शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

अग्रलेख : थोडे भान राहू द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 09:57 IST

मायबाप सरकार, “या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?” असा सवाल करणारे विरोधक आणि नोकरशहाचा गाडा चालविणारे प्रशासन असे तिघेही नागपुरात विधिमंडळ अधिवेशनासाठी दाखल झाले आहेत.

मायबाप सरकार, “या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?” असा सवाल करणारे विरोधक आणि नोकरशहाचा गाडा चालविणारे प्रशासन असे तिघेही नागपुरात विधिमंडळ अधिवेशनासाठी दाखल झाले आहेत. विदर्भभूमीत सर्वांचे मनापासून स्वागत! एकमेकांवर टीका करताना, आरोपांची राळ उठवताना पातळी सोडणाऱ्या नेत्यांची हल्ली भलतीच भाऊगर्दी आज झाली आहे. लोकांना नेमके काय हवे, याचे भान उरलेले नाही. जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींची, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षेची अन् जगाला सर्वांत मोठी संघटना देणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही भूमी!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अन् संत गाडगेबाबा या कृतिशील महनीयांचीही ही भूमी आहे. या भूमीने जगाला विचार दिला, विखार नाही. इथे संघ आणि डॉ. बाबासाहेबांचा विचारही तितकाच प्रभावीपणे रूजलेला आहे. एकमेकांच्या वैचारिकतेचा कमालीचा आदर करणारी ही भूमी आहे. या वैचारिक प्रगल्भतेची बूज राखणारे वर्तन इथे आलेले सत्ताधारी आणि विरोधकांनी ठेवावे, ही अपेक्षा आहे. “अधिवेशन संपताना जनहिताचे निर्णय झालेले आपल्याला नक्कीच दिसतील”, अशी खात्री दोघेही देतील का, याबाबत शंकाच वाटते. कारण, सध्याचे महाराष्ट्राचे राजकारण नासलेले आहे. पक्षीय भेदांपलिकडे जाऊन जनकल्याणाच्या विषयांना प्राधान्य द्यायला हवे, याचे भान सुटलेले आहे.

सकाळपासून एकमेकांवर आरोपांची राळ उठवायची, शिवराळ भाषा वापरायची, एकमेकांना धमक्या द्यायच्या, असे समजूतदारपणाची ऐशीतैशी करणारे सध्याचे गढूळ वातावरण सध्या महाराष्ट्रात आहे. अंधाराला प्रकाशाचा भाव आला आहे. लोक या वितंडवादाला कंटाळले आहेत. ज्या महापुरुषांच्या नावे दोन्ही बाजूंनी राजकारण चालले आहे, त्या महापुरुषांना नेतृत्त्वाच्या पुढच्या पिढ्यांकडून काय अपेक्षा होती, याचे चिंतन करण्यासाठी नेत्यांनी काही तास काढले तर निकोपतेची पेरणी होईल. नागपूरचे विधिमंडळ अधिवेशन ही दोघांसाठीही एक मोठी संधी आहे. राजकारण राजकारणाच्या जागी आहे. पण, हिवाळी अधिवेशनात जनसामान्यांच्या प्रश्नांची तड लागेल, अतिवृष्टीग्रस्त, आत्महत्याग्रस्त बळीराजास न्याय मिळेल, बेरोजगारी, उद्योग, विविध समाजांची उन्नती यासाठी ठोस निर्णय घेतले जातील, अशी  ग्वाही सत्ताधारी देतील आणि हे सगळे व्हावे, यासाठी विरोधक सत्ताधाऱ्यांना भाग पाडतील, अशी किमान अपेक्षा तरी बाळगावी काय? अनुशेषापासूनचे अनेक गंभीर प्रश्न आजही तसेच आवासून उभे आहेत. समृद्धी महामार्ग झाला. यासाठी अभिनंदनच, पण हा महामार्ग ज्या जिल्ह्यांतून जातो तेथील समृद्धीचे काय करणार हे सांगण्याचे आणि विचारण्याचे संवादपीठ म्हणून विधिमंडळाचा उपयोग होणे अपेक्षित आहे. समृद्धीच्या मार्गावरून मोठे उद्योग विदर्भात चालून यायला हवेत. ते बाहेर जाता कामा नयेत.

वेगवान वाहनांची अतिवेगवान ये-जा करत अत्यंत अल्पावधीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचविणारा मार्ग एवढाच ‘समृद्धी’चा मर्यादित अर्थ अपेक्षित नाही. विकासाची चाकेही तेवढ्याच गतीने धावायला हवीत. हे अधिवेशन त्यासाठीचे आशादायी चित्र उभे करणारे ठरावे. विदर्भ, मराठवाड्याबाबत ज्यांनी ज्यांनी आजवर आकस ठेवला वा दुर्लक्ष केले, त्या सगळ्यांनीच केवळ या दोन भागांचेच नव्हे, तर महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान केले आहे. मागास भागांचा विकास म्हणजे राज्याचा समतोल विकास हा विचार बाळगून त्याला कृतीची जोड न दिल्याने अन्यायाची यादी लांबतच गेलेली आहे. त्यातूनच मग विदर्भ राज्याच्या मागणीला सुरुवात झाली. आजही सातत्याने तिचे पडसाद उमटत असतात.  

राजधानीचा दर्जा सोडून विदर्भाने महाराष्ट्रात सहभागी होण्याचे मोठे मन दाखविले. पण, विदर्भाच्या विकासाकडे पाहताना महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांनी नेहमीच कद्रू वृत्ती ठेवली, हे वैदर्भीय जनतेचे मोठे शल्य आहे. हे शल्य कोणत्याही आकसातून नव्हे, तर कटू अनुभवांमधून आलेले आहे. प्रगतीचा सूर्य उगवण्याची वाट पाहत वर्षानुवर्षे सरली. प्राक्तन काही बदलले नाही. आता तीन वर्षांनंतर सरकार नागपुरात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नागपूरकर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासक जोडगोळीचे नेतृत्व आज आहे. विरोधकही दमदार आहेत. दोघांनी मिळून मागास भागांच्या पदारात भरभरून टाकावे. मिहान, समृद्धी, मेट्रोतून सुरू झालेला विकास सर्वदूर पोहोचावा आणि त्यासाठी आश्वासक सुरुवात विधिमंडळाच्या अधिवेशनाने व्हावी.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र