शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
3
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
4
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
5
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
6
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
7
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
8
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
9
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
10
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
11
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
13
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
14
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
15
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
16
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
17
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
18
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
19
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
20
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा

देवत्व जागवणारा नाशिक पॅटर्न

By admin | Updated: September 17, 2016 04:41 IST

श्रद्धा मनात असावी लागते. तशी ती असली की तिचे प्रदर्शन मांडण्याची अगर तिच्याशी संबंधित उपचारात अडकण्याची गरजच भासत नाही

श्रद्धा मनात असावी लागते. तशी ती असली की तिचे प्रदर्शन मांडण्याची अगर तिच्याशी संबंधित उपचारात अडकण्याची गरजच भासत नाही. मूर्तीत पाहिले जाणारे देवपण मनुष्यात उतरण्याची आवश्यकता म्हणूनच प्रतिपादिली जाते आणि आजच्या काळात अनेकविध समस्यांवर तेच लाभदायी ठरू शकणारे आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन न करता त्या मूर्ती महापालिका वा सामाजिक संस्थांकडे दान करण्याच्या नाशिककरांनी जपलेल्या व जोपासलेल्या चळवळीला यंदाही जो भरघोस प्रतिसाद लाभला, तो असाच माणसां-माणसांतील देवत्वाची प्रचिती देणारा तसेच पर्यावरणविषयक समस्येवर उपाय सुचविणारा ठरला आहे. अनंत चतुर्दशीला नदीत विसर्जित केलेल्या मूर्ती काही अंतरापर्यंत वाहात जाऊन नदीकाठी विद्रुपावस्थेत विखरून पडलेल्या आढळून येतात. दहा दिवस ज्या बाप्पाचे मनोभावे पूजन केले त्या बाप्पांच्या विसर्जित मूर्तीची ही विदारक अवस्था प्रत्येक सश्रद्ध मनासाठी वेदनादायीच ठरत असते. प्रत्येकच ठिकाणी हे असे होते. पण नाशकात त्याचे गांभीर्य अधिकत्वाने यासाठी जाणवते की, येथे शहराच्या मध्यवस्तीतून गोदावरी वाहाते. त्यामुळे गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर नदी किनारी जागोजागी आढळणाऱ्या भग्न मूर्तींचे वास्तव जसे समोर येते तसेच जलप्रदूषण व एकूणच पर्यावरणाच्या हानीचा प्रश्नही उपस्थित होतो. याच पार्श्वभूमीवर १९९८ पासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने मूर्तिदानाची संकल्पना पुढे आली. नदीपात्रात टाकून दिले जाणारे निर्माल्य गोळा करता करता विसर्जित मूर्तीही दान म्हणून मिळविण्याचा प्रयत्न या अंतर्गत केला गेला. त्यास प्रारंभी काहीसा विरोध झाला हे खरे, परंतु या संकल्पनेमागील भूमिका लक्षात आल्यावर गेल्या काही वर्षांपासून मूर्तिदानास प्रचंड प्रतिसादही मिळू लागला. यंदाही अशा लाखो मूर्ती दान केल्या गेल्या. महापालिकेसह सामाजिक संस्था-संघटनाही याकरिता पुढे आल्याने व ‘देव द्या, देवपण घ्या’ अशा विचारप्रवृत्त करणाऱ्या आवाहनामुळे आता विसर्जित गणेशमूर्ती दानाचा ‘नाशिक पॅटर्न’ प्रस्थापित व्हावा, असे यश या चळवळीला लाभलेले दिसून येते.महत्त्वाचे म्हणजे, प्लॅस्टिकच्या पिशवीतून निर्माल्य नदीपात्रात फेकून देणे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असल्याबद्दल जनजागृती करीत यंदा अनेक सामाजिक संघटनांनी पाण्यात विलय होणाऱ्या पर्यावरणपूरक निर्माल्य पिशव्या मोठ्या प्रमाणात घरोघरी पोहोचविल्या. त्याखेरीज यंदा प्रथमच पुण्यापाठोपाठ नाशकातही ‘पीओपी’ मूर्तींचे विघटन करू शकणाऱ्या अमोनिअम बाय कार्बोनेट पावडरचे महापालिकेतर्फे मोफत वितरण करण्यात आले. शहराच्या सहा विभागात चार टनपेक्षा अधिक पावडर वितरित केली गेली. नदीकाठी होणारी गर्दी, नदीतील विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण यासारख्या बाबींना फाटा देण्यासाठी घरच्या घरी बाप्पांच्या विसर्जनाची मानसिकताही जोर धरू पावत असल्याचेच यातून स्पष्ट व्हावे. गणेशोत्सव साजरा करताना काही सार्वजनिक मंडळांनी डेकोरेशन व अन्य खर्च न करता जमलेल्या वर्गणीतून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरविल्याचेही दिसून आले. सारे काही संपल्याचा निराशावादी उसासा टाकणाऱ्यांनी हरखून जावे, असेच हे चित्र आहे.एकीकडे बाप्पांच्या संदर्भाने या साऱ्या आश्वासक व विवेकवादी उपक्रमांना लोकमान्यता लाभत असताना, या सकारात्मकतेत भर घालणारी आणखी एक बाब जिल्ह्यातील अंदरसूलसारख्या छोट्या गावी घडून आली आहे. शासन अवयवदानाची मोहीम चालवित असताना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजप्रणीत श्री संप्रदायाच्या पुढाकारातून अंदरसूलच्या पंचक्रोशीतील सुमारे ७०० गावकऱ्यांनी देहदानाचा संकल्प केला आहे. बुवा-बाबांबद्दलच्या कुणाच्या धारणा काहीही असोत, परंतु श्रद्धेचा मार्ग रचनात्मक कार्यासाठी कसा प्रशस्त करता येतो, हेच यातून स्पष्ट व्हावे. बाप्पा गणरायाच्या निमित्ताने जागलेले हे समाजभान महत्त्वाचे आहे.- किरण अग्रवाल