शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

‘डिजिटल’ फुगे!

By admin | Updated: November 5, 2015 03:18 IST

आभासी दुनियेच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या गुगलच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रोजेक्ट लून’ची प्रायोगिक तत्वावर चाचणी घेण्यास, भारत सरकारने अखेर मंजुरी दिली आहे.

आभासी दुनियेच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या गुगलच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रोजेक्ट लून’ची प्रायोगिक तत्वावर चाचणी घेण्यास, भारत सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात इंटरनेटचा प्रसार करणे हे गुगलचे स्वप्न आहे आणि त्यासाठी त्या कंपनीने महाकाय फुग्यांचा वापर करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. हेलियम हा हवेपेक्षा हलका असलेला वायू भरलेले महाकाय फुगे वातावरणातील ‘स्ट्रॅटोस्फिअर’ थरामध्ये स्थिर करून, फुग्यांमध्ये बसविलेल्या अँटिनांच्या साहाय्याने इंटरनेट सिग्नलचे ग्रहण व प्रक्षेपण करणे, असे हे तंत्रज्ञान आहे. असा एक फुगा जमिनीवरील सुमारे ४० चौरस किलोमीटर भागात इंटरनेट सेवा पुरवू शकतो. सुदूर भागांमध्ये इंटरनेट पोहचविण्यासाठी, विद्यमान तंत्रज्ञानाच्या तुलनेत हे नवे तंत्रज्ञान अत्यंत स्वस्त पडते. चाचणी यशस्वी होऊन या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाल्यास, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘डिजिटल इंडिया’च्या स्वप्नाला पंख नव्हे, तर फुगे लागू शकतात! नव्या, समर्थ भारताचे स्वप्न साकारण्यात, ‘डिजिटल इंडिया’ प्रकल्प खूप महत्त्वाची भूमिका अदा करू शकतो. त्यामुळे ‘प्रोजेक्ट लून’ची चाचणी खूप महत्त्वाची आहे. दुर्दैवाने प्रत्यक्ष चाचणीस प्रारंभ होण्यापूर्वीच त्यासंदर्भात शंकाकुशंका व्यक्त करणे सुरू झाले आहे. या फुग्यांच्या माध्यमातून हेरगिरी होऊ शकते, भारतातील संवेदनशील स्थळांबाबतची माहिती आयतीच विदेशी शक्तींच्या हाती लागू शकते आणि त्यामुळे देशाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, अशा प्रकारचे आक्षेप घेतल्या जाऊ लागले आहेत. गुगल केवळ तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार असून, प्रत्यक्ष इंटरनेट सेवा मात्र भारतीय संचार निगम लिमिटेड ही सरकारी कंपनी उपलब्ध करून देणार आहे, या वस्तुस्थितीकडे मात्र पद्धतशीर डोळेझाक केल्या जात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे विदेशी शक्तींना भारताची हेरगिरी करायचीच असल्यास, त्यासाठी अत्यंत शक्तिशाली कॅमेरे बसविलेले हेरगिरी उपग्रह अवकाशात घिरट्या घालतच असतात, हे विसरता कामा नये! भारताने १९९८ मध्ये केलेल्या दुसऱ्या अण्वस्त्र चाचणीच्या वेळी अमेरिकन उपग्रहाने त्या तयारीवर नजर ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि भारताने तो हाणूनही पाडला होता. याचाच अर्थ संवेदनशील गुपिते कशी जपायची, हे आपल्यालाही चांगले ठाऊक आहे. तेव्हा उगीच आपल्या ग्रामीण बांधवांना इंटरनेटशी जोडल्या जाण्याच्या मार्गातील धोंड बनण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही, हे उमजलेले बरे!