शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
3
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
4
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
5
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
6
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
7
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
8
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
9
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
10
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
11
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
12
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
13
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
14
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
15
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
16
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
17
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
18
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
19
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
20
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल

पुन्हा कर्जमाफी!

By admin | Updated: March 20, 2017 00:01 IST

शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्याचा विषय हळूहळू; पण निश्चितपणे ऐरणीवर येऊ लागला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक

शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्याचा विषय हळूहळू; पण निश्चितपणे ऐरणीवर येऊ लागला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जिंकणे भाजपाच्या दृष्टीने अत्यंत निकडीचे झाले होते. त्यामुळे त्या पक्षाने शेतकऱ्यांना लुभविण्यासाठी, सत्ता मिळाल्यास कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन आता भाजपाच्या घशात अडकलेले हाडूक ठरेल की काय, अशी स्थिती निर्माण होऊ पाहत आहे. देशभरातील शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारपुढे नाही; मात्र उत्तर प्रदेशमधील नवे सरकार त्या राज्यातील शेतकऱ्यांची कर्जे माफ करेल आणि त्यासाठी लागणारा वित्त पुरवठा केंद्र सरकारतर्फे करण्यात येईल, असे संसदेत स्पष्ट करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या विरोधात रान उठविण्यासाठी मुद्द्याच्या शोधात असलेल्या विरोधी पक्षांच्या हाती हे आयतेच कोलित सिद्ध होऊ शकते. देशभरातील शेतकरी आत्महत्त्यांचे सत्र थांबविण्यासाठी कृषी कर्ज माफ करण्याशिवाय दुसरा मार्गच नाही, अशी मांडणी विरोधकांनी केली. दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभेत, कर्जमाफीनंतरही गत पाच वर्षांत सुमारे १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्याचे सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकप्रकारे कर्जमाफीच्या उपयोगितेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यातील राजकारणाचा भाग सोडून द्या; पण कर्जमाफीचा यापूर्वीचा दोन वेळचा अनुभव काय सांगतो? केंद्राने १९९० आणि २००८ मध्ये कृषी कर्जे माफ केली होती. दुसऱ्या कर्जमाफी योजनेंतर्गत, सरकारने २०११-१२ पर्यंत तब्बल ५२ हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त रक्कम बॅँकांना अदा केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्थितीत काही फरक पडला का? शेतकरी आत्महत्त्यांचे प्रमाण घटले का? दुर्दैवाने या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत आणि विरोधकांनाही ते चांगलेच ठाऊक आहे. भारतीय सांख्यिकी संस्थेने २०१३ मध्ये जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २००८ मधील कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांमध्ये परतफेड लांबविण्याची प्रवृत्ती दिसली. ज्या शेतकऱ्यांनी तोपर्यंत कधी कर्ज थकविले नव्हते तेदेखील कर्जमाफीनंतर परतफेडीसाठी चालढकल करू लागले. दुसरी गोष्ट म्हणजे त्यानंतर बॅँकांनी कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांना पूर्वीच्या तुलनेत कमी रकमेची कर्जे दिली. ज्यांनी एकदा कर्ज थकविले ते पुन्हा वेळेत परतफेड करतील याची हमी काय, हा दृष्टिकोन त्यामागे होता. काही अर्थतज्ज्ञांचे तर असे मत आहे की, आता पुन्हा कर्जमाफी दिल्यास कर्जाची परतफेड करायचीच नसते, अशीच शेतकऱ्यांची प्रवृत्ती होत जाईल. आता चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात आहे. सरकार हा विषय कसा हाताळते, याकडे राजकीय आणि आर्थिक क्षेत्राचे लक्ष लागलेले राहील. एक गोष्ट मात्र निश्चित दिसते आणि ती ही, की कर्जमाफी केली तरी आणि न केली तरी, हाच मुद्दा २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा केंद्रबिंदू असेल!