शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

दिवाळी पहाटने सोशल इंजिनिअरिंग

By admin | Updated: November 3, 2016 05:00 IST

कोणत्याही कलेचा जिवंत अनुभव घेताना संवादाविनाही संवाद घडत असतो.

कोणत्याही कलेचा जिवंत अनुभव घेताना संवादाविनाही संवाद घडत असतो. मनांची एकरूपता साधत असते. दिवाळी पहाटच्या निमित्ताने हेच सोशल इंजिनिअरिंग झाले. आजच्या वातावरणात खऱ्या अर्थाने याची गरज होती. वाडासंस्कृती, चाळींतील दिवस आणि कोनाडा-अंगण-तुळशीवृंदावन शहरांतून झपाट्यानं लोप पावत चालले आहे. नागरीकरणाच्या वाढत्या रेट्यात हा बदल अपरिहार्यच. दिवाळीच्या फराळाला बोलावून गप्पांची मैफल रंगविणेही कमी झाले आहे. व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक अशा सोशल मीडियाच्या कट्ट्यांवरूनच संवाद साधण्याचे दिवस आले आहेत. जिवंत संवाद हरवत असताना, एकमेकांच्या गाठीभेटीही दुर्मिळ होत आहेत. माणूस हा सोशल प्राणी आहे, हेच चौकोनी कुटुंबांच्या काळात हरवून जात असताना दिवाळी पहाटच्या निमित्ताने लोक पुन्हा एकत्र येत असल्याचे आशादायक वातावरण यंदा या दिवाळीमध्ये पाहावयास मिळाले. पुण्यातील यंदाची दिवाळी ही स्वरोत्सवाची दिवाळी होती, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. शहराच्या प्रत्येक भागात दिवाळीच्या निमित्ताने सुरांच्या मैफली सजल्या. पहाटेपासून मोठ्या संख्येने नागरिकांनी त्याला दाद दिली. कोणत्याही कलेचा जिवंत अनुभव घेताना संवादाविनाही संवाद घडत असतो. मनांची एकरूपता साधत असते. दिवाळी पहाटच्या निमित्ताने हेच सोशल इंजिनिअरिंग झाले. आजच्या वातावरणात खऱ्या अर्थाने याची गरज होती. शहरे बकाल होत चालली आहेत, असे म्हणतात. हे बकालपण केवळ दृश्य स्वरूपात नसते; तर मनांमध्येही ही बकालता कोठेतरी घर करून बसलेली असते. त्यातूनच मग एकटेपणा आणि तटस्थता वाढीला लागते. रस्त्यावर एखाद्या तरुणीला मारहाण होत असली तरी आपल्याला काय त्याचे, म्हणून दुर्लक्ष केले जाते. शेजारच्या फ्लॅटमध्ये दरोडा पडत असला तरी शेजारधर्माचे पालन होत नाही. हा सगळा अंधार दाटलेला असताना संवादाचे पर्व दिवाळी पहाटच्या निमित्ताने चालू व्हावे. कारण, शेवटी दिवाळी म्हणजे तरी काय? ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ चा संदेश घेऊनच दिवाळी येत असते. अज्ञानरूपी अंध:कारावर ज्ञानरूपी ज्योतीने मात मिळविण्यासाठी केलेला प्रतीकात्मक उत्सव म्हणजे दिवाळी असते. आपल्या संतपरंपरेतही या ज्ञानरूपी दीपोत्सवाचा गजर केला गेला आहे. कविश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोरांनी सांगितलेली कथा या संदर्भात मोठी बोलकी आहे. रोजच प्रकाशाचं दान करणारा सूर्य एके दिवशी कंटाळला. त्यानं सांगितलं, की आता मी काही हे काम करणार नाही. माझं काम कोण करेल? मात्र, सूर्याचं काम करायला कुणीही पुढे येईना. तेव्हा एक पणती पुढे आली. ती म्हणाली, की मी माझ्या कुवतीप्रमाणं हे काम करेन. माझा संपूर्ण प्रकाश या जगाला अर्पण करेन. दिवाळी पहाटच्या निमित्ताने संवादाची एक पणती पेटली आहे. दिवाळी पहाटच्या उपक्रमांना यंदाच्या महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. त्यामुळेच पुण्यासारख्या शहरात यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन झाले, असेही म्हटले जाते. पण यातून जे चांगलं घडलं त्याच्याकडे सकारात्मकतेने पाहावयास हवे. प्रसिद्ध कलाकारांपासून ते होतकरूंना या निमित्ताने आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. समाजाच्या मोठ्या वर्गासमोर जिवंत अनुभूती सादर करता आली. विशेष म्हणजे पुण्यातील सगळ्या दिवाळी पहाट उपक्रमांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांच्या अभिरुचीवरच शंका घेऊन धांगडधिंग्याचे कार्यक्रम त्यांच्या माथी मारणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे. शास्त्रीय संगीताची मेजवानी, सुगम संगीतातील गोडवाही प्रेक्षकांना तितकाच भावतो, हेदेखील दिसून आले आहे. प्रेक्षकांमध्येही या निमित्ताने अभिरुचीची पेरणी होऊ लागली आहे. तमावर- अंध:कारावर उजेडानं मात करण्याचा संदेश देणारा हा सण. निराशेवर आशेने विजय मिळविण्यासाठीचा हा उत्सव असतो. म्हणूनच कवी शंकर रामाणींच्या कवितेतील ओळी यंदाच्या दिवाळीला चपखल बसतात. ‘दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले...’- अविनाश थोरात