शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
4
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
5
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
6
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
7
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
8
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
11
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
12
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
13
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
14
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
15
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
16
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
17
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
18
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
19
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
20
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध

दिल्ली वेगळी, मुंबई वेगळी

By admin | Updated: February 4, 2015 23:47 IST

संसदीय लोकशाहीत पंतप्रधान हा मंत्रिमंडळाचा निर्माता, नेता, प्रवक्ता आणि त्याच्या वतीने राजीनामा देऊ शकणारा सर्वाधिकारी असतो.

संसदीय लोकशाहीत पंतप्रधान हा मंत्रिमंडळाचा निर्माता, नेता, प्रवक्ता आणि त्याच्या वतीने राजीनामा देऊ शकणारा सर्वाधिकारी असतो. त्याची मर्जी असेल तोवरच बाकीचे मंत्री त्यांच्या जागांवर राहतात. मंत्र्यांना राजीनामा मागणे वा त्यांच्या बडतर्फीची शिफारस राष्ट्रपतींकडे करणे हा अधिकारही त्यालाच आहे. या स्थितीत आपला प्रत्येकच अधिकार आग्रहाने वापरून घेणारा नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान आपल्या सहकाऱ्यांवर संपूर्ण नियंत्रण ठेवीत असेल तर ते घटनेनुसार चालले आहे असेच मानले पाहिजे. मंत्र्यांनी कुठे कोणते कपडे घालावे आणि कोणाशी कुठे चर्चा करू नये याचे आदेश पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून मंत्र्यांना देण्यात आल्याच्या बातम्या मध्यंतरी प्रकाशित झाल्या. मंत्र्यांनी आपले स्वीय सचिव, पी.ए. किंवा इतर सल्लागार म्हणून कोणाला नेमावे हेही पंतप्रधानांच्या कार्यालयाकडूनच त्यांना सांगितले गेलेले आपण पाहिले. ज्या मंत्र्यांनी याबाबत आगाऊपणा करून आपली मर्जी वापरली त्यांना त्यांच्या कार्यवाह्या नंतर मागे घ्याव्या लागल्या हेही देशाला दिसले. मोदींचा अधिकार व जनाधार लक्षात घेता त्यांच्या या अधिकाराला आव्हान देण्याची हिंमत त्यांच्या कोणत्या सहकाऱ्याने केली नाही व ती त्यांच्यातल्या कोणात असेल असे वाटतही नाही. मात्र मोदींचा हाच वसा काही मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या राज्यात चालविला तेव्हा त्यांच्या वाट्याला आलेला अनुभव वेगळा व त्यांना निराश करणारा दिसला. महाराष्ट्रात भाजपाला स्वबळावरचे बहुमत नाही. त्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी शिवसेनेची मदत घ्यावी लागली आहे. ही मदत घेताना भाजपाने सेनेला दिलेली खाती अजित पवारांच्या भाषेत ‘फडतूस’ (म्हणजे कमी महत्त्वाची असलेली) आहेत. त्यामुळे नाराज असलेले सेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांहून त्यांच्या नेतृत्वावर म्हणजे उद्धव ठाकऱ्यांवर जास्तीची निष्ठा ठेवून आहेत. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांकडे काणाडोळा करतानाही दिसले आहेत. सेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्रात येऊ घातलेल्या उद्योगांना तातडीने मान्यता देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर बसविले आहेत. या उद्योगांना मान्यता देण्याच्या मार्गातील अडसर कमी करण्याचे व राज्याचे औद्योगीकरण वेगाने घडवून आणण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न असताना देसाई यांनी या परवान्यांसाठी जुनेच निकष व जुनीच लालफीत कायम ठेवण्याचा संकेत दिला आहे. त्यांच्या मान्यतेसाठी त्या खात्यांकडे अनेक उद्योगांचे आरंभ आता अडले आहेत. असे परवाने अधिकाऱ्यांच्या स्तरावरच देण्यात यावे असे मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश असताना त्या संबंधीची सगळी कागदपत्रे मान्यतेसाठी आपल्याकडे पाठविण्यात यावी असा आदेशच देसार्इंनी त्यांच्या खात्याला दिला आहे. सेनेने भाजपाशी राखलेल्या दुराव्याचे हे संकेत तर आहेतच शिवाय जाणकारांना यात काहीतरी मुरत असल्याचेही जाणवत आहे. सेनेची कुरबूर अशी तर भाजपातील वरिष्ठ मंत्र्यांची तक्रारही तेवढीच मोठी व गंभीर आहे. त्यातील सर्वात मोठा आणि काटेरी स्वर एकनाथ खडशांचा आहे. मुळातच खडसे यांना देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्रिपद पचविणे अजून जमले नाही. पंढपुरात असताना खुद्द पांडुरंगाच्या साक्षीने त्यांनी राज्याला बहुजन समाजाचा मुख्यमंत्री (म्हणजे ते स्वत:) मिळणे आवश्यक होते असे म्हटले. त्याऐवजी आता तेथे आलेला सवर्ण मुख्यमंत्री (म्हणजे फडणवीस) तेथे नको होता हेही त्यांनी स्पष्टच सांगून टाकले. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचे स्वीय सहायक वा अन्य सहकारी बदलणे हाही त्यांना त्यांचा अपमान वाटला. त्यासाठी त्यांनी थेट मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच बहिष्कार घातला. जुने स्वीय सहायक व खासगी अधिकारी जुन्या व्यवहारात मुरलेले असतात. त्यात ते विशेष तरबेजही असतात. या वास्तवाची जाणीव प्रथमच मंत्रिपद अनुभवाला आलेल्या देवेंद्र फडवणीसांना नसावी. झालेच तर फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या राजकीय वजनातही फार मोठे अंतर आहे. नरेंद्र मोदींनी त्यांचा पक्ष स्वबळावर सत्तेवर आणला आणि स्वत:च्या मर्जीने आपले सहकारी निवडून घेतले. त्यांच्या अधिकाराला प्रश्न विचारण्याएवढी ताकद त्यांच्या एकाही सहकाऱ्यात नाही. ‘आम्ही येथे नुसते पेपरवेट््स होऊन राहिलो आहोत’ हे एका ज्येष्ठ मंत्रीणबार्इंचे त्यांच्या स्थानाविषयीचे उद््गार बरेच काही सांगणारे आहेत. मोदींना त्यांचा पक्षच भितो असे नाही. त्या पक्षाचा जन्मदाता असणारा संघ परिवारही त्यांना वचकून आहे हे आपण पाहिले आहे. फडणवीसांना हे स्थान प्राप्त करायला बरेच दिवस लागणार आहेत. त्यामुळे आपण पंतप्रधानांचे अनुकरणच तेवढे करीत आहोत असेही त्यांना वाटत असावे. यातले खरे खोटे तेच जाणोत. पण एक गोष्ट मात्र खरी, महाराष्ट्राचे नवे मंत्रिमंडळ अधिकारावर येऊन अवघे तीनच महिने झाले. एवढ्यातच त्यात असे काही तिढे आणि आढे दिसणे ही गोष्ट त्याच्या परिणामकारकतेविषयीचा संशय निर्माण करणारी ठरते. तशातच शिवसेना हा पक्ष सरकारला अडचणीची ठरतील अशी वक्तव्ये याच काळात प्रकाशित करताना दिसतो. जयंत पाटील यांच्यासारखा मुरब्बी व अनुभवी मंत्री ‘हे सरकार फार काळ टिकणार नाही’ असे जेव्हा म्हणतो तेव्हा त्यांना यातले आणखीही काही ठाऊक असावे एवढेच अशावेळी नोंदवायचे असते.