शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

अखेर कान उपटले

By admin | Updated: December 8, 2015 01:40 IST

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी जलमय झालेल्या चेन्नई शहराची गेल्या सप्ताहात जी हवाई पाहाणी केली त्या पाहाणीची छायाचित्रे माध्यमांकडे पाठविताना केन्द्र सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाने

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी जलमय झालेल्या चेन्नई शहराची गेल्या सप्ताहात जी हवाई पाहाणी केली त्या पाहाणीची छायाचित्रे माध्यमांकडे पाठविताना केन्द्र सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) जी करामत केली, ती संबंधितांच्या चांगलीच अंगलट आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने त्याबाबत माहिती मंत्रालयातील संबंधितांचा लेखी जबाबच मागितला आहे. प्रस्तुत छायाचित्रात विमानाच्या खिडकीमधून चेन्नईची पाहाणी करतानाचे पंतप्रधान मोदी आणि खिडकीबाहेर अगदी स्वच्छ प्रकाशात जलमय झालेले चेन्नई (किंवा आणखी भलतेच कोणते तरी) शहरही दिसत होते. त्या चित्राकडे पाहाताक्षणी त्यात काहीतरी करामत आहे आणि दोन वेगळी चित्रे परस्परात गुंफून नवे चित्र तयार केले गेले आहे, हे कोणालाही जाणवत होते. ट्विटरवर टाकलेल्या या चित्रावर लगेचच चर्चा सुरु झाली आणि पीआयबीने तत्काळ ते चित्र मागे घेऊन क्षमायाचनाही केली. काहीच वेळात दुसरे आणि खरे छायाचित्र जारी केले गेले व त्यात खिडकीबाहेरचे काहीही दिसत नव्हते. परंतु देशात आणि परदेशातही आधीचे चित्र तोपर्यंत पोहोचलेले असल्याने आणि त्यावर टीकाटिपणीदेखील सुरु झाली असल्याने पीआबीची ही करामत कुठेतरी पंतप्रधानांनाच कमीपणा आणणारी ठरली. साहजिकच माहिती मंत्रालयातील सर्व विभाग प्रमुखांची लगेचच बैठक घेतली गेली. यापुढे माध्यमांकडे कोणतीही छायाचित्रे पाठविताना छायाचित्रकाराने जे कॅमेरात बंद केले असेल ते तसेच पाठवावे, त्यात करामती करु नयेत असे आदेश पंतप्रधान कार्यालयाने जारी केले असून ते सर्व संबंधितांपर्यंत पोचते झाले आहेत. परंतु यातील खरी मौज पुढेच आहे. सरकारी छायाचित्रकाराने त्याचे काम केले की मग पीआयबीचे अधिकारी त्यांच्यावर काम करतात आणि दोन किंवा अधिक वेगळ्या चित्रांचा मिलाफ घडवून आणून नवे चित्र तयार केले जाते व गेल्या कित्येक वर्षांचा हाच प्रघात असल्याचे पीआयबीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. विशेषत: पूर किंवा तत्सम नैसर्गिक आपत्तीच्या परिणामांची हवाई पाहाणी करण्याचा जसा प्रघात आहे तसाच अशा पाहाणीनंतर दोन वेगळ्या चित्रांच्या संयोगाने नवे चित्र तयार करुन तेच माध्यमांंकडे पाठविण्याचाही प्रघात आहे व डॉ.मनमोहनसिंग यांच्या काळातही तसेच केले जात होते असेही पीआयबीचे म्हणणे आहे.