शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय: बिहारचे रणकंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 02:56 IST

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेने सामाजिक विलगीकरण पाळावे यासाठी देशव्यापी प्रसार, प्रचार सुरू असताना बिहार विधानसभेची निवडणूक घेण्याची खरंच गरज होती का? असा सवाल उपस्थित करता येतो.

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक बिहार विधानसभेची येत्या आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. ही निवडणूक एका विचित्र परिस्थितीत होणार आहे; शिवाय बिहार राज्यातील आघाड्यांच्या राजकारणातील प्रचंड उलथापालथ झाल्याच्या पार्श्वभूमीवरदेखील होणार आहे आणि गेली तीन दशके या राज्याच्या राजकारणाच्या केंद्रबिंदूस्थानी असलेले, प्रभावी राजकीय नेते लालूप्रसाद यादव यांच्या गैरहजेरीत होणार आहे. वास्तविक, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेने सामाजिक विलगीकरण पाळावे यासाठी देशव्यापी प्रसार, प्रचार सुरू असताना विधानसभेची निवडणूक घेण्याची खरंच गरज होती का? असा सवाल उपस्थित करता येतो.

बिहारच्या विद्यमान विधान सभागृहाची मुदत येत्या २९ नोव्हेंबरला समाप्त होणार आहे. वास्तविक एखाद्या राज्यात सभागृहाची मुदत संपली असेल किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत सिद्ध करता येत नसेल तर सहा महिन्यांसाठी राष्टÑपती राजवट किमान सलग दोनवेळा लागू करता येते किंवा याच सभागृहास एक वर्षाची मुदतवाढही देता येते. महाराष्ट्र विधानसभेच्या १९७२ मध्ये स्थापन झालेल्या तिसऱ्या सभागृहास एक वर्षाची मुदतवाढ देऊन सहाव्या वर्षी (१९७८) निवडणुका घेतल्या होत्या. या दोन्हींपैकी एक प्रकार स्वीकारून कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराचा धोका स्वीकारायला नको होता. २४३ सदस्य निवडण्यासाठी २८ आॅक्टोबरपासून तीन टप्प्यांत या निवडणुका होणार आहेत. कोरोनाशिवाय महापुराने बिहारच्या ग्रामीण भागाचे अतोनात नुकसान झाले आहे. परराज्यांत बेरोजगार झालेला श्रमिक वर्ग गावात येऊन बसला आहे. त्याला नवा रोजगार मिळत नाही. अशा तिहेरी संकटात सापडलेल्या बिहारमध्ये निवडणुका घेण्याची गरज होती का? लोकशाहीमध्ये मतदारांनी स्वत:चे सरकार निवडण्याचा हक्क बजावला पाहिजे; पण कोरोनाचा धोका वाढणार नाही का? निवडणूक आयोगाने प्रचार करताना राजकीय पक्षांनी सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे, उमेदवारांनी घरोघरी प्रचार करताना पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, अर्ज दाखल करण्यासाठी दोघांनाच सोबत ठेवावे, असे बंधन उमेदवारांवर घालणार, असे जाहीर केले आहे.

आश्चर्य याचे वाटते की, प्रत्येक मतदान केंद्रांवर सॅनिटायझर, हातमोजे, मास्क, फेसकव्हर, आदींचा पुरवठा करणार, असेही आयोगाने तारखा जाहीर करताना सांगून टाकले आहे, शिवाय कोरोनाबाधित रुग्णांनी मतदानास शेवटच्या एका तासातच मतदान केंद्रांवर यावे, असेही आवाहन केले आहे. प्रत्येकास इव्हीएमच्या मशीनचे बटण दाबताना स्वतंत्र हातमोजे देणार, असेही म्हटले आहे. बिहार विधानसभेसाठी ७ कोटी २१ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २०१५च्या निवडणुकीत ६ कोटी ६८ लाखांपैकी ५६.९१ टक्के म्हणजे ३ कोटी १६ लाख ७३ हजार ५९४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. इतक्या प्रचंड संख्येच्या मतदारांना कोरोनापासून संरक्षण देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची पडणार आहेत. विधानसभेच्या निवडणुकांचा खर्च राज्याच्या तिजोरीतूनच करायचा असतो. बिहारसारखा आर्थिकदृष्ट्या मागास राज्याला हा भुर्दंड कशासाठी हवा होता? देशात रेल्वे सुरू नाही, कारण गर्दी नको. हॉटेल्स, बार, चित्रपटगृहे नकोत; कारण गर्दी होणार आहे. नरेंद्र मोदी, नितीशकुमार, तेज यादव, राहुल गांधी आदींच्या सभांना उपस्थित राहणारा हजारोंचा जमाव सामाजिक अंतर ठेवून कसा जमणार आहे, हे कोडेच आहे.

जाहीर सभांना किती लोकांना उपस्थित राहू द्यायचे हे त्या-त्या जिल्ह्यांचे दंडाधिकारी निश्चित करणार, असा अजब उपाय निवडणूक आयोगाने शोधला आहे, अशा या निवडणुका मुख्यत: संयुक्त जनता दल-भाजप आघाडीविरुद्ध राष्ट्रीय जनता दल व काँग्रेस आघाडीतच होणार आहे. मागील निवडणुकीत संयुक्त जनता दलाची आघाडी काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाबरोबर होती. भाजपचा सपशेल पराभव केला होता; पण वीसच महिन्यांत महागठबंधन ही आघाडी फुटली आणि नितीशकुमार भाजपच्या मदतीने सत्तेवर कायम राहिले. आता आघाड्यांचा आकार कसा वळण घेतो आणि राजकारण कसे वेग घेते हे पाहणे महत्त्वाचे असेल.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020