शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नरंजनाचे पॅकेज

By admin | Updated: March 27, 2015 23:26 IST

निसर्गाच्या व्याकरणात व सत्ताधाऱ्यांच्या समीकरणात दुष्काळाचा ‘काळ’ नेमका कोणता, ते समजून घेण्याची हीच वेळ आहे. चार महिन्यांपासून रखडलेले केंद्राचे दोन हजार कोटींचे दुष्काळी पॅकेज जाहीर झाले

निसर्गाच्या व्याकरणात व सत्ताधाऱ्यांच्या समीकरणात दुष्काळाचा ‘काळ’ नेमका कोणता, ते समजून घेण्याची हीच वेळ आहे. चार महिन्यांपासून रखडलेले केंद्राचे दोन हजार कोटींचे दुष्काळी पॅकेज जाहीर झाले आणि आजवरच्या मदतीपेक्षा चार पट अधिक अशी ‘ऐतिहासिक तुलना’ करत भक्कम कामगिरी केल्याचा तोरा केंद्राने मिरवला. भाजपा-शिवसेनेच्या खासदारांसह, मुख्यमंत्री- महसूलमंत्र्यांनी गृहमंत्री-पंतप्रधानापर्यंत साऱ्यांच्या भेटी घेतल्यावर ही मदत पदरी पडली. डिसेंबर २००५ ते मार्च २०१४ पर्यंत १७ हजार कोटी रुपये राज्य व केंद्राने खर्ची घातले. तर राज्य व केंद्राने नव्याने नऊ हजार कोटींचे नियोजन केले. पण समस्या कायम आहे! हा देश शेतकऱ्यांचा आहे, कृषिप्रधान आहे यावर विश्वासच बसत नाही. शेतीतून रोजगार वाढविण्याची क्षमता कमी आहे, असे मानून देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांकडे सरळसरळ दुर्लक्ष केले जाते. डोळे गरगरविणाऱ्या १७ लाख कोटींच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून अडीच लाख कोटी शेतीसाठी ठेवले आहेत, त्यातील दोन हजार कोटींचे दुष्काळी पॅकेज केंद्राने राज्याला दिले. ‘ऐतिहासिक तुलना’ करताना प्रत्यक्षात समुद्रातून एक थेंब वाट्याला यावा अशीच ही केंद्रीय मदत आहे. याउलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात हजार कोटींची मदत जाहीर करून केलेले नियोजन केंद्राच्या या ‘ऐतिहासिक’ मदतीपेक्षा नक्कीच सरस आहे. मुळात, पॅकेज हा कायमस्वरूपी उपाय कधीच होऊ शकत नाही. संपूर्ण कर्ज व व्याज माफी (यूपीए सरकारच्या ७२ हजार कोटींच्या कर्जमाफीत राज्याच्या वाट्याला दहा हजार कोटी आले. ते घोळ अजून संपलेले नाहीत.), वीजबिल माफी हाही यावरील उपाय नाही. पण दुष्काळामुळे त्या-त्या भागातील अर्थव्यवस्था कोलमडत असली तरी दुष्काळाभोवती फिरणारे अर्थचक्र ‘दुष्टचक्रालाही’ लाजवणारे आहे. गोखले इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सेस, डॉ. स्वामीनाथन, डॉ. नरेंद्र जाधव, टाटा इन्स्टिट्यूट यांनी सुचविलेल्या अनेक उपायांपैकी काही लागूही पडले. पण जखम सुकली नाही. दरवेळी १९७२ च्या भयाणतेची तुलना होते, कथा ऐकविल्या जातात. पॅकेज मागितले जाते. जलव्यवस्थापनाचे अनेक अहवाल आहेत पण दुष्काळाच्या मगरमिठीतून राज्याची सुटका होत नाही. शेजारील आंध्रात १४० व मध्य प्रदेशात १५९ तालुक्यात दुष्काळ पडायचा. आंध्राने कृषी व जलव्यवस्थापन, पाण्याचा पुनर्वापर, पाण्याचे होणारे क्षारीकरण यासाठी इस्त्रायलची मदत घेतली. मध्य प्रदेशने शेततळे, लघुबंधारे अशा छोट्या-छोट्या उपचारांद्वारे सिंचनाखालील क्षेत्रात मोठी वाढ केली आहे. महाराष्ट्रात ‘दहा वर्षांत पैसे आले व ते जिरले’ दहा वर्षांतील केंद्रीय व राज्याच्या कृषिमंत्र्यांची दुष्काळ, अवकाळी आपत्तीतील विधाने मोठी भन्नाट आहेत. ‘दीर्घकालीन उपाय शोधण्याचे प्रयत्न होत असून, राज्य व केंद्र सरकारच्या समन्वयातून शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल’, असे ठोकून दिले आहे. झळ बसलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना याचा कधीच जाब विचारलेला नाही. २०१२मध्ये उत्तर भारतातील बुंदेलखंड भागातील दुष्काळ कायमचा संपविण्यासाठी केंद्राने तीन हजार कोटींचे पॅकेज दिले होते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रालाही पॅकेज मिळवू, असे शरद पवार म्हणाले होते. कुठे गेले ते पॅकेज? खरे तर, दुष्काळ असा झटक्यात संपविणे शक्य नाही, मदतीच्या पॅकेजसाठी सावकारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या या विषयांचेही ‘पॅकेज’केले जाते. सिंचनाच्या सोयी व शेतीच्या बांधावर पाणी पोहोचणे गरजेचे आहे. दुष्काळाचा केंद्रबिंदू फक्त शेतकरी नसून, त्या भागातील संपूर्ण अर्थव्यवस्थाच दुष्काळाची बळी असते. राज्यातील २२८ तालुक्यांत (१९ हजारांवर गावे) अपुरा पाऊस होतो, तेथील पाणीसमस्या सुटलेली नाही. जिथे सरासरीपेक्षा अधिक पाऊस होतो, तिथे जिरवला, साठवला गेलेला नाही. देशातील लहान-मोठ्या धरणांपैकी सर्वाधिक धरणे महाराष्ट्रात आहेत. परंतु, पाणी वाटपातील संघर्ष रोज वाढतोच आहे. अधिकाधिक पाणीसाठे निर्माण करणे, त्याचे समन्यायी पद्धतीने वाटप व पाणी वापराची कार्यक्षमता सुधारणे आदि उपाययोजना कधी होतील. राज्यातील सिंचनाचे प्रमाण १८ टक्क्यांपेक्षा अधिक नाही, हजारो कोटी ओतून आताचे प्रकल्प पूर्ण झाले तरी, सिंचनाचे प्रमाण ३४ टक्क्यांपेक्षा अधिक नसेल. तर मग राज्याच्या अन्य भागाचे काय, हा प्रश्न मोठा विचित्र आहे, ना?- रघुनाथ पांडे