्त्वज्ञानात पंचमहाभूतांची चर्चा आलेली आहे. ही पंचमहाभूते म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नि, वायू व आकाश. ही पंचमहाभूते या विश्वाचा आधार आहे. पृथ्वीने विश्वाला सांभाळलेले आहे. त्याची शुद्धता मानवी जीवनाच्या संरक्षणासाठी अनिवार्य आहे. याच मातीतून अन्न तयार होते, ज्यामुळे मानव जिवंत राहतो. याच मातीपासून रोपटे व झाडे तयार झालेली आहेत. त्यामुळेच पृथ्वीला माता संबोधलेले आहे. याचप्रमाणे पाणी जीवनाचा आधार आहे. त्याची शुद्धता आरोग्य व समृद्धीसाठी आवश्यक आहे. अग्नि असे महाभूत आहे, जे अन्नाला पचवून खाण्यालायक बनवते व हीच अग्नि सूक्ष्म रूपात ऊर्जेच्या सर्व स्रोतामध्ये असते. वायू सर्व प्राणिमात्रास जिवंत ठेवतो. आकाश सूक्ष्मतम महाभूत आहे, ज्यात संपूर्ण ब्रह्मांड सामावलेले आहे. या पंचमहाभूतांची प्रार्थना यासाठी केली जाते की, प्रत्येक मानवाला त्याचे महत्त्व कळायला हवे व तो त्यांच्या महत्त्वाप्रति जागरूक असला पाहिजे. वैदिक साहित्यामध्ये शांतिमंत्रात आकाश, अंतरिक्ष, पृथ्वी, जल, औषधी, वनस्पती इ. सर्वांच्या शांतीची प्रार्थना केलेली आहे.‘सर्व: शान्ति: शान्तिरेव शान्ति:सा मा शान्तिरेघि।’या व्यतिरिक्त भारतीय संस्कृतीने पर्यावरणाला जे महत्त्व दिले आहे, ते अनेक ठिकाणी उघड होत असते. भारतीय लोक वृक्षांना पूज्य मानतात. पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते व त्याला पवित्र मानले जाते. गंगा, सिंधू, गोदावरी इ. नद्यांना माता म्हटले गेले आहे. पूर्ण संस्कृत तसेच प्राचीन भारतीय साहित्य निसर्ग प्रेमाने भरलेला आहे. आद्यकवी वाल्मीकीचे रामायण तर वनातच लिहिले गेले. कवी कालिदास यांनी रचलेले जगप्रसिद्ध नाटक अभिज्ञानशाकुन्तलम्ची नायिका तर निसर्ग-कन्या म्हणून प्रसिद्ध आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात -‘‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’’अर्थात, पृथ्वीच्या संरक्षणासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने अनेक कायदे बनविलेले आहेत. परंतु प्रत्येक व्यक्ती या बाबतीत जागरूक झाली तरच पर्यावरणाचे रक्षण होऊ शकते.-डॉ. भूषणकुमार उपाध्याय