शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

‘डिजिटल’ फुगे!

By admin | Updated: November 5, 2015 03:18 IST

आभासी दुनियेच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या गुगलच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रोजेक्ट लून’ची प्रायोगिक तत्वावर चाचणी घेण्यास, भारत सरकारने अखेर मंजुरी दिली आहे.

आभासी दुनियेच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या गुगलच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रोजेक्ट लून’ची प्रायोगिक तत्वावर चाचणी घेण्यास, भारत सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात इंटरनेटचा प्रसार करणे हे गुगलचे स्वप्न आहे आणि त्यासाठी त्या कंपनीने महाकाय फुग्यांचा वापर करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. हेलियम हा हवेपेक्षा हलका असलेला वायू भरलेले महाकाय फुगे वातावरणातील ‘स्ट्रॅटोस्फिअर’ थरामध्ये स्थिर करून, फुग्यांमध्ये बसविलेल्या अँटिनांच्या साहाय्याने इंटरनेट सिग्नलचे ग्रहण व प्रक्षेपण करणे, असे हे तंत्रज्ञान आहे. असा एक फुगा जमिनीवरील सुमारे ४० चौरस किलोमीटर भागात इंटरनेट सेवा पुरवू शकतो. सुदूर भागांमध्ये इंटरनेट पोहचविण्यासाठी, विद्यमान तंत्रज्ञानाच्या तुलनेत हे नवे तंत्रज्ञान अत्यंत स्वस्त पडते. चाचणी यशस्वी होऊन या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाल्यास, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘डिजिटल इंडिया’च्या स्वप्नाला पंख नव्हे, तर फुगे लागू शकतात! नव्या, समर्थ भारताचे स्वप्न साकारण्यात, ‘डिजिटल इंडिया’ प्रकल्प खूप महत्त्वाची भूमिका अदा करू शकतो. त्यामुळे ‘प्रोजेक्ट लून’ची चाचणी खूप महत्त्वाची आहे. दुर्दैवाने प्रत्यक्ष चाचणीस प्रारंभ होण्यापूर्वीच त्यासंदर्भात शंकाकुशंका व्यक्त करणे सुरू झाले आहे. या फुग्यांच्या माध्यमातून हेरगिरी होऊ शकते, भारतातील संवेदनशील स्थळांबाबतची माहिती आयतीच विदेशी शक्तींच्या हाती लागू शकते आणि त्यामुळे देशाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, अशा प्रकारचे आक्षेप घेतल्या जाऊ लागले आहेत. गुगल केवळ तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार असून, प्रत्यक्ष इंटरनेट सेवा मात्र भारतीय संचार निगम लिमिटेड ही सरकारी कंपनी उपलब्ध करून देणार आहे, या वस्तुस्थितीकडे मात्र पद्धतशीर डोळेझाक केल्या जात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे विदेशी शक्तींना भारताची हेरगिरी करायचीच असल्यास, त्यासाठी अत्यंत शक्तिशाली कॅमेरे बसविलेले हेरगिरी उपग्रह अवकाशात घिरट्या घालतच असतात, हे विसरता कामा नये! भारताने १९९८ मध्ये केलेल्या दुसऱ्या अण्वस्त्र चाचणीच्या वेळी अमेरिकन उपग्रहाने त्या तयारीवर नजर ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि भारताने तो हाणूनही पाडला होता. याचाच अर्थ संवेदनशील गुपिते कशी जपायची, हे आपल्यालाही चांगले ठाऊक आहे. तेव्हा उगीच आपल्या ग्रामीण बांधवांना इंटरनेटशी जोडल्या जाण्याच्या मार्गातील धोंड बनण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही, हे उमजलेले बरे!