शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कायदेशीर काही करायचे की नाही?

By admin | Updated: March 28, 2016 03:37 IST

बेकायदेशिर बांधकामांना परवानगी दिल्याने राजकारणी खुष झाले आहेत, भू माफिया आनंदी आहेत, पण मग कायदेशिर काही करायचे की नाही?

- अतुल कुलकर्णीबेकायदेशिर बांधकामांना परवानगी दिल्याने राजकारणी खुष झाले आहेत, भू माफिया आनंदी आहेत, पण मग कायदेशिर काही करायचे की नाही?सरकारने सतत कल्याणकारी निर्णय घेतले पाहिजेत याचा अर्थ केवळ काहींचे कल्याण असा होत नाही; मात्र राजकीय दबाव काम करु लागले की ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ होते आणि चुकीच्या, बेकायदेशीर गोष्टींना कायद्याचे कवच चढवले गेल्यास राजकीय विजय मिळविल्याची बक्षिसी मिळतेदेखील पण या अशा बक्षिसीपोटी काय काय गमवावे लागते याची यादी केली तर ती कितीतरी भयावह ठरते. असेच काहीसे राज्यातल्या अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत झाले आहे. वाढीव एफएसआय किंवा टीडीआर आकारुन, दंड लावून बांधकामे नियमित करण्याला आक्षेप असण्याचे कारण नाही; मात्र सरसकट बेकायदेशीर बांधकामे अधिकृत होऊ लागली तर कायद्याचे राज्य ही संकल्पनाच शिल्लक राहणार नाही. एमआरटीपी कायदा केला कशासाठी? कोणत्याही भागातले नियोजन करताना त्या ठिकाणी किती घरे होतील, ती जागा किती लोकसंख्येचा भार सहन करू शकेल? तेथे ड्रेनेजलाइन, पिण्याच्या पाण्याची लाइन, रस्ते, कचरा कुंड्या अशा सगळ्यांचे नियोजन करून त्या त्या भागातल्या बांधकामांना परवानग्या दिल्या जाव्यात, असे कायदाही सांगतो. कायद्यापेक्षाही त्या त्या भागाचे नियोजन करताना राज्यकर्त्यांनी ही भूमिका ठेवूनच वागणे अपेक्षित असते; मात्र ज्या पद्धतीने शासकीय जागेवर झालेली अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे निर्णय घेतले गेले आहेत त्यामुळे भविष्यात फार मोठे प्रश्न या राज्यापुढे उभे राहतील. राजकीय स्वार्थापोटी आधीच्या राज्यकर्त्यांनी एसआरए योजना आणली. त्यावेळी मुंबईत ८ लाख झोपड्या असल्याचे सांगितले गेले. नंतर मोजणीतून त्या १० लाख असल्याचे समजले. आज त्यांची संख्या १५ लाखांच्या घरात गेलीय. गेल्या २० वर्षांत फक्त दोन लाख घरे बांधून झाली. या गतीने ही योजना पुढे कशी जाणार? मात्र याचा विचार कोणाच्या मनात नाही. पिंपरी-चिंचवड असो की मीरा भार्इंदर असो, ही सगळी शहरे स्फोटाच्या उंबरठ्यावर उभी आहेत. कोठे आग लागली तर साधी पाण्याचा बंब घेऊन जाणारी गाडीदेखील जाऊ शकत नाही इतक्या अरूंद गल्ल्या असणाऱ्या वस्त्या उभारणाऱ्यांना जर सरकार पाठीशी घालू लागले तर लोक सगळे कायदे बासनात गुंडाळून ठेवतील आणि ‘‘त्यांना काही झाले नाही तर मी का मागे राहू?’’ ही वृत्ती वाढीस लागेल. नव्या निर्णयानुसार रेल्वेच्या जागेवर असणारी बांधकामेदेखील नियमित केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जी जागा केंद्राच्या मालकीची आहे त्या जागेवर असणारी बांधकामे राज्य सरकार कसे काय नियमित करू शकेल? तसे झाले तर मग आदर्श सोसायटीत जे घडले तेही नियमित करावे लागेल. कॅम्पा कोलाच्या घरांच्या बाबतीत कोणी काही करू शकले नाही, पिंपरी-चिंचवडची बेकायदेशीर बांधकामे तोडणाऱ्या आयुक्तांना पळवून लावले गेले, यात जर कोणाला फार मोठा राजकीय पुरुषार्थ गाजवला असे वाटत असेल तर त्यांनीच त्यांची पाठ थोपटून घ्यावी; मात्र मीरा रोड भागात सहा महिन्यांत उभारली गेलेली सात मजली इमारत कोसळून जेवढे लोक मेले त्यांचे पातक कोणाच्या माथी मारायचे, हेही त्यांनी सांगून टाकावे.या निर्णयामुळे गावोगावी गावगुंडांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. मोकळ्या जागा वाटून घेऊन ग्रामपंचायती, नगरपालिकांमध्ये मागच्या तारखांच्या नोंदी लावण्याचे काम झपाट्याने सुरू झाले आहे. या गावगुंडांचा कोणताही पक्ष नाही. पैसा हेच त्यांचे सर्वस्व आहे. स्थानिक अधिकाऱ्यांची मिलीभगत होऊन जे काही या निर्णयाच्या नावाखाली राज्यभर चालू झाले आहे त्याची फार मोठी सामाजिक किंमत राज्यकर्त्यांना मोजावी लागेल. यातून मोठा सामाजिक असमतोल तयार होईल आणि त्यातून होणाऱ्या नुकसानीची किंमत मोजण्याच्या पलीकडची असेल; मात्र याचा विचारच करायचा नाही असे जर ठरवून सगळ्यांनीच डोळ्यावर झापडे लावायची ठरवली तर परिस्थिती गंभीर बनेल. अजूनही वेळ गेलेली नाही, यापेक्षा जास्त काय सांगायचे?