शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

अधिवेशनात डाळ शिजेल?

By admin | Updated: March 8, 2017 02:41 IST

तुरीला प्रतिक्विंटल ५०५० रुपयांचा हमीभाव मिळेल, म्हणून प्रत्येक जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी केंद्रांवर वाहनांच्या रांगा लागल्या. त्याचा खुल्या बाजारावरही परिणाम झाला.

- धर्मराज हल्लाळेतुरीला प्रतिक्विंटल ५०५० रुपयांचा हमीभाव मिळेल, म्हणून प्रत्येक जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी केंद्रांवर वाहनांच्या रांगा लागल्या. त्याचा खुल्या बाजारावरही परिणाम झाला. भाव ३५०० ते ३७०० पर्यंत घसरला. शासनाने बारदाना, वेअरहाऊससारखी कारणे देत खरेदी बंद केली. आतातरी सर्वाधिक आत्महत्त्या झालेल्या मराठवाड्यातील आमदार अधिवेशनात आवाज उठवतील का? किचकट नियमांची कसरत पूर्ण करीत नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांवर पोहोचलेल्या शेतकऱ्यांना भुर्दंडच सोसावा लागला. बारदान्याअभावी शेतमालाची खरेदी बंद करणे हे शासनासाठी मोठी नामुष्की आहे. दुष्काळात होरपळलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वाहतुकीचा भुर्दंडही सोसणारा नाही.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांपूर्वी राज्य शासनाने मोठा गाजावाजा करीत राज्यभरात ५०५० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केंद्र उघडली होती. प्रारंभी किचकट नियमांमुळे शेतकऱ्यांचा खरेदी केंद्रांवर म्हणावा तितका प्रतिसाद नव्हता, परंतु खुल्या बाजारात ४१०० ते ४२०० इतका भाव अन् शासनाच्या केंद्रात मिळणारा पाच हजारांवरील भाव यामुळे खरेदी केंद्रावर गर्दी वाढली. नांदेड, परभणी जिल्ह्यात एकूण ३८ हजार क्विंटलपेक्षा अधिक तुरीची खरेदी करण्यात आली होती. हीच परिस्थिती संपूर्ण मराठवाड्यात राहील. कुठे बारदाना नाही, कुठे वजनकाट्याची कमतरता आहे, कुठे हमाल नाहीत. सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांचा वाहनखर्चही वाढला; परंतु बारदाना, वेअरहाऊस यासारखी कारणे देऊन अनेक ठिकाणी खरेदीच बंद झाली. परिणामी खुल्या बाजारातही ४१०० ते ४२०० रुपयांवरून ३५०० ते ३७०० रुपयांवर प्रतिक्विंटल घसरण झाली.तीन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा सोयाबीननंतर तुरीची आवक वाढली. राज्यभर यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनचे उत्पन्नही वाढले होते. परिणामी भाव घसरले. त्यावर सरकारने अनुदानाचा पुळका दाखविला. प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेऊन थट्टाच केली. त्यातही नियमावली इतकी किचकट होती की, शेतकरी अनुदान लाभापासून चार हात दूर राहिले. नांदेड जिल्ह्यात केवळ अडीच हजार शेतकऱ्यांनी अनुदानासाठी अर्ज केले आहेत. अनुदान देताना सातबारावरील एकूण पेऱ्याचा निकष न लावता बाजार समितीअंतर्गत अडत्यांकडे सोयाबीनची विक्री करणारे शेतकरीच अनुदानपात्र ठरणार आहेत. शासनाने निर्धारित केलेल्या कालावधीत नांदेड जिल्ह्यात ३५ हजार २२९ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली. त्यावर मिळणाऱ्या फुटकळ मदतीसाठी अव्वाच्या सव्वा कागदपत्रे मागितल्याने अनुदानाची घोषणा देखावा ठरला. प्रत्येक काढणी हंगामात शेतमाल एकाचवेळी बाजारात विक्रीला येतो. त्यामुळे भाव खाली येतात. आर्थिक विवंचनेमुळे शेतकरी मिळेल त्या दरात शेतमाल विकून मोकळा होतो. त्यामुळे शेतमाल साठवणूक करून काही कालावधीनंतर विक्री केल्यास वाढीव दराचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. त्यासाठी कृषी पणन मंडळामार्फत शेतमाल तारण योजना राबविली जाते. या योजनेसाठी पूर्वी पणन मंडळाकडून निधी उपलब्ध झाल्याने तारण कर्ज दिले जात असे. आता बाजार समित्यांमार्फत ही योजना राबविली जाते. शेतमालाच्या चालू भावानुसार ७० टक्के रक्कम तारण कर्ज म्हणून शेतकऱ्यांना मिळू शकते, परंतु आर्थिक गुंतागुंत एवढी आहे की, शेतकऱ्यांना माल तारण ठेवणेच परवडत नाही. परिणामी पदरी काही पडो न पडो शासन शून्य प्रतिसादाच्या अशा योजना राबवून घोषणांचा बाजार तेवढा भरविते. सोयाबीन अनुदानाच्या फसवणुकीनंतर तूर खरेदीचाही ठेंगा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना परवडणारा नाही. पिकलेले बेभाव विकले गेले तर महिनाभरात होणाऱ्या शेकडो आत्महत्या थांबणार कशा? हा प्रश्न आहे. त्याचवेळी हा प्रश्न उपस्थित करण्याची ज्यांची जबाबदारी आहे, ते आमदार अधिवेशनात प्रश्नांची डाळ कशी शिजवतात याकडे लक्ष आहे.