शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

देवत्व जागवणारा नाशिक पॅटर्न

By admin | Updated: September 17, 2016 04:41 IST

श्रद्धा मनात असावी लागते. तशी ती असली की तिचे प्रदर्शन मांडण्याची अगर तिच्याशी संबंधित उपचारात अडकण्याची गरजच भासत नाही

श्रद्धा मनात असावी लागते. तशी ती असली की तिचे प्रदर्शन मांडण्याची अगर तिच्याशी संबंधित उपचारात अडकण्याची गरजच भासत नाही. मूर्तीत पाहिले जाणारे देवपण मनुष्यात उतरण्याची आवश्यकता म्हणूनच प्रतिपादिली जाते आणि आजच्या काळात अनेकविध समस्यांवर तेच लाभदायी ठरू शकणारे आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन न करता त्या मूर्ती महापालिका वा सामाजिक संस्थांकडे दान करण्याच्या नाशिककरांनी जपलेल्या व जोपासलेल्या चळवळीला यंदाही जो भरघोस प्रतिसाद लाभला, तो असाच माणसां-माणसांतील देवत्वाची प्रचिती देणारा तसेच पर्यावरणविषयक समस्येवर उपाय सुचविणारा ठरला आहे. अनंत चतुर्दशीला नदीत विसर्जित केलेल्या मूर्ती काही अंतरापर्यंत वाहात जाऊन नदीकाठी विद्रुपावस्थेत विखरून पडलेल्या आढळून येतात. दहा दिवस ज्या बाप्पाचे मनोभावे पूजन केले त्या बाप्पांच्या विसर्जित मूर्तीची ही विदारक अवस्था प्रत्येक सश्रद्ध मनासाठी वेदनादायीच ठरत असते. प्रत्येकच ठिकाणी हे असे होते. पण नाशकात त्याचे गांभीर्य अधिकत्वाने यासाठी जाणवते की, येथे शहराच्या मध्यवस्तीतून गोदावरी वाहाते. त्यामुळे गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर नदी किनारी जागोजागी आढळणाऱ्या भग्न मूर्तींचे वास्तव जसे समोर येते तसेच जलप्रदूषण व एकूणच पर्यावरणाच्या हानीचा प्रश्नही उपस्थित होतो. याच पार्श्वभूमीवर १९९८ पासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने मूर्तिदानाची संकल्पना पुढे आली. नदीपात्रात टाकून दिले जाणारे निर्माल्य गोळा करता करता विसर्जित मूर्तीही दान म्हणून मिळविण्याचा प्रयत्न या अंतर्गत केला गेला. त्यास प्रारंभी काहीसा विरोध झाला हे खरे, परंतु या संकल्पनेमागील भूमिका लक्षात आल्यावर गेल्या काही वर्षांपासून मूर्तिदानास प्रचंड प्रतिसादही मिळू लागला. यंदाही अशा लाखो मूर्ती दान केल्या गेल्या. महापालिकेसह सामाजिक संस्था-संघटनाही याकरिता पुढे आल्याने व ‘देव द्या, देवपण घ्या’ अशा विचारप्रवृत्त करणाऱ्या आवाहनामुळे आता विसर्जित गणेशमूर्ती दानाचा ‘नाशिक पॅटर्न’ प्रस्थापित व्हावा, असे यश या चळवळीला लाभलेले दिसून येते.महत्त्वाचे म्हणजे, प्लॅस्टिकच्या पिशवीतून निर्माल्य नदीपात्रात फेकून देणे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असल्याबद्दल जनजागृती करीत यंदा अनेक सामाजिक संघटनांनी पाण्यात विलय होणाऱ्या पर्यावरणपूरक निर्माल्य पिशव्या मोठ्या प्रमाणात घरोघरी पोहोचविल्या. त्याखेरीज यंदा प्रथमच पुण्यापाठोपाठ नाशकातही ‘पीओपी’ मूर्तींचे विघटन करू शकणाऱ्या अमोनिअम बाय कार्बोनेट पावडरचे महापालिकेतर्फे मोफत वितरण करण्यात आले. शहराच्या सहा विभागात चार टनपेक्षा अधिक पावडर वितरित केली गेली. नदीकाठी होणारी गर्दी, नदीतील विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण यासारख्या बाबींना फाटा देण्यासाठी घरच्या घरी बाप्पांच्या विसर्जनाची मानसिकताही जोर धरू पावत असल्याचेच यातून स्पष्ट व्हावे. गणेशोत्सव साजरा करताना काही सार्वजनिक मंडळांनी डेकोरेशन व अन्य खर्च न करता जमलेल्या वर्गणीतून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरविल्याचेही दिसून आले. सारे काही संपल्याचा निराशावादी उसासा टाकणाऱ्यांनी हरखून जावे, असेच हे चित्र आहे.एकीकडे बाप्पांच्या संदर्भाने या साऱ्या आश्वासक व विवेकवादी उपक्रमांना लोकमान्यता लाभत असताना, या सकारात्मकतेत भर घालणारी आणखी एक बाब जिल्ह्यातील अंदरसूलसारख्या छोट्या गावी घडून आली आहे. शासन अवयवदानाची मोहीम चालवित असताना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजप्रणीत श्री संप्रदायाच्या पुढाकारातून अंदरसूलच्या पंचक्रोशीतील सुमारे ७०० गावकऱ्यांनी देहदानाचा संकल्प केला आहे. बुवा-बाबांबद्दलच्या कुणाच्या धारणा काहीही असोत, परंतु श्रद्धेचा मार्ग रचनात्मक कार्यासाठी कसा प्रशस्त करता येतो, हेच यातून स्पष्ट व्हावे. बाप्पा गणरायाच्या निमित्ताने जागलेले हे समाजभान महत्त्वाचे आहे.- किरण अग्रवाल