शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पुन्हा कर्जमाफी!

By admin | Updated: March 20, 2017 00:01 IST

शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्याचा विषय हळूहळू; पण निश्चितपणे ऐरणीवर येऊ लागला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक

शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्याचा विषय हळूहळू; पण निश्चितपणे ऐरणीवर येऊ लागला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जिंकणे भाजपाच्या दृष्टीने अत्यंत निकडीचे झाले होते. त्यामुळे त्या पक्षाने शेतकऱ्यांना लुभविण्यासाठी, सत्ता मिळाल्यास कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन आता भाजपाच्या घशात अडकलेले हाडूक ठरेल की काय, अशी स्थिती निर्माण होऊ पाहत आहे. देशभरातील शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारपुढे नाही; मात्र उत्तर प्रदेशमधील नवे सरकार त्या राज्यातील शेतकऱ्यांची कर्जे माफ करेल आणि त्यासाठी लागणारा वित्त पुरवठा केंद्र सरकारतर्फे करण्यात येईल, असे संसदेत स्पष्ट करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या विरोधात रान उठविण्यासाठी मुद्द्याच्या शोधात असलेल्या विरोधी पक्षांच्या हाती हे आयतेच कोलित सिद्ध होऊ शकते. देशभरातील शेतकरी आत्महत्त्यांचे सत्र थांबविण्यासाठी कृषी कर्ज माफ करण्याशिवाय दुसरा मार्गच नाही, अशी मांडणी विरोधकांनी केली. दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभेत, कर्जमाफीनंतरही गत पाच वर्षांत सुमारे १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्याचे सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकप्रकारे कर्जमाफीच्या उपयोगितेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यातील राजकारणाचा भाग सोडून द्या; पण कर्जमाफीचा यापूर्वीचा दोन वेळचा अनुभव काय सांगतो? केंद्राने १९९० आणि २००८ मध्ये कृषी कर्जे माफ केली होती. दुसऱ्या कर्जमाफी योजनेंतर्गत, सरकारने २०११-१२ पर्यंत तब्बल ५२ हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त रक्कम बॅँकांना अदा केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्थितीत काही फरक पडला का? शेतकरी आत्महत्त्यांचे प्रमाण घटले का? दुर्दैवाने या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत आणि विरोधकांनाही ते चांगलेच ठाऊक आहे. भारतीय सांख्यिकी संस्थेने २०१३ मध्ये जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २००८ मधील कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांमध्ये परतफेड लांबविण्याची प्रवृत्ती दिसली. ज्या शेतकऱ्यांनी तोपर्यंत कधी कर्ज थकविले नव्हते तेदेखील कर्जमाफीनंतर परतफेडीसाठी चालढकल करू लागले. दुसरी गोष्ट म्हणजे त्यानंतर बॅँकांनी कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांना पूर्वीच्या तुलनेत कमी रकमेची कर्जे दिली. ज्यांनी एकदा कर्ज थकविले ते पुन्हा वेळेत परतफेड करतील याची हमी काय, हा दृष्टिकोन त्यामागे होता. काही अर्थतज्ज्ञांचे तर असे मत आहे की, आता पुन्हा कर्जमाफी दिल्यास कर्जाची परतफेड करायचीच नसते, अशीच शेतकऱ्यांची प्रवृत्ती होत जाईल. आता चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात आहे. सरकार हा विषय कसा हाताळते, याकडे राजकीय आणि आर्थिक क्षेत्राचे लक्ष लागलेले राहील. एक गोष्ट मात्र निश्चित दिसते आणि ती ही, की कर्जमाफी केली तरी आणि न केली तरी, हाच मुद्दा २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा केंद्रबिंदू असेल!