शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

एक पणती तेवू लागते, तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 09:12 IST

एवढ्या घनघोर अंधारात धिटुकल्या पणत्या तेवू लागतात आणि अंतरंगात दिवे पेटू लागतात.

सूर्य चालला होता अस्ताला. अस्ताला चाललेल्या सूर्याला वाटले, आपल्या पश्चात प्रकाशदानाचे आपले हे कार्य करणार तरी कोण? त्याने विचारले तसे. कोणीच नाही आले पुढे. चंद्र म्हणाला, ‘मीच बापडा परप्रकाशित. मी कोणाला काय प्रकाश देणार?’ कोणीच पुढे येत नव्हते, तेव्हा इवलीशी पणती आली पुढे. ती धिटुकली पणती पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. तेव्हा ती पणती म्हणाली, ‘मी छोटी. माझी व्याप्ती छोटी. सूर्याचा आकार महाकाय. आवाका प्रचंड. मी तुलना करत नाही. एवढा प्रकाश देणे मला शक्यही नाही. पण आज एवढे आश्वासन देते, जिथे मी असेन, त्याच्या आसपास अंधार कधीच नाही फिरकणार!’ ही कविता खरंतर रवींद्रनाथ टागोरांची. दिवाळी आली की हमखास ती आठवते.

एवढ्या घनघोर अंधारात धिटुकल्या पणत्या तेवू लागतात आणि अंतरंगात दिवे पेटू लागतात. सभोवताली फार बरे चालले आहे, असे नाही. रोजचे वर्तमानपत्र वाचणे हीच जोखीम वाटावी आणि बातम्या बघण्याचीच भीती वाटावी, असे हे वर्तमान. एवढे काही काही घडत असते. विखार ही मातृभाषा झालीय, असे वाटण्यासारखे बरेच काही कानावर पडत असते. कसे होणार आपले, आणि कसे होणार उद्याच्या मानवी समुदायाचे, अशी चिंतेची काजळी वाढत असते. मनाच्या तळाशी निराशा वस्तीला येते. काही बदलू शकणार नाही, असे वाटू लागते. त्याच वेळी नेमकी दिवाळी येते. एकेक दिवा तेवू लागतो. प्रकाशाचा उत्सव सजू लागतो. खोल कुठेतरी उमेदीचा किरण रुजू लागतो. खात्री पटू लागते की अंधाराचे जाळे फिटणार आहे.

संशयाचे धुके हटणार आहे. आकाश मोकळे होणार आहे. सर्वदूर प्रकाश वाहू लागणार आहे. हृदयामध्ये मग आशेची वात लागते. हीच ती आशा आहे, जिने मानवी समुदायाला इथवर आणले. गौतम बुद्ध ‘अत्त दीप भव’ म्हणाले आणि त्यांनी स्वतःच पणती व्हायला सांगितले. बुद्धांनी दिलेल्या करुणेने मानवी जगणेच बदलून गेले. जगात दुःख आहे आणि त्याला कारण आहे, हे बुद्धांनी सांगितलेच, पण त्यांनी जगण्यालाच प्रयोजन दिले.  ‘हे विश्वचि माझे घर’ म्हणत संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक पसायदान दिले, तर संत तुकारामांनी खरा देव सांगत नाठाळांना काठीने बदडले. याच रस्त्याने चालत महात्मा गांधींना आतला आवाज गवसला आणि पंडित नेहरूंनी भल्या पहाटे नियतीशी करार केला. अब्राहम लिंकनची अमेरिका आणि महात्मा फुल्यांच्या मराठी मुलुखात अंतर कैक मैल; पण लिंकनच्या चळवळीने महात्मा फुल्यांना असा प्रकाश दाखवला की, त्यांनी आपले पुस्तकच या चळवळीला अर्पण केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाने तिकडे बराक ओबामांना प्रेरणा मिळाली, तर जर्मन कवी गटे महाभारतामुळे प्रभावित होऊन कालिदासाला डोक्यावर घेऊन नाचू लागला. कुठली ज्योत कुठे तेवेल आणि तिचा प्रकाश कुठवर पोहोचेल, याचे काही गणित नाही. भौतिकशास्त्रालाही ‘या’ प्रकाशाचा वेग सांगता यायचा नाही, असे खुद्द आइनस्टाइनच म्हणाले होते! प्रकाशाला जात नाही, धर्म नाही, भाषा नाही अथवा सीमा नाहीत. बाहेर अंधार वाढू लागतो, तेव्हा कवी एकच सांगतो- ‘अंधार फार झाला, पणती जपून ठेवा.’ अंधाराशी रोज ‘डील’ करताना हाच ‘वैधानिक इशारा’ आयुष्यभर लक्षात ठेवायचा!  प्राप्त वातावरणात  ‘लक्ष्मी’पूजनाचे संदर्भच बदलून गेले आहेत. फटाक्यांच्या लडीत आपलाच आतला आवाज सापडू नये, असे होऊ लागले आहे.

कोलाहल वाढत चालला आहे. गोंगाट वाढतोय, पण कोणीच बोलत नाही. संवादाची माध्यमे वाढली, पण संवादच होत नाही. असहमती व्यक्त करण्याचा अवकाश नाही. जग जवळ आलेय, पण घरातली नाती हरवत चालली आहेत. आभासी जगात हजारो मित्र, पण तरी सोबतीला एकाकीपण फक्त. आशेने कोणाकडे पाहावे, तर हमखास अपेक्षाभंग. या सगळ्यात रोजच्या रणांगणातील प्रश्न मागच्या बाकांवर. माणूसपणावर कधी जात मात करते, तर कधी धर्म. कधी लिंग तर कधी भाषा. माणूस मात्र हरू लागतो. माणूसपण मरू लागते. या गदारोळात एकटेपण येते. अंधाराची गर्ता आणखी खोल होऊ लागते. काळरात्र गडद होऊ लागते. अशा वेळी दिवाळी येते. नवे संकल्प घेऊन नवी पणती येते. नवे विकल्प दाखवत ही धिटुकली पणती डोळे मिचकावू लागते. अंधाराची सेना मग क्षणार्धात गायब होते. घराच्या अंगणात तेवणारी पणती मग मनाच्या अंगणातही प्रज्वलित होते. आणि अंगण गाऊ लागते - दिवे लागले रे, दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले!..

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024