शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

देवत्व जागवणारा नाशिक पॅटर्न

By admin | Updated: September 17, 2016 04:41 IST

श्रद्धा मनात असावी लागते. तशी ती असली की तिचे प्रदर्शन मांडण्याची अगर तिच्याशी संबंधित उपचारात अडकण्याची गरजच भासत नाही

श्रद्धा मनात असावी लागते. तशी ती असली की तिचे प्रदर्शन मांडण्याची अगर तिच्याशी संबंधित उपचारात अडकण्याची गरजच भासत नाही. मूर्तीत पाहिले जाणारे देवपण मनुष्यात उतरण्याची आवश्यकता म्हणूनच प्रतिपादिली जाते आणि आजच्या काळात अनेकविध समस्यांवर तेच लाभदायी ठरू शकणारे आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन न करता त्या मूर्ती महापालिका वा सामाजिक संस्थांकडे दान करण्याच्या नाशिककरांनी जपलेल्या व जोपासलेल्या चळवळीला यंदाही जो भरघोस प्रतिसाद लाभला, तो असाच माणसां-माणसांतील देवत्वाची प्रचिती देणारा तसेच पर्यावरणविषयक समस्येवर उपाय सुचविणारा ठरला आहे. अनंत चतुर्दशीला नदीत विसर्जित केलेल्या मूर्ती काही अंतरापर्यंत वाहात जाऊन नदीकाठी विद्रुपावस्थेत विखरून पडलेल्या आढळून येतात. दहा दिवस ज्या बाप्पाचे मनोभावे पूजन केले त्या बाप्पांच्या विसर्जित मूर्तीची ही विदारक अवस्था प्रत्येक सश्रद्ध मनासाठी वेदनादायीच ठरत असते. प्रत्येकच ठिकाणी हे असे होते. पण नाशकात त्याचे गांभीर्य अधिकत्वाने यासाठी जाणवते की, येथे शहराच्या मध्यवस्तीतून गोदावरी वाहाते. त्यामुळे गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर नदी किनारी जागोजागी आढळणाऱ्या भग्न मूर्तींचे वास्तव जसे समोर येते तसेच जलप्रदूषण व एकूणच पर्यावरणाच्या हानीचा प्रश्नही उपस्थित होतो. याच पार्श्वभूमीवर १९९८ पासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने मूर्तिदानाची संकल्पना पुढे आली. नदीपात्रात टाकून दिले जाणारे निर्माल्य गोळा करता करता विसर्जित मूर्तीही दान म्हणून मिळविण्याचा प्रयत्न या अंतर्गत केला गेला. त्यास प्रारंभी काहीसा विरोध झाला हे खरे, परंतु या संकल्पनेमागील भूमिका लक्षात आल्यावर गेल्या काही वर्षांपासून मूर्तिदानास प्रचंड प्रतिसादही मिळू लागला. यंदाही अशा लाखो मूर्ती दान केल्या गेल्या. महापालिकेसह सामाजिक संस्था-संघटनाही याकरिता पुढे आल्याने व ‘देव द्या, देवपण घ्या’ अशा विचारप्रवृत्त करणाऱ्या आवाहनामुळे आता विसर्जित गणेशमूर्ती दानाचा ‘नाशिक पॅटर्न’ प्रस्थापित व्हावा, असे यश या चळवळीला लाभलेले दिसून येते.महत्त्वाचे म्हणजे, प्लॅस्टिकच्या पिशवीतून निर्माल्य नदीपात्रात फेकून देणे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असल्याबद्दल जनजागृती करीत यंदा अनेक सामाजिक संघटनांनी पाण्यात विलय होणाऱ्या पर्यावरणपूरक निर्माल्य पिशव्या मोठ्या प्रमाणात घरोघरी पोहोचविल्या. त्याखेरीज यंदा प्रथमच पुण्यापाठोपाठ नाशकातही ‘पीओपी’ मूर्तींचे विघटन करू शकणाऱ्या अमोनिअम बाय कार्बोनेट पावडरचे महापालिकेतर्फे मोफत वितरण करण्यात आले. शहराच्या सहा विभागात चार टनपेक्षा अधिक पावडर वितरित केली गेली. नदीकाठी होणारी गर्दी, नदीतील विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण यासारख्या बाबींना फाटा देण्यासाठी घरच्या घरी बाप्पांच्या विसर्जनाची मानसिकताही जोर धरू पावत असल्याचेच यातून स्पष्ट व्हावे. गणेशोत्सव साजरा करताना काही सार्वजनिक मंडळांनी डेकोरेशन व अन्य खर्च न करता जमलेल्या वर्गणीतून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरविल्याचेही दिसून आले. सारे काही संपल्याचा निराशावादी उसासा टाकणाऱ्यांनी हरखून जावे, असेच हे चित्र आहे.एकीकडे बाप्पांच्या संदर्भाने या साऱ्या आश्वासक व विवेकवादी उपक्रमांना लोकमान्यता लाभत असताना, या सकारात्मकतेत भर घालणारी आणखी एक बाब जिल्ह्यातील अंदरसूलसारख्या छोट्या गावी घडून आली आहे. शासन अवयवदानाची मोहीम चालवित असताना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजप्रणीत श्री संप्रदायाच्या पुढाकारातून अंदरसूलच्या पंचक्रोशीतील सुमारे ७०० गावकऱ्यांनी देहदानाचा संकल्प केला आहे. बुवा-बाबांबद्दलच्या कुणाच्या धारणा काहीही असोत, परंतु श्रद्धेचा मार्ग रचनात्मक कार्यासाठी कसा प्रशस्त करता येतो, हेच यातून स्पष्ट व्हावे. बाप्पा गणरायाच्या निमित्ताने जागलेले हे समाजभान महत्त्वाचे आहे.- किरण अग्रवाल