शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

‘डिजिटल’ फुगे!

By admin | Updated: November 5, 2015 03:18 IST

आभासी दुनियेच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या गुगलच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रोजेक्ट लून’ची प्रायोगिक तत्वावर चाचणी घेण्यास, भारत सरकारने अखेर मंजुरी दिली आहे.

आभासी दुनियेच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या गुगलच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रोजेक्ट लून’ची प्रायोगिक तत्वावर चाचणी घेण्यास, भारत सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात इंटरनेटचा प्रसार करणे हे गुगलचे स्वप्न आहे आणि त्यासाठी त्या कंपनीने महाकाय फुग्यांचा वापर करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. हेलियम हा हवेपेक्षा हलका असलेला वायू भरलेले महाकाय फुगे वातावरणातील ‘स्ट्रॅटोस्फिअर’ थरामध्ये स्थिर करून, फुग्यांमध्ये बसविलेल्या अँटिनांच्या साहाय्याने इंटरनेट सिग्नलचे ग्रहण व प्रक्षेपण करणे, असे हे तंत्रज्ञान आहे. असा एक फुगा जमिनीवरील सुमारे ४० चौरस किलोमीटर भागात इंटरनेट सेवा पुरवू शकतो. सुदूर भागांमध्ये इंटरनेट पोहचविण्यासाठी, विद्यमान तंत्रज्ञानाच्या तुलनेत हे नवे तंत्रज्ञान अत्यंत स्वस्त पडते. चाचणी यशस्वी होऊन या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाल्यास, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘डिजिटल इंडिया’च्या स्वप्नाला पंख नव्हे, तर फुगे लागू शकतात! नव्या, समर्थ भारताचे स्वप्न साकारण्यात, ‘डिजिटल इंडिया’ प्रकल्प खूप महत्त्वाची भूमिका अदा करू शकतो. त्यामुळे ‘प्रोजेक्ट लून’ची चाचणी खूप महत्त्वाची आहे. दुर्दैवाने प्रत्यक्ष चाचणीस प्रारंभ होण्यापूर्वीच त्यासंदर्भात शंकाकुशंका व्यक्त करणे सुरू झाले आहे. या फुग्यांच्या माध्यमातून हेरगिरी होऊ शकते, भारतातील संवेदनशील स्थळांबाबतची माहिती आयतीच विदेशी शक्तींच्या हाती लागू शकते आणि त्यामुळे देशाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, अशा प्रकारचे आक्षेप घेतल्या जाऊ लागले आहेत. गुगल केवळ तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार असून, प्रत्यक्ष इंटरनेट सेवा मात्र भारतीय संचार निगम लिमिटेड ही सरकारी कंपनी उपलब्ध करून देणार आहे, या वस्तुस्थितीकडे मात्र पद्धतशीर डोळेझाक केल्या जात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे विदेशी शक्तींना भारताची हेरगिरी करायचीच असल्यास, त्यासाठी अत्यंत शक्तिशाली कॅमेरे बसविलेले हेरगिरी उपग्रह अवकाशात घिरट्या घालतच असतात, हे विसरता कामा नये! भारताने १९९८ मध्ये केलेल्या दुसऱ्या अण्वस्त्र चाचणीच्या वेळी अमेरिकन उपग्रहाने त्या तयारीवर नजर ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि भारताने तो हाणूनही पाडला होता. याचाच अर्थ संवेदनशील गुपिते कशी जपायची, हे आपल्यालाही चांगले ठाऊक आहे. तेव्हा उगीच आपल्या ग्रामीण बांधवांना इंटरनेटशी जोडल्या जाण्याच्या मार्गातील धोंड बनण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही, हे उमजलेले बरे!