शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

अखेर कान उपटले

By admin | Updated: December 8, 2015 01:40 IST

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी जलमय झालेल्या चेन्नई शहराची गेल्या सप्ताहात जी हवाई पाहाणी केली त्या पाहाणीची छायाचित्रे माध्यमांकडे पाठविताना केन्द्र सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाने

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी जलमय झालेल्या चेन्नई शहराची गेल्या सप्ताहात जी हवाई पाहाणी केली त्या पाहाणीची छायाचित्रे माध्यमांकडे पाठविताना केन्द्र सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) जी करामत केली, ती संबंधितांच्या चांगलीच अंगलट आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने त्याबाबत माहिती मंत्रालयातील संबंधितांचा लेखी जबाबच मागितला आहे. प्रस्तुत छायाचित्रात विमानाच्या खिडकीमधून चेन्नईची पाहाणी करतानाचे पंतप्रधान मोदी आणि खिडकीबाहेर अगदी स्वच्छ प्रकाशात जलमय झालेले चेन्नई (किंवा आणखी भलतेच कोणते तरी) शहरही दिसत होते. त्या चित्राकडे पाहाताक्षणी त्यात काहीतरी करामत आहे आणि दोन वेगळी चित्रे परस्परात गुंफून नवे चित्र तयार केले गेले आहे, हे कोणालाही जाणवत होते. ट्विटरवर टाकलेल्या या चित्रावर लगेचच चर्चा सुरु झाली आणि पीआयबीने तत्काळ ते चित्र मागे घेऊन क्षमायाचनाही केली. काहीच वेळात दुसरे आणि खरे छायाचित्र जारी केले गेले व त्यात खिडकीबाहेरचे काहीही दिसत नव्हते. परंतु देशात आणि परदेशातही आधीचे चित्र तोपर्यंत पोहोचलेले असल्याने आणि त्यावर टीकाटिपणीदेखील सुरु झाली असल्याने पीआबीची ही करामत कुठेतरी पंतप्रधानांनाच कमीपणा आणणारी ठरली. साहजिकच माहिती मंत्रालयातील सर्व विभाग प्रमुखांची लगेचच बैठक घेतली गेली. यापुढे माध्यमांकडे कोणतीही छायाचित्रे पाठविताना छायाचित्रकाराने जे कॅमेरात बंद केले असेल ते तसेच पाठवावे, त्यात करामती करु नयेत असे आदेश पंतप्रधान कार्यालयाने जारी केले असून ते सर्व संबंधितांपर्यंत पोचते झाले आहेत. परंतु यातील खरी मौज पुढेच आहे. सरकारी छायाचित्रकाराने त्याचे काम केले की मग पीआयबीचे अधिकारी त्यांच्यावर काम करतात आणि दोन किंवा अधिक वेगळ्या चित्रांचा मिलाफ घडवून आणून नवे चित्र तयार केले जाते व गेल्या कित्येक वर्षांचा हाच प्रघात असल्याचे पीआयबीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. विशेषत: पूर किंवा तत्सम नैसर्गिक आपत्तीच्या परिणामांची हवाई पाहाणी करण्याचा जसा प्रघात आहे तसाच अशा पाहाणीनंतर दोन वेगळ्या चित्रांच्या संयोगाने नवे चित्र तयार करुन तेच माध्यमांंकडे पाठविण्याचाही प्रघात आहे व डॉ.मनमोहनसिंग यांच्या काळातही तसेच केले जात होते असेही पीआयबीचे म्हणणे आहे.